Homeएनसर्कलवसतिगृहातल्या मुलींची सुरक्षितता...

वसतिगृहातल्या मुलींची सुरक्षितता वाऱ्यावर!

दक्षिण मुंबई येथील मरीन ड्राईव्ह परिसरात महिला वस्तीगृहात राहणाऱ्या अठरा वर्षीय मुलीचा विवस्रावस्थेत मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी समोर आली. त्यामुळे शिक्षणासाठी वसतिगृहात राहणाऱ्या मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून गुन्हेगारांची वसतिगृहातील खोलीत घुसून अत्याचार करत हत्त्या करण्यापर्यंत मजल गेली असल्याने राज्यात महिला व मुली सुरक्षित नसल्याचे वारंवार अधोरेखित होत आहे, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाच्या आमदार मनीषा कायंदे यांनी व्यक्त केली आहे.

मरीन ड्राईव्ह येथील सावित्रीबाई फुले महिला वसतिगृहात ही धक्कादायक घटना घडली असून वसतीगृहाच्या चौथ्या मजल्यावरील खोलीत राहणाऱ्या सदर मुलीची वसतिगृहातच काम करणाऱ्या सुरक्षारक्षकाने बलात्कारानंतर हत्त्या करून आत्महत्त्या केली असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. सदर मुलीला खालच्या मजल्यावर रूम दिलेला असताना ती चौथ्या माळ्यावर विवस्त्र अवस्थेत आढळून आल्याने वसतिगृह प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड झाला आहे. सदर मुलीने वसतिग्रहातील गैरसोईबद्दल वारंवार वसतीगृहाच्या प्रशासनाकडेदेखील तक्रारी केल्याचे कळते, असे त्या म्हणाल्या.

वसतीगृहातील मुली उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे गावी गेल्या असताना फक्त 30-40 मुली सध्या वसतिग्रहात राहत असून सदर मुलींच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती काळजी वसतिगृह प्रशासनाने घेण्याची आवश्यकता आहे. सदर पीडित मुलीच्या तक्रारीची योग्य वेळी दाखल घेतली असती तर तिचे प्राण वाचवता आले असते. त्यामुळे या हत्त्याप्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर तत्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणीही आमदार कायंदे यांनी गृहमंत्री व महिला बालविकास मंत्र्यांकडे केली आहे.

Continue reading

इराणचे प्रमुख खामेनेई ठार, पुत्र मोजतबा उत्तराधिकारी!

गेल्या काही दिवसांपासून तोंडी असलेला अमेरिका-इराण संघर्ष आता प्रत्यक्षात उतरला. काल सकाळी अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्त कारवाई करत इराणच्या सर्व प्रमुख ठिकाणांवर बॉम्बहल्ले केले. इराणच्या सहा शहरांवर हल्ले करण्यात आले. यात इराणचे प्रमुख नेते तसेच परमाणू केंद्रांना लक्ष्य करण्यात...

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...
Skip to content