Homeचिट चॅटउद्यापासून बोरीवलीत घ्या...

उद्यापासून बोरीवलीत घ्या साहित्यिक मेजवानी

मुंबई, महाराष्ट्रातील लोकशाहीचा उत्सव संपताच उद्यापासून म्हणजेच मंगळवार, २१ मे २०२४पासून मुंबईतल्या बोरीवलीतल्या जय महाराष्ट्र नगर येथे ही वसंत व्याख्यानमाला सुरु होत आहे. ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या ४१ वर्षांपासून सुरु असलेल्या या वसंत व्याख्यानमालेचे यंदा ४२वे वर्ष आहे.

एक संध्याकाळ शाहीरांसमवेत या नामाभिधानाने वसंत व्याख्यानमालेचे मंगळवारी, २१ मे २०२४ रोजी सायंकाळी पहिले पुष्प गुंफताना लोककलेचे गाढे अभ्यासक, मुंबई विद्यापीठाच्या शाहीर अमर शेख अध्यासनाचे प्रमुख डॉ. ‌गणेश चंदनशिवे आणि त्यांचे सहकारी पोवाडे सादर करतील. बुधवार, २२ मे २०२४ रोजी ‘मी भारतीय’ या विषयावर पुण्याचे रवींद्र देवधर हे दीर्घांक सादर करुन आपण सारे भारतीय आहोत ही त्यांची संकल्पना मांडतील. गुरुवार, २३ मे २०२४ रोजी चॉकलेट हिरो देव आनंद, ही संकल्पना घेऊन ख्यातनाम चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर देव आनंद यांच्या सदाबहार अभिनेत्याच्या आठवणी, किस्से आपल्या खुमासदार शैलीत रसिक प्रेक्षकांसमोर सादर करतील तर संगीत संयोजक संतोष पिसाट आणि प्रमोद कुंभार हे देव आनंद यांच्या गाजलेल्या चित्रपटांतील निवडक गाणी सादर करतील.

शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी आपल्या आयुष्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगड या राजधानीवर तब्बल पाचशे वेळा जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्राचा खराखुरा परिचय शिवभक्तांना करुन देत एक ऐतिहासिक विक्रम पूर्ण केला आहे. या त्यांच्या रायगड दर्शन @५००निमित्त त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी शुक्रवार, २४ मे २०२४ रोजी त्यांच्या विशेष प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.

विजय वैद्य आणि प्रा. नयना रेगे यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा ही वसंत व्याख्यानमाला ४२ वर्षांची होत आहे. हे औचित्य साधून शनिवार, २५ मे २०२४ रोजी प्रख्यात सुसंवादिनी मंगला खाडिलकर या जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी रसिक श्रोत्यांशी थेट संवाद साधतील.

रोज सायंकाळी ७.३० वाजता ही वसंत व्याख्यानमाला सुरु होणार असून रसिक प्रेक्षक, श्रोतृवृंदांनी वेळेपूर्वी आपापले स्थान ग्रहण करुन या बौद्धिक मेजवानीचा यथायोग्य लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Continue reading

मी हरलेच नाही, मग राजीनामा का देऊ? ममतांचा सवाल!

मी हरलेच नाही तर मग राजीनामा कशासाठी देणार, असा सवाल करत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास स्पष्ट नकार दिला. मी हरलेच नाही. मला हरवले गेले आहे. त्यामुळे लोकभवन म्हणजेच राजभवनावर जाऊन मी राजीनामा देणार...

दुसऱ्यांच्या घरी धुणी-भांडी करणारी महिला झाली आमदार!

जिद्द, चिकाटी आणि लोकशाहीवरचा विश्वास असेल, तर एखादी सामान्य व्यक्ती किती मोठी झेप घेऊ शकते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे कलिता माजी. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात अनेक दिग्गजांचा पराभव झाला असला, तरी औसग्राम विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेल्या...

इराणने युद्धविराम तोडला!

गेल्या काही दिवसांपासून इराण आणि अमेरिकेत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला युद्धविराम आज अखेर इराणने तोडला. इराणने आज होर्मूझच्या सामुद्रधुनीत नाकेबंदीला असलेल्या अमेरिकेच्या युद्धनौकेवरच हल्ला केल्याचे वृत्त आहे. अमेरिकेची ही युद्धनौका इराणच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला असता इराणने या...
Skip to content