Homeटॉप स्टोरीम्हाडा परीक्षेची फी...

म्हाडा परीक्षेची फी मिळणार परत, पुढची परीक्षाही फुकट!

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच राज्याचे गृहनिर्माण मंत्री व राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आज होणारी म्हाडाची परीक्षा रद्द केल्यामुळे एक लाखांहून अधिक विद्यार्थांनी प्रचंड संताप व्यक्त केला.

दरम्यान, म्हाडाच्या परीक्षा अचानक रद्द करण्यात आल्यामुळे विद्यार्थांना मनःस्ताप झाला. सर्व विद्यार्थांची आपण मनापासून माफी मागतो. या सर्व विद्यार्थांची परीक्षा फी माफ केली जाणार आहे. त्याशिवाय, पुढील परीक्षेला त्यांच्याकडून कोणतीही फी घेतली जाणार नाही. यापुढे म्हाडा स्वत: प्रश्नपत्रिका तयार करेल, असे आव्हाड यांनी जाहीर केले.

आव्हाड यांनी मध्यरात्रीनंतर दोन वाजण्याच्या सुमारास ट्विट करून आज, रविवारी व त्यानंतर होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली असल्याचे जाहीर केले. तोपर्यंत एसटीच्या अनिश्चिततेच्या गर्तेत सापडलेल्या अनेक विद्यार्थांनी परीक्षा केंद्रांच्या दिशेने वाटचालही केली होती. परीक्षा केंद्रांवर परीक्षेच्या आधी केंद्रांवर या विद्यार्थ्यांना परीक्षाच रद्द झाल्याचे समजले. त्यामुळे अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांचा तीव्र संताप व्यक्त झाला.

म्हाडा

दुपारी पत्रकार परिषद घेत जितेंद्र आव्हाड यांनी यावर स्पष्टीकरण दिले. म्हाडाचा पेपर फुटलाच नाही, पण परीक्षेआधीच गोपनीयेतेचा भंग झाला होता. पेपर फोडण्याआधीच पोलिसांनी पेपरफुटीतील टोळीला पकडले. आरोग्य विभागाच्या पेपरफुटीतील आरोपींच्या संवादात म्हाडाच्या प्रश्नपत्रिकेचा उल्लेख झाला होता. म्हाडाच्या अधिकाऱ्यांना हे समजल्यानंतर त्वरित पेपर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे ते म्हणाले.

जानेवारीत होणार परीक्षा

आज म्हाडासाठी सकाळच्या सत्रात कार्यकारी अभियंता, उपअभियंता, सहायक अभियंता आणि सहायक विधि सल्लागार तर दुपारच्या सत्रात कनिष्ठ अभियंता पदाची परीक्षा होणार होती. या परीक्षेसाठी सकाळच्या सत्रात 50 हजार तर दुपारच्या सत्रात 56 हजार उमेदवार परीक्षा देणार होते. ही परीक्षा जानेवारी महिन्यात होईल असेदेखील जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले.

भ्रष्टाचार, अनास्था आणि निर्लज्जतेचा कळस! – देवेंद्र फडणवीस

आज पुन्हा लाखो विद्यार्थ्यांना फटका बसलाय! नोकरी देऊ शकत नसाल तर किमान त्यांची अशी थट्टा तर करू नका! दोषींवर कठोर कारवाई कराच! पण, सरकार म्हणून कुणी याची जबाबदारी घेणार की नाही, असा सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर केला आहे.

Continue reading

एलिमेंट्स आर्ट क्लासेसचे अप्रतिम प्रदर्शन

एलिमेंट्स आर्ट क्लासेस च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्याच्या कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण आर्ट गॅलरी येथे पंचतत्व या तीन दिवसांचे वार्षिक कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सहा ते १८ वर्षे वयोगटातल्या जवळजवळ ४५ विद्यार्थ्यांच्या सुमारे ९० कलाकृती या प्रदर्शनात...

अकरावी प्रवेशासाठी नंतर सादर करा गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला

राज्यातल्या इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेत सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या निर्देशानंतर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची अट शिथिल केली आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर...

सौरभ विजय यांनी दिला डिजिटल नवोपक्रमावर भर

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे (UIDAI) मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ विजय यांनी मुंबईतील युआयडीएआय प्रादेशिक कार्यालयाला नुकतीच भेट दिली. मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच प्रादेशिक दौरा आहे. युआयडीएआय प्रादेशिक कार्यालय,...
Skip to content