Homeकल्चर +उद्या विनामूल्य आनंद...

उद्या विनामूल्य आनंद घ्या ‘शतजन्म शोधिताना’…

मुंबईच्या स्वा. सावरकर स्मारकात उद्या म्हणजेच रविवारी, २८ मे रोजी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १४०व्या जयंतीदिनी ‘शतजन्म शोधिताना’ हा भव्य संगीतमय कार्यक्रम होत आहे.

दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडई उत्कर्ष मंडळ यांनी याचे आयोजन केले आहे. स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि महाराष्ट्र मिलिटरी स्कूल, मुरबाड यांनी याची निर्मिती केली आहे. स्वा. सावरकर यांची अलौकिक काव्यप्रतिभा आणि त्यांचे कार्यकर्तृत्व लोकांपर्यंत पोहोचवणारा हा आगळावेगळा कार्यक्रम आहे. रविवारी, २८ मे २०२३ या दिवशी सकाळी १० वाजता स्वा. सावरकर स्मारकाच्या सभागृहात हा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाच्या विनामूल्य प्रवेशिकांसाठी स्वा. सावरकर स्मारकाच्या ९२२००७०३८६, या क्रमांकावर किंवा हरिश्चंद्र शिंदे यांच्याशी ९०८२३४५७२९ क्रमांकावर संपर्क साधावा. हा कार्यक्रम विनामूल्य असून त्यासाठी आधी प्रवेशिका घेणे आवश्यक आहे.

स्वा. सावरकर यांच्या विविध प्रकारच्या कविता, गीते यांचे संगीतबद्ध सादरीकरण करून त्यावर नृत्याचाही अविष्कार करीत हा ‘शतजन्म शोधिताना’ कार्यक्रम प्रेक्षकांना, रसिकांना आणि सावरकरप्रेमींना खिळवून ठेवतो. याची संकल्पना संहिता आणि निवेदन मंजिरी मराठे यांचे असून संगीत दिग्दर्शन वर्षा भावे आणि नृत्य दिग्दर्शन डॉ. रुपाली देसाई यांचे आहे. संगीत संयोजन कमलेश भडकमकर यांचे आहे. सावरकरांच्या अलौकिक अशा प्रतिभेचा शोध यानिमित्ताने घेतला गेला आहे.

Continue reading

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...
Skip to content