Homeपब्लिक फिगरभिवंडीत बेकायदा गोदामांच्या...

भिवंडीत बेकायदा गोदामांच्या संख्येत बेसुमार वाढ

भिवंडीमध्ये अलिकडच्या काळात गोदाम बांधकामांमध्ये भरमसाठ वाढ झाली आहे. विकासकांच्या सहकार्याने लहान आणि मध्यम गुंतवणूकदारांकडून येथे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात येत आहे. अनेक गोदामे एमएमआरडीए, एमआयडीसी किंवा स्थानिक महानगरपालिका यासारख्या सक्षम नियोजन किंवा विकास प्राधिकरणाच्या मंजुरीशिवाय बांधली जात आहेत. हे टाळण्यासाठी आशियातील सर्वात मोठ्या लॉजिस्टिक्स हबपैकी एक असलेल्या भिवंडी येथील औद्योगिक गोदाम प्रकल्पांना मंजुरी आणि रेरा नोंदणीची सक्ती करण्यात यावी, अशी मागणी ‘भिवंडी पूर्व’चे आमदार रईस शेख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

विकासाचे सुलभीकरण आणि लघु व मध्यम गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी गोदाम प्रकल्पांना नियम अत्यावश्यक असल्याचा दावा आमदार शेख यांनी केला आहे. हे प्रकल्प रिअल इस्टेट (नियमन आणि विकास) कायद्यांतर्गत (रेरा) मान्यताप्राप्त नसल्यामुळे, गुंतवणूकदार कायदेशीर सुरक्षा आणि जबाबदारी यंत्रणांपासून वंचित राहत आहेत. अनेक प्रकरणांमध्ये,

भिवंडी

गुंतवणूकदार विकासकांशी करार करतात. परंतु प्रकल्प सुरू होण्यास अपयशी ठरतात किंवा अपूर्ण राहतात. परिणामी, लहान आणि मध्यम गुंतवणूकदारांना न्याय किंवा परतफेडीचा कोणताही आधार न घेता गंभीर आर्थिक नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे भिवंडी आणि संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व औद्योगिक गोदाम प्रकल्पांना अनिवार्य मान्यता आणि रेरा नोंदणी मिळावी, असे त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

गोदाम प्रकल्पांना एमएमआरडीए, एमआयडीसी किंवा महानगरपालिकासारख्या अधिकाऱ्यांकडून इमारत आणि लेआउट प्लॅन मंजुरी घेणे आणि रेराअंतर्गत नोंदणी करणे अनिवार्य करण्याची वेळ आली आहे. हे उपाय केवळ गुंतवणूकदारांचे संरक्षण करणार नाहीत तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय भागधारकांच्या दृष्टीने नियोजित वाढ, अनुपालन आणि विश्वासार्हतेसह एक अग्रगण्य गोदाम केंद्र म्हणून भिवंडीचे स्थान मजबूत करतील, असा दावा आमदार शेख यांनी केला आहे.

Continue reading

इराणचे प्रमुख खामेनेई ठार, पुत्र मोजतबा उत्तराधिकारी!

गेल्या काही दिवसांपासून तोंडी असलेला अमेरिका-इराण संघर्ष आता प्रत्यक्षात उतरला. काल सकाळी अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्त कारवाई करत इराणच्या सर्व प्रमुख ठिकाणांवर बॉम्बहल्ले केले. इराणच्या सहा शहरांवर हल्ले करण्यात आले. यात इराणचे प्रमुख नेते तसेच परमाणू केंद्रांना लक्ष्य करण्यात...

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...
Skip to content