Monday, February 3, 2025
Homeटॉप स्टोरीअजितदादांचं घर आहे...

अजितदादांचं घर आहे पत्नीच्या नावे..

लोकसंख्येच्या पन्नास टक्के प्रमाण असलेल्या महिलांना खूष करणारा अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी गृहस्वामिनीला खऱ्या अर्थाने घराची मालकीण बनवणारी योजना आणलीय आणि या प्रतिनिधीच्या प्रशानाला उत्तर देताना ते म्हणाले की, आमचं घर आधीच पत्नीच्या नावावर आहे.

नवीन घर घेताना घराची नोंदणी गृहस्वामिनीच्या नावानं केली, किंवा गृहस्वामिनी, कन्या किंवा सासू यांच्या नावानं केली तर मुद्रांक शुल्कात एक टक्का सवलत देणारी राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजना पवार यांनी जाहीर केलीय. नवीन घर एकट्या महिलेच्या नावावर, महिला तसंच मुलगी किंवा महिला आणि सासू यांच्या नावावर असावे तरच मुद्रांक शुल्कात एक टक्का सवलत मिळू शकेल, हे आदेशात आपण नमूद करू आणि एक एप्रिलपासून राज्यात ही योजना लागू करू, असं अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं.

अर्थसंकल्प सादर करताना आजचा दिवस ८ मार्चचा आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे, असं सांगून पवार म्हणाले की, शुभशकुनांचं तोरण तू.. देव्हाऱ्यातले चंदन तू.. नवनिर्मितीची गाथा जिथे.. आपण सर्वांनी टेकावा माथा..

अशा शब्दांत महिलांचं वर्णन करून त्यांनी राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजना जाहीर केली. महिलांना घर नावावर मिळण्याची शक्यता निर्माण करणाऱ्या या योजनेबरोबरच पवार यांनी ग्रामीण भागातल्या मुलींना शाळेपर्यंत पोहोचण्यासाठी मोफत बसप्रवासाची सोयही केलीय आणि त्यासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले योजना जाहीर करत यासाठी दीड हजार बसगाड्यांची सोयही सरकार करणार आहे. नवतेजस्विनी ग्रामीण महिला उद्योगिनी योजनेतून दहा हजार महिला बचत गटातल्या महिलांना लाभ होईल. संत जनाबाई सामाजिक सुरक्षा व कल्याण योजना असंघटित घरकाम करणाऱ्या महिलांसाठी कल्याणाची संधी उपलब्ध करून देणार आहे. महिला दिनानिमित्ताने स्वतंत्र महिला गट राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना करण्याची घोषणा करतो, असंही पवार यांनी जाहीर केलं.

कोरोनाचा महाराष्ट्राला ७० हजार कोटीचा फटका

मुंबईसह राज्याला आणि देशासह संपूर्ण जगाला भेडसावलेल्या कोरोनाच्या संकटामुळे महाराष्ट्राला सत्तार हजार कोटी रुपयांचा फटका बसला आहे. उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केलेल्या २०२१-२२च्या अर्थसंकल्पातून ही गोष्ट समोर आली आहे. गेल्या वर्षी अर्थसंकल्प मांडताना महसुली जमा साडेतीन लाख कोटी रुपयांची अपेक्षित होती. पण कोरोनामुळे ती केवळ दोन लाख ऐंशी हजार कोटी रुपयांचीच होऊ शकल्याचं पवार यांनी सांगितलं. त्यामुळे करोनामुळे महसुली जमेमध्ये सत्तर हजार कोटींचा फटका बसल्याचं पवार यांनी स्पष्ट केलं.

महाराष्ट्राला जीएसटी अर्थात वस्तू व सेवाकराच्या परताव्यापोटी केंद्र सरकारकडून तीस हजार कोटी रुपये येत्या ३१ मार्चपर्यंत येणं अपेक्षित आहे, असंही ते म्हणाले. केंद्राकडून हे तीस हजार कोटी रुपये येत्या महिनाभरापर्यंत येतील, असं वाटत नाही, हे सांगून महसुली तूट एक लाख कोटीपर्यंत जाईल, असा अंदाजही पवार यांनी व्यक्त केला.

रडगाणं न गाता राज्य पुढे – मुख्यमंत्री

कोणत्याही प्रकारचं रडगाणं न गाता आर्थिक संकटाचा सामना करत समाजाच्या सर्व घटकांना दिलासा देणारा राज्याला पुढे नेणारा अर्थसंकल्प मांडला म्हणून मी अजित पवार यांना धन्यवाद देतो आणि त्यांचं अभिनंदनही करतोय, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

Continue reading

हिवाळी अधिवेशनाच्या सहलीतून जनतेला नेमके काय मिळाले?

नागपूर कराराचे पालन करण्याची संविधानिक जबाबदारी विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये घेऊन राज्य सरकारने पूर्ण केली पण विदर्भाच्या सर्वसामान्य नागरिकांना या सहा दिवसांच्या कामकाजातून नेमके काय मिळाले, हा प्रश्न नेहमीप्रमाणे अनुत्तरितच राहिला. कापूस, सोयाबीनला उत्पादनखर्चावर आधारित भाव मिळतो का, विदर्भातील किंवा...

बीड सरपंचांच्या हत्त्येची एसआयटी तसेच न्यायालयीन चौकशी

बीडमध्ये झालेल्या संतोषअण्णा देशमुख या सरपंचाच्या हत्त्येप्रकरणी पोलीस महानिरीक्षकांच्या एसआयटीद्वारे म्हणजेच विशेष चौकशी पथकाद्वारे चौकशी केली जाईल आणि या प्रकरणात गुन्हेगारीच्या इको-सिस्टिमसंदर्भात न्यायालयीन चौकशी केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. या दोन्ही चौकश्या तीन...

बदल जाओ वक्त के साथ, या फिर वक्त बदलना सीखो..

बदल जाओ वक्त के साथ, या फिर वक्त बदलना सीखो.. महाराष्ट्रात सध्या राजकारणात काय चाललंय समजत नाही, कोण कुणाबरोबर जाईल आणि कोण नेमके कोणत्या पक्षात आहे, हे समजत नाही, अशी स्थिती आहे, ही तक्रार बरेचजण करतात. पण, मुळात गुंतागुंतीचे...
Skip to content