Homeकल्चर +मुस्लिम मराठी साहित्य...

मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फरझाना इक्बाल

गेल्या अनेक वर्षांपासून साहित्यक्षेत्रात अविरतपणे कार्यरत राहिलेल्या आणि विविध संस्था तसेच व्यासपीठांवरून साहित्यिक कार्याला सिद्ध करणाऱ्या मुंबईस्थित फरझाना इक्बाल-डांगे यांची नागपूर येथे १८ फेब्रुवारी २०२४ रोजी होणाऱ्या पहिल्या राज्यस्तरीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

भारतीय मुस्लिम परिषद, डॉ. मेघनाथ साहा सांस्कृतिक विचार मंच, फुले-शाहू-आंबेडकरी विचार मंच आणि छवि पब्लिकेशन्स या संस्थांमार्फत या संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून प्रा. जावेद पाशा, प्रा. रमेश पिसे, डॉ. असलम बारी, डॉ. वहिद पटेल आदी मान्यवर निमंत्रित आहेत. हे संमेलन भारतीय संविधानाला समर्पित करण्यात आले आहे.

फरझाना  म. इकबाल डांगे ह्या शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय अशा सर्वच क्षेत्रात कार्यरत आहेत. त्या एम.ए. अर्थशास्त्र पदवीधर असून त्यांचे दोन काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या दादर शाखेच्या त्या माजी अध्यक्ष आणि सध्या मुंबई जिल्ह्याच्या प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानच्या वतीने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते त्यांचा साहित्यिक व इतर क्षेत्रातील सेवेबद्दल सन्मान करण्यात आला आहे. सत्यशोधक मंडळाचे संस्थापक हमीद दलवाई यांच्या संस्थेतर्फे हमीद दलवाई पुरस्कारानेही त्या सन्मानित आहेत.

त्यांनी स्वतः स्थापन केलेल्या “फर्ज फाऊंडेशन”च्या माध्यमातून त्या सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सदस्या, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सांस्कृतिक विभाग माजी कार्याध्यक्षा व सध्या जवाहर बालमंचच्या त्या महाराष्ट्राच्या समन्वयक म्हणून काम पाहात आहेत. नाशिकच्या अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनातील कवयित्री संमेलनाचे अध्यक्षपद भूषविण्याची संधी त्यांना मिळाली होती. आता नागपूर येथे भरणाऱ्या पहिल्या राज्यस्तरीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांना देण्यात आले आहे. त्यांच्या निवडीबद्दल मराठी सारस्वत तसेच मुस्लिम समाजाकडून विशेषतः महिला वर्गाकडून त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात येत आहे.

Continue reading

आता विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयांतच मिळणार एसटीचे पास

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी-विद्यार्थिनीसाठी “एसटी पास थेट तुमच्या शाळेत” ही मोहिम राबविण्यात येणार असून त्यामुळे आता एसटीचे पास थेट त्यांच्या शाळा-महाविद्यालयात वितरित करण्यात येणार आहेत. राज्याचे परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्ये रस्ते परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी...

रत्नागिरी, रायगड जिल्हयाला पुढच्या २४ तासांसाठी पावसाचा रेड अलर्ट

भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार पुढच्या २४ तासांसाठी महाराष्ट्रातल्या रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांना रेड अलर्ट तर पालघर, ठाणे, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट आणि सिंधुदूर्ग यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. प्रशासनातर्फे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) व राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) पथकांना आपत्कालीन परिस्थितीकरीता सतर्क राहण्याच्या...

पंतप्रधान मोदी 4 दिवसांच्या परदेशवारीसाठी रवाना

पाकिस्तानवरच्या लष्करी कारवाईनंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तीन देशांच्या दौऱ्याकरीता रवाना झाले. या दौऱ्यात पंतप्रधान सायप्रस प्रजासत्ताक, कॅनडा आणि क्रोएशिया या तीन देशांना भेटी देतील. येत्या ते 19 जूनला पंतप्रधान मोदी मायदेशी परततील. सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्तोदौलिदीस यांच्या निमंत्रणावरुन...
Skip to content