Homeन्यूज ॲट अ ग्लांसबिहारमधल्या निवडणूक निरीक्षकांची...

बिहारमधल्या निवडणूक निरीक्षकांची पहिली फेरी पूर्ण

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आयोगाने 121 सर्वसाधारण निरीक्षक आणि 18 पोलिस निरीक्षकांची नियुक्ती केली असून दुसऱ्या टप्प्यासाठी 122 सर्वसाधारण निरीक्षक आणि 20 पोलिस निरीक्षक नेमले आहेत. तसेच, यादरम्यान सुरू असलेल्या 8 विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकांसाठी 8 सर्वसाधारण आणि 8 पोलिस निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. आपापल्या मतदारसंघांमधील नियुक्तीनंतर सर्व निरीक्षकांनी त्यांच्या पहिल्या भेटी पूर्ण केल्या असून ते आता आपल्या संबंधित मतदारसंघांमध्ये परतले आहेत.

केंद्रीय निवडणूक आयोगाने बिहार विधानसभेचा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम तसेच 8 विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुका जाहीर केल्या आहेत. घटनेतल्या कलम 324 आणि लोकप्रतिनिधित्व कायदा, 1951च्या कलम 20ब अंतर्गत दिलेल्या अधिकारांनुसार आयोग स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका पार पाडण्यासाठी केंद्रीय निरीक्षकांची नियुक्ती करतो. निवडणूक आयोगाने निरीक्षकांना संपूर्ण निवडणूक प्रक्रिया बारकाईने पाहण्याचे आणि निवडणुका पारदर्शक, स्वतंत्र आणि निष्पक्षपणे पार पाडल्या जातील याची खात्री करण्याचे निर्देश दिले आहेत.

निरीक्षकांना सर्व राजकीय पक्ष, उमेदवार आणि मतदार यांच्याशी पूर्णतः संपर्कात राहण्याचे व त्यांच्या तक्रारींचे तत्काळ निराकरण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. निरीक्षकांना मतदान केंद्रांना भेट देऊन मतदारांच्या सोयीसाठी आयोगाने घेतलेल्या नव्या उपक्रमांची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यास सांगण्यात आले आहे.

Continue reading

हरमित सिंग ठरला ‘खासदार श्री’चा किंग!

मुंबईच्या शरीरसौष्ठवाची अस्सल श्रीमंती दाखवणारी ३००पेक्षा अधिक शरीरसौष्ठवपटूंमध्ये रंगलेली जोरदार चुरस... मुंबईच्या फिटनेस संस्कृतीचा क्रीडासोहळा पाहण्यासाठी क्रीडाप्रेमींची अभूतपूर्व गर्दी आणि केंद्रिय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी केलेली लाख मोलाच्या बक्षिसांची उधळण, यामुळे ‘खासदार श्री शरीरसौष्ठव स्पर्धे’ने...

क्रिकेट विश्वचषक जिंकलाः प्रतिका, स्नेह, रेणुकाला रेल्वेकडून बढती!

महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघातील खेळाडू प्रतिका रावत, स्नेह राणा आणि रेणुका सिंह ठाकूर यांना भारतीय रेल्वेकडून विशेष कार्य अधिकारी (क्रीडा) या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. या नामवंत महिला क्रिकेटपटूंना, विशेष बाब म्हणून (Out-of-Turn Promotion) पदोन्नती देण्यात आली...

मुंबईत जल मेट्रो प्रकल्प राबवा!

मुंबई शहर, पूर्व-पश्चिम विभागातील झोपडपट्ट्यांचा झपाट्याने विकास होत असल्याने त्या-त्या भागातील लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामानाने येथील अंतर्गत रस्ते तसेच पायाभूत सुविधांमध्ये वाढ होत नसल्याने मुंबईकरांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. मुंबईच्या रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी...
Skip to content