Homeचिट चॅटउद्यापासून बोरीवलीत घ्या...

उद्यापासून बोरीवलीत घ्या साहित्यिक मेजवानी

मुंबई, महाराष्ट्रातील लोकशाहीचा उत्सव संपताच उद्यापासून म्हणजेच मंगळवार, २१ मे २०२४पासून मुंबईतल्या बोरीवलीतल्या जय महाराष्ट्र नगर येथे ही वसंत व्याख्यानमाला सुरु होत आहे. ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या ४१ वर्षांपासून सुरु असलेल्या या वसंत व्याख्यानमालेचे यंदा ४२वे वर्ष आहे.

एक संध्याकाळ शाहीरांसमवेत या नामाभिधानाने वसंत व्याख्यानमालेचे मंगळवारी, २१ मे २०२४ रोजी सायंकाळी पहिले पुष्प गुंफताना लोककलेचे गाढे अभ्यासक, मुंबई विद्यापीठाच्या शाहीर अमर शेख अध्यासनाचे प्रमुख डॉ. ‌गणेश चंदनशिवे आणि त्यांचे सहकारी पोवाडे सादर करतील. बुधवार, २२ मे २०२४ रोजी ‘मी भारतीय’ या विषयावर पुण्याचे रवींद्र देवधर हे दीर्घांक सादर करुन आपण सारे भारतीय आहोत ही त्यांची संकल्पना मांडतील. गुरुवार, २३ मे २०२४ रोजी चॉकलेट हिरो देव आनंद, ही संकल्पना घेऊन ख्यातनाम चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर देव आनंद यांच्या सदाबहार अभिनेत्याच्या आठवणी, किस्से आपल्या खुमासदार शैलीत रसिक प्रेक्षकांसमोर सादर करतील तर संगीत संयोजक संतोष पिसाट आणि प्रमोद कुंभार हे देव आनंद यांच्या गाजलेल्या चित्रपटांतील निवडक गाणी सादर करतील.

शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी आपल्या आयुष्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगड या राजधानीवर तब्बल पाचशे वेळा जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्राचा खराखुरा परिचय शिवभक्तांना करुन देत एक ऐतिहासिक विक्रम पूर्ण केला आहे. या त्यांच्या रायगड दर्शन @५००निमित्त त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी शुक्रवार, २४ मे २०२४ रोजी त्यांच्या विशेष प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.

विजय वैद्य आणि प्रा. नयना रेगे यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा ही वसंत व्याख्यानमाला ४२ वर्षांची होत आहे. हे औचित्य साधून शनिवार, २५ मे २०२४ रोजी प्रख्यात सुसंवादिनी मंगला खाडिलकर या जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी रसिक श्रोत्यांशी थेट संवाद साधतील.

रोज सायंकाळी ७.३० वाजता ही वसंत व्याख्यानमाला सुरु होणार असून रसिक प्रेक्षक, श्रोतृवृंदांनी वेळेपूर्वी आपापले स्थान ग्रहण करुन या बौद्धिक मेजवानीचा यथायोग्य लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Continue reading

देवाभाऊंच्या वाढदिवसानिमित्त झाला ‘पैलवान दत्तक योजने’चा शुभारंभ

महाराष्ट्राच्या मातीने देशाला असंख्य मल्ल दिले; मात्र गरिबीमुळे अनेक गुणी पैलवानांची स्वप्ने आखाड्याबाहेरच थांबली. हीच परंपरा मोडून काढण्याचा निर्धार करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त युनायटेड रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (युडब्ल्यूएफआय) आणि देवाभाऊ केसरी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात...

‘उधार का उजाला’चे गुरुवारी प्रकाशन

सदामंगल पब्लिकेशन प्रकाशित आणि कवयित्री प्रज्ञा जांभेकर लिखित ‘उधार का उजाला’, या हिंदी कवितासंग्रहाचा प्रकाशन समारंभ येत्या गुरुवारी, ३० जुलै रोजी सायंकाळी ६.३० वाजता मुंबईतल्या प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिराच्या मिनी थिएटरमध्ये होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार आणि या कवितासंग्रहाचे...

जाणून घ्या, गुरू आणि गुरुपौर्णिमेचे महत्त्व!

उद्या आषाढ पौर्णिमा; म्‍हणजेच साधक, शिष्‍य ज्‍या दिवसाची अत्‍यंत आतुरतेने वाट पाहत असतो, तो गुरुपौर्णिमेचा मंगलमय दिवस! शिष्‍याच्‍या संपूर्ण जीवनाला व्‍यापून राहिलेल्‍या सर्वशक्‍तीमान आणि सर्वज्ञ गुरूंच्‍या चरणी कृतज्ञता व्‍यक्‍त करण्‍यासाठी, साधनेचे पुढील ध्‍येय गाठण्‍याचा निश्‍चय करण्‍यासाठी हा दिवस साधक...
Skip to content