Homeटॉप स्टोरी.. म्हणून मंगळवारीच...

.. म्हणून मंगळवारीच अशोक चव्हाण झाले भाजपावासी!

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा महाराष्ट्र दौरा अनिश्चित झाल्यामुळे तसेच राज्यसभा निवडणुकीसाठी मतदार जाहीर करण्यात अडचण होऊ नये यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांचा भारतीय जनता पार्टीतला प्रवेश आज तातडीने उरकण्यात आला. अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता असून उद्यापर्यंत जाहीर होणाऱ्या यादीत त्यांचे नाव असणार असल्याचे बोलले जात आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह येत्या गुरूवारी महाराष्ट्राच्या एकदिवसीय दौऱ्यावर येणार होते. यात त्यांचा छत्रपती संभाजी नगर येथे एक कार्यक्रमही होता. परंतु पंजाबमधल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांच्या दौऱ्याबद्दल अनिश्चितता निर्माण झाली. त्यातच राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करायची शेवटची तारीख १५ फेब्रुवारी आहे. त्यामुळे अशोक चव्हाण यांना त्याचदिवशी पक्षप्रवेश देऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया राबविणे शक्य होणार नाही. या साऱ्या बाबी लक्षात घेऊन आजच चव्हाण यांचा पक्षप्रवेश उरकून घेण्याचा निर्णय भाजपाच्या नेत्यांनी घेतला.

त्यानुसार दुपारी एक वाजल्यानंतर मुंबईत भाजपाच्या प्रदेश मुख्यालयात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी नेत्यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण तसेच त्यांचे समर्थक माजी आमदार अमर राजुरकर यांनी भाजपात प्रवेश केला. यावेळी चव्हाण यांनी रीतसर प्रवेशशुल्क देत पावती घेत प्रवेशातली कोणतीही कायदेशीर अडचण ठेवली नाही. त्यानंतर माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी काँग्रेसमधले जनाधार असलेले अनेक नेते भाजपाच्या संपर्कात असल्याचे सांगितले. चव्हाण यांनी यावेळी भाजपाला मजबूत करण्यासाठी जास्तीतजास्त प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. पक्ष जी जबाबदारी देईल ती आपण स्वीकारणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Continue reading

एलिमेंट्स आर्ट क्लासेसचे अप्रतिम प्रदर्शन

एलिमेंट्स आर्ट क्लासेस च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्याच्या कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण आर्ट गॅलरी येथे पंचतत्व या तीन दिवसांचे वार्षिक कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सहा ते १८ वर्षे वयोगटातल्या जवळजवळ ४५ विद्यार्थ्यांच्या सुमारे ९० कलाकृती या प्रदर्शनात...

अकरावी प्रवेशासाठी नंतर सादर करा गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला

राज्यातल्या इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेत सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या निर्देशानंतर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची अट शिथिल केली आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर...

सौरभ विजय यांनी दिला डिजिटल नवोपक्रमावर भर

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे (UIDAI) मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ विजय यांनी मुंबईतील युआयडीएआय प्रादेशिक कार्यालयाला नुकतीच भेट दिली. मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच प्रादेशिक दौरा आहे. युआयडीएआय प्रादेशिक कार्यालय,...
Skip to content