Homeकल्चर +बिग बॉसमध्ये आज...

बिग बॉसमध्ये आज ‘खुल जा सिमसिम’!

बिग बॉस मराठीच्या घरात सुरू असलेल्या “हल्ला बोल” टास्कला काल पूर्णविराम लागला. टीम ए आणि टीम बीमधून टीम एचा विजय झाला. मोटरबाईकवर जय आणि गायत्री बसले होते. कार्याचा संचालक उत्कर्ष बायस्ड खेळला असं मत टीम बीमधल्या सदस्यांनी मांडलं आणि त्याच्या निर्णयाचा निषेध केला.

टीम ए या कार्यामध्ये विजयी ठरली आणि यामधूनच कॅप्टन्सी कार्यासाठी दोन उमेदवार निवडण्याचा आदेश बिग बॉसने विजेत्या टीमला दिला. विचारविनिमयानंतर जय आणि गायत्री ही दोन नावं पुढे आली.

आज या दोघांमध्ये रंगणार आहे “खुलजा सिमसिम” हे कॅप्टन्सी कार्य. कॅप्टन्सी पदासाठी स्पर्धक पुन्हा एकदा एकमेकांविरुद्ध भिडताना दिसणार आहेत. तेव्हा बघुया कोण या कार्यात जिंकणार? कोणाला मिळणार कॅप्टन होण्याचा बहुमान?

बिग बॉसच्या घरात कधी कोणत्या सदस्याला कोणाची गरज लागेल हे सांगता येत नाही. त्यामुळे प्रत्येक वेळेला खूप विचार करून बोलणं, वागणं अतिशय महत्त्वाचे असते. या घरात सगळंच अनिश्चित आहे असं म्हणायला हरकत नाही. त्याचंच उदाहरण म्हणजे आज विकाससोबत गायत्री चर्चा करताना दिसणार आहे.

हल्लाबोल या टास्कमध्ये जे घडलं ते आपण पहिलंच. गायत्री विकासला सांगणार आहे, “जर मी कॅप्टन बनले तर जयपेक्षा जास्त निष्पक्ष राहू शकते. जयपेक्षा जास्त शांतता मी ठेऊ शकते. टास्कच्या वेळचा आरडाओरडा आणि मारामारी होणार नाही आणि फेअर प्ले मी करू शकते असं मला वाटतं.

जर तू मला पाठिंबा दिलास, तर मला वाटतं.. ही आपल्यासाठी नवीन सुरुवात असेल. जे काही घडलं त्यानंतर ही एक चांगली सुरुवात असेल. माझ्या डोक्यात काही नाही, तुझ्या डोक्यात काही नाही.

विकास तिला सांगताना दिसणार आहे, “जर अशी कुठली वेळ आली आणि मला तुझी गरज लागली एज अ कॅप्टन तू मला साथ देशील का?

गायत्री त्याला सांगणार आहे, माझ्याकडे असं कोणीच अजून तरी मागितलेलं नाहीये. तेव्हा मी नक्की प्रयत्न करेन तसं करण्याचा”.

बिग बॉसचा कार्यक्रम आणि त्यामधले वेगवेगळे टास्क यांची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात रंगत आहे. “खुलजा सिमसिम” या टास्कसाठीदेखील सदस्य तितक्याच मेहनतीने लढत देणार यात काहीच शंका नाही.

हिंदीमध्ये म्हण आहे ना, “अब आया ऊँट पहाड़ के नीचे” तशी गत होणार आहे. हल्लाबोल, या टास्कसाठी दोन्ही टीममधल्या सदस्यांनी एकमेकांना खडेबोल सुनावले. जय आणि गायत्रीने टीम बीमधून आलेल्या दोन्ही जोड्यांना मोटार बाईकवरून उठवण्यासाठी बरीच मेहनत घेतली, खूप काही ऐकवले. आज जय आणि गायत्रीला कॅप्टन बनण्यासाठी याच सदस्यांच्या पाठिंब्याची गरज लागणार आहे. तो पाठिंबा मिळवण्यासाठी त्यांना घरातील सदस्यांना पटवून द्यायचे आहे की, ते उत्तम कॅप्टन कसे आहेत आणि इतर सदस्यांनी त्यांना त्यांचे मत का द्यावं.

अत्यंत कठीण दिसणारा हा टास्क हे सदस्य कसा पार पाडतील? कोण बनेल घराचा नवा कॅप्टन हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे. 

जय आज सुरेखाताईंना मनवताना दिसणार आहे. जय हा ताई, ताई.. करत त्यांना विनंती करताना दिसणार आहे. त्यावर सुरेखाताई म्हणतात, “अच्छा ताई? मध्ये काय काय झालं आहे माहिती आहे ना? मला विचार करू दे..

पहिली दुश्मन आहे. मला सॉरी म्हणून माझ्या अंगावर कचरा टाकणारी.

गायत्री त्यावर म्हणते, बघ ना ताई, मी किती गोड आहे.. जय पण संधी साधतो. बघा मी कचरा नाही टाकला. त्यावर सुरेखाताई म्हणतात, तू जे टाकलं आहेस ना ते मला पुढचे चार दिवस आठवत आहे. मी विचार करते थोडा..

ते तुमच्यात काय करतात ना “डील”.. काय असेल डील? मला आवडलं हे खूप डील.. तू जर जिंकलास तर तुझे अर्धे पैसे मला देशील. बघूया सुरेखाताईंचे मत कोणाला मिळणार?

आज रात्री बिग बॉस मराठी, कलर्स मराठीवर..

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content