Homeटॉप स्टोरीआजही पवारांची मित्रपक्षांवर...

आजही पवारांची मित्रपक्षांवर कुरघोडी! पुन्हा पावसात भिजण्याचा प्रयोग!!

बदलापूर मध्ये घडलेल्या चिमुकल्यांवरील लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेला ‘महाराष्ट्र बंद’ मागे घेण्यापासून आपल्या मित्रपक्षांवर केलेली कुरघोडी आज शरद पवार यांनी कायम राखली. त्याचप्रमाणे भरपावसात भिजत आंदोलन करून शरद पवार यांनी मागच्या लोकसभा निवडणुकीत लोकांकडून मिळालेली सहानुभूती पुन्हा मिळवण्याचा प्रयत्नही केला.

आज सकाळी अकरा वाजल्यापासून बारा वाजेपर्यंत, असा एक तास तोंडाला काळी पट्टी लावून तसेच काळे झेंडे घेऊन निषेध करण्याचे आंदोलन काल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर केले होते. हे जाहीर करताना त्यांनी आपण, याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी, तसेच शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्याबरोबर चर्चा केली असल्याचे सांगितले. महाविकास आघाडीतर्फे हे आंदोलन केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र आज सकाळी दहा वाजण्याच्या आधीच शरद पवार यांनी पुण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून निषेध आंदोलनाला सुरुवात केली. वयोमानानुसार ते खाली बसू शकले नसले तरी खुर्चीवर मात्र ते स्थानापन्न झाले.

त्यांनी तोंडाला काळा मास्क लावला होता. त्यांच्या पक्षाच्या प्रमुख नेत्या खासदार सुप्रिया सुळे याही त्यावेळी हजर होत्या. काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी, आमदार रवींद्र धंगेकरही शरद पवार यांच्या बाजूला दिसत होते. मात्र मोहन जोशींनी तोंडाला काळी पट्टी लावल्याचे किंवा तसा मास्क लावल्याचे दिसून आले नाही. किंबहुना तेथे उपस्थित असलेल्या अनेकांनी तोंडाला मास्क लावण्याऐवजी कपाळावर, डोक्यावर काळी रिबीन लावली होती. काही जणांनी दंडाला काळा पट्ट्या लावल्या होत्या. त्यातच पुण्यात पावसाला सुरुवात झाली आणि भर पावसातच पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी हे आंदोलन पुढे चालू ठेवले. सुप्रिया सुळे यांनीही आपल्या साडीचा काळा पदर डोक्यावरून घेत पावसातच खुर्चीत बसकण मारली होती. कदाचित मागच्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापूरमध्ये भरपावसात केलेल्या भाषणाने राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांचा विजय सोपा केला होता, तसा इम्पॅक्ट यावेळीही होईल का, असा प्रयत्न त्यांच्याकडून केला गेला असावा, अशी चर्चा तेथे उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये होत होती.

शपथपत्राचे वाचन करत शरद पवारांनी ११ वाजून पाच मिनिटांनी आंदोलन संपवले आणि त्यांचा ताफा रवानाही झाला. मात्र, तोपर्यंत ना उद्धव ठाकरे आपल्या आंदोलनस्थळी पोहोचले, ना नाना पटोले. साडेअकरा वाजोपर्यंततरी त्यांच्या नियोजित आंदोलनस्थळी त्यांचे समर्थकच आपल्या नेत्यासाठी ताटकळत होते.

Continue reading

प्री आणि पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी 31 जानेवारीपर्यंत करा अर्ज

मुंबई शहर जिल्ह्यातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी प्री-मॅट्रिक (इ. 9वी व 10वी) व पोस्ट-मॅट्रिक (इ. 11वी ते पदव्युत्तर / व्यावसायिक अभ्यासक्रम) शिष्यवृत्तीच्या लाभासाठी एनएसपी (नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर) येत्या 31 जानेवारीपर्यंत सादर करावेत, असे इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, मुंबई शहरचे सहाय्यक संचालक रविकिरण पाटील यांनी कळविले आहे. केंद्र...

मकर संक्रांत म्हणजे काय?

मकर संक्रात या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. भारतीय संस्कृतीत हा सण आपापसातील कलह विसरून प्रेमभाव वाढवण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक जीव ‘तीळगूळ घ्या, गोड बोला’ असे म्हणून जवळ येतो. हा सण तिथीवाचक नाही. मकर संक्रांतीचा...

कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना नवतंत्रज्ञानाची माहिती

देशातील अव्वल बायोडायव्हर्सिटी आणि विविध पिकांची उत्पादनक्षमता असलेल्या नंदुरबार जिल्हा व परिसरातील कष्टाळू व प्रयोगशील शेतकऱ्यांना शहादा येथे नुकत्याच झालेल्या ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनासारख्या आयोजनातून नवतंत्रज्ञानाचे उपयुक्त मार्गदर्शन मिळते. त्याचा उपयोग करून नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी तसेच शेतकरी उत्पादक गट क्रांती...
Skip to content