Homeन्यूज ॲट अ ग्लांसबिहारमधल्या निवडणूक निरीक्षकांची...

बिहारमधल्या निवडणूक निरीक्षकांची पहिली फेरी पूर्ण

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आयोगाने 121 सर्वसाधारण निरीक्षक आणि 18 पोलिस निरीक्षकांची नियुक्ती केली असून दुसऱ्या टप्प्यासाठी 122 सर्वसाधारण निरीक्षक आणि 20 पोलिस निरीक्षक नेमले आहेत. तसेच, यादरम्यान सुरू असलेल्या 8 विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकांसाठी 8 सर्वसाधारण आणि 8 पोलिस निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. आपापल्या मतदारसंघांमधील नियुक्तीनंतर सर्व निरीक्षकांनी त्यांच्या पहिल्या भेटी पूर्ण केल्या असून ते आता आपल्या संबंधित मतदारसंघांमध्ये परतले आहेत.

केंद्रीय निवडणूक आयोगाने बिहार विधानसभेचा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम तसेच 8 विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुका जाहीर केल्या आहेत. घटनेतल्या कलम 324 आणि लोकप्रतिनिधित्व कायदा, 1951च्या कलम 20ब अंतर्गत दिलेल्या अधिकारांनुसार आयोग स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका पार पाडण्यासाठी केंद्रीय निरीक्षकांची नियुक्ती करतो. निवडणूक आयोगाने निरीक्षकांना संपूर्ण निवडणूक प्रक्रिया बारकाईने पाहण्याचे आणि निवडणुका पारदर्शक, स्वतंत्र आणि निष्पक्षपणे पार पाडल्या जातील याची खात्री करण्याचे निर्देश दिले आहेत.

निरीक्षकांना सर्व राजकीय पक्ष, उमेदवार आणि मतदार यांच्याशी पूर्णतः संपर्कात राहण्याचे व त्यांच्या तक्रारींचे तत्काळ निराकरण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. निरीक्षकांना मतदान केंद्रांना भेट देऊन मतदारांच्या सोयीसाठी आयोगाने घेतलेल्या नव्या उपक्रमांची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यास सांगण्यात आले आहे.

Continue reading

अजितदादांच्या बारामतीसाठी पोटनिवडणूक जाहीर

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे ज्येष्ठ आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांसाठी आज केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. या दोन्ही मतदारसंघांत 23 एप्रिल 2026 रोजी मतदान होणार असून 4...

पुढच्या लोकसभा निवडणुकीच्या ‘उपांत्य फेरी’चे बिगुल वाजले!

पश्चिम बंगालसह 5 राज्याxतील विधानसभा निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी जाहीर केल्या. मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांनी अधिकृत निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. त्यानुसार, केरळ, पुद्दुचेरी, आसाममध्ये एकाच टप्प्यात 9 एप्रिल रोजी, तर तामिळनाडूतही 23 एप्रिल रोजी एकाच...

यंदा मार्चपासूनच महाराष्ट्र उष्णतेच्या विळख्यात! पारा 7.6 अंशानी चढणार!!

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र राज्य यंदाच्या मार्च महिन्यात उन्हाच्या असह्य झळांनी होरपळत आहे. मुंबई महानगर प्रदेशाने मार्चच्या पहिल्या पंधरवड्यातच तीन उष्णतेच्या लाटांचा सामना केला असून, मार्चच्या पहिल्या भागात एकाचवेळी तीन उष्णतेच्या लाटा येणे ही मुंबईच्या इतिहासातील अत्यंत दुर्मिळ घटना आहे....
Skip to content