Homeकल्चर +शनिवार-रविवारी आनंद घ्या...

शनिवार-रविवारी आनंद घ्या ‘आनंदवारी-नर्मदा आणि पंढरी’चा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे गेली वीस वर्षे ‘अध्यात्मरंग महोत्सव’ आयोजित करण्यात येत आहे. या महोत्सवांतर्गत अनेक विचारवंतांची व्याख्याने, किर्तने, प्रवचने सादर करण्यात आली. या वर्षी हा महोत्सव येत्या शनिवार व रविवारी म्हणजेच ७ आणि ८ ऑक्टोबरला ‘आनंदवारी-नर्मदा आणि पंढरी’ या शीर्षकाखाली आयोजित करण्यात आला आहे.

शनिवार दि. ७ ॲाक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता उदयन् आचार्य यांचे ‘नर्मदा परिक्रमा-एक आनंदयात्रा’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. याच नावाचे त्यांचे पुस्तक प्रकाशित झाले असून परिक्रमेतील त्यांचे अनुभव त्यांनी ओघवत्या शैलीत लिहिले आहेत. त्यांच्या व्याख्यानातून श्रोत्यांना परिक्रमेचा अनुभव घेतल्याचा आनंद मिळेल. उदयन् आचार्य नर्मदा तटावरील महेश्वर येथील सप्तमातृका मंदिरात वर्षातील बराच काळ वास्तव्य करून परिक्रमावासींची सेवा करतात.

रविवार दि. ८ ॲाक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता सुधीर महाबळ हे ‘एक तरी वारी अनुभवावी’ या विषयावर पंढरपूर वारीबद्दल बोलतील. वारी आणि परतवारीवरही ते आपले अनुभव कथन करतील. इलेक्ट्रॅानिक्स इंजिनिअर असलेल्या महाबळ यांनी बहुराष्ट्रीय कंपनीत मोठ्या पदावर काम केले आहे. आवड म्हणून ते अनेक वर्षं वारी आणि परतवारी करीत असून त्यांच्या “परतवारी” या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य शासनाचा प्रथम पुरस्कार मिळाला आहे.

हा महोत्सव सर्वांसाठी खुला असून श्रोत्यांनी या व्याख्यानांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे. संस्थेच्या वा. वा. गोखले या वातानुकूलित सभागृहात ही व्याख्याने होतील. अधिक माहितीसाठी संपर्क- २४३०४१५०

Continue reading

विधिमंडळात आजही गदारोळ?

विधानसभेत अध्यक्षांसमोरील राजदंडाला स्पर्श करत निदर्शने केल्यामुळे काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांना विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंगळवारच्या संपूर्ण दिवसभराच्या कामकाजासाठी सभागृहातून निलंबित केले. विधिमंडळात आजही काँग्रेससह विरोधी पक्षांच्या सदस्यांकडून कृषीमंत्र्यांच्या कथित वादग्रस्त विधानांविरूद्ध आक्रमक भूमिका घेतली जाण्याची शक्यता...

रविवारी आस्वाद घ्या आरती ठाकूर-कुंडलकर यांच्या गायनाचा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने कै. पं. के. जी. गिंडे यांच्या स्मरणार्थ आरती ठाकूर – कुंडलकर यांचे गायन येत्या रविवारी, ६ जुलैला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी त्यांना संजय देशपांडे तबला...

सरकारी ‘चरणसेवे’चा १ लाख ४० हजार वारकऱ्यांनी घेतला लाभ

आषाढी वारीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील लाखो वारकरी पायी चालत विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघाले आहेत. या थकवणाऱ्या प्रवासात त्यांच्या पायांना विश्रांती आणि आरोग्यसुविधा मिळाव्यात यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘चरणसेवा’ उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता...
Skip to content