Homeकल्चर +'श्रीमद् रामायण’मध्ये लंकाधीश...

‘श्रीमद् रामायण’मध्ये लंकाधीश रावण बसतो शिव पूजेला

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘श्रीमद् रामायण’ या भव्यदिव्य मालिकेत भगवान श्रीराम (सुजय रेऊ) आणि लंकाधिपती रावण (निकितीन धीर) यांच्यातील युद्ध एका महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचले आहे. कारण लक्ष्मणाने (बसंत भट्ट) इंद्रजीत (ऋषिराज पवार)चा वध केला आहे. आपल्या पुत्राचा अचेतन देह पाहून रावण उद्ध्वस्त झाला आहे आणि श्रीरामाविरुद्ध अंतिम युद्ध करण्यास तो सज्ज झाला आहे. युद्धावर जाण्यापूर्वी आपल्या मुलाच्या मृत्यूने पिसाटलेला रावण, श्रीरामावर विजय मिळवण्याच्या लालसेने आणखी शक्ती प्राप्त करण्यासाठी शिव पूजा आरंभतो.

दरम्यान, श्रीरामदेखील शक्ती उपासना करतात आणि महागौरीला आवाहन करतात. रावणाच्या ताकदीवर विजय मिळवण्यासाठी तिच्याकडून मार्गदर्शन आणि शक्तीचे वरदान मागतात. अशाप्रकारे सुष्ट आणि दुष्ट यांच्यातील महासंग्रामाचे रणशिंग फुंकले आहे आणि दोन्ही पक्ष सुसज्ज आहेत.

सध्याच्या कथानकाबाबत श्रीरामाची भूमिका करणारा अभिनेता सुजय रेऊ म्हणतो की, “कथानकाने तीव्रतेची परिसीमा गाठली आहे. एकीकडे आपल्या पुत्राला गमावून शोकाकूल झालेला, बलशाली रावण श्रीरामाविरुद्ध लढण्यासाठी तयारी करत आहे. तर दुसरीकडे, सीतेला रावणाच्या तावडीतून सोडवून आणण्यासाठी आतुर झालेले श्रीराम शक्ती पूजा करून नवीन सामर्थ्य मिळवत आहेत. या शेवटच्या अध्यायात राम आणि रावण दोघेही अंतिम लढाईसाठी सज्ज होत आहेत, दैवी पाठबळ मिळवत आहेत, तेव्हा प्रेक्षकांना विश्वास आणि सामर्थ्य यांची अंतिम कसोटी बघता येईल.

Continue reading

फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न

फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन मंगळवारी सीरियाच्या दमास्कस दौऱ्यावर होते. या दौऱ्यात ते सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या भेटीकरीता निघाल्यानंतर ते उतरलेल्या हॉटेलच्या जवळ दोन बॉम्बस्फोट झाले. हे स्फोट मॅक्रॉन यांच्यावरील अयशस्वी हल्ला असल्याचे मानले जात आहे. असद राजवट पडल्यानंतर सीरियाला भेट देणारे...

वाहू लागला मुंबईकरांची तहान भागवणारा पहिला तलाव!

मुंबई महापालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी आणि मुंबईतच असणाऱ्या दोन तलावांपैकी एक पालिकेचा ‘विहार’ तलाव आज, ७ जुलैला रात्री ९ वाजता ओसंडून वाहू लागला आहे‌. हा तलाव गेल्या वर्षी १८ ऑगस्टला पूर्ण भरुन वाहू लागला होता. सन १८५९मध्ये...

रेल्वे कामगारांचे नेते विकास गुप्ते यांचे निधन

महाराष्ट्र हिंद मजदूर सभेचे खजिनदार, वेस्टर्न रेल्वे एम्प्लॉईज युनियनचे खजिनदार तसेच मणिबेन कारा फाउंडेशनचे डेप्युटी डायरेक्टर विकास गुप्ते यांचे आज, ६ जुलै २०२६ रोजी वयाच्या ६५व्या वर्षी कल्याण येथील रेल्वे हॉस्पिटलमध्ये अल्पशा आजाराने निधन झाले. ते शेवटच्या श्वासापर्यंत कामगार...
Skip to content