Homeकल्चर +20 नोव्हेंबरपासून गोव्यात...

20 नोव्हेंबरपासून गोव्यात इफ्फीचे आयोजन!

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) 52वा महोत्सव येत्या 20 ते 28 नोव्हेंबर या काळात गोव्यात होणार आहे. माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज या महोत्सवाचे नियम व पोस्टर जारी केले.

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) हा आशियातील सर्वात जुना आणि भारतातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणून गणला जातो. जानेवारी 2021मधील 51व्या आवृत्तीचे यश लक्षात घेता इफ्फीची 52वी आवृत्ती संमिश्र स्वरुपात आयोजित केली जाईल. गोवा राज्य सरकार आणि भारतीय चित्रपट उद्योग यांच्या सहकार्याने भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाचे चित्रपट महोत्सव संचालनालय (डीएफएफ) या महोत्सवाचे आयोजन करीत आहे.

इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म प्रोड्यूसर असोसिएशनद्वारे (एफआयएपीएफ) इफ्फीला मान्यता आहे. दरवर्षी या महोत्सवात चित्रपट सृष्टीतील दर्जेदार कलाकृतींची निवड होते आणि भारत आणि जगातील सर्वोत्कृष्ट चित्रपट प्रदर्शित केले जातात. भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या 52व्या आवृत्तीच्या स्पर्धात्मक विभागात सहभागी होण्यासाठी 31 ऑगस्ट 2021पर्यंत नोंदणी करता येईल.

भारतीय चित्रपट सृष्टीतील दिग्गज कलाकार सत्यजित रे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त यावेळी इफ्फीमध्ये भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाचे चित्रपट महोत्सव संचालनालय विशेष कार्य आढाव्याच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण करेल. तसेच, त्यांच्या कारकिर्दीचा वारसा जपत, “चित्रपट क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी सत्यजित रे जीवन गौरव पुरस्कार” या वर्षापासून प्रत्येक वर्षी इफ्फीमध्ये देण्यात येणार आहे.

Continue reading

उद्यापासून सॅन होजे येथे रंगणार ‘नाफा’ मराठी चित्रपट महोत्सव!

राष्ट्रीय सुवर्णकमळविजेत्या 'देऊळ' आणि 'भारतीय' या चित्रपटांचे राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त निर्माते अभिजीत घोलप यांच्या संकल्पनेतून 'नॉर्थ अमेरिकन मराठी फिल्म असोशिएशन' तथा नाफा (NAFA) या संस्थेची स्थापना गेल्यावर्षी अमेरिकेत झाली. हॉलिवूडच्या धर्तीवर मराठी चित्रपटसृष्टीचा भव्य सोहळा प्रथमच त्यांनी आयोजित करून सर्वांचे...

शशांक केतकरच्या ‘मुरांबा’चे ११०० भाग पूर्ण!

स्टार प्रवाहवरील मुरांबा मालिकेने नुकताच ११०० भागांचा टप्पा पार केला. रमा-अक्षय या जोडीसोबतच संपूर्ण मुकादम कुटुंबाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. अक्षय मुकादमची भूमिका साकारणाऱ्या शशांक केतकरने आजवर बऱ्याच मालिकांमध्ये काम केलं आहे. मात्र शशांकच्या करिअरमधली मुरांबा ही सर्वाधिक भागांची...

‘सावली’वर सावली.. तीही कडक ऊन नसताना!

राज्यविधिमंडळाच्या नुकत्याच संपलेल्या अधिवेशनात विधान परिषदेत शिवसेना (उबाठा) पक्षाचे नेते अनिल परब यांनी महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांचा राजीनामा मागताना मुंबईतल्या कांदिवलीत असलेला 'सावली' हा डान्स बार त्यांच्या मातोश्रींचा असल्याचा आरोप केला. काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी येथे छापा टाकून...
Skip to content