Homeन्यूज ॲट अ ग्लांसउत्तर प्रदेशात एन्काऊंटरचे...

उत्तर प्रदेशात एन्काऊंटरचे सत्र सुरूच!

उत्तर प्रदेशमध्ये संशयित आरोपीचा एन्काऊंटर (पोलीस चकमक) करण्याचे सत्र अजूनही चालूच आहे. आज बेहराईचमधल्या रामगोपाल मिश्रा यांच्या हत्त्येतल्या दोघा संशयित आरोपींबरोबर पोलिसांची चकमक झाली. त्यात सर्फराज आणि तालीब, हे दोन आरोपी जखमी झाल्याचे समजते. गेल्या ७ वर्षांत उत्तर प्रदेशात १२ हजार ९६४ म्हणजेच जवळजवळ १३ हजार पोलीस चकमकी झाल्या आहेत. त्यात २०७ नामचीन गुंड मारले गेले तर १७ पोलिसांचा बळी गेला आहे.

13 ऑक्टोबरला दुर्गामातेच्या विसर्जनाच्या मिरवणुकीत झालेल्या हिंसाचारात रामगोपाल मिश्रा यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्त्या प्रकरणातील सर्वच्या सर्व पाच आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात आहेत. या प्रकरणातला एक आरोपी काल पोलिसांच्या ताब्यात आला. त्यानंतर आज पोलिसांनी उत्तर प्रदेशातून नेपाळला पळून जात असलेल्या चार आरोपींना पकडले.

या आरोपींना बसहरी नहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोठ्या कालव्याजवळ रोखण्यात आले. पोलिसांनी हटकताच आरोपींनी पोलिसांवर गोळ्या झाडल्या. त्यानंतर पोलिसांनी स्वरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात दोन आरोपी जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. एकाच्या डाव्या तर दुसऱ्याच्या उजव्या पायात गोळ्या घुसल्या आहेत. या दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे बहराईचच्या पोलीस अधीक्षक वृंदा शुक्ला यांनी माध्यमांना सांगितले.

दरम्यान, आरोपी सर्फराजची बहीण रूख्सार यांनी ही चकमक बनावट असल्याचा आरोप केला ाहे. पोलिसांनी कालच आपल्या भावाला घरातून पकडून नेले होते. त्यामुळे आज तो नेपाळला पळून जाण्याच्या प्रयत्नात कसा असू शकतो, असा सवाल माध्यमांकडे केला.

Continue reading

मराठी शाळांकडील शासकीय दुर्लक्ष अत्यंत घातकी!

महाराष्ट्र शसनाने मराठी शाळांकडे केलेले दुर्लक्ष अत्यंत घातक टप्प्यावर पोहोचले आहे. नरेंद्र जाधव समितीचा फार्स आणि मुंबई महानगरपालिकेसारख्या यंत्रणेकडून जाणीवपूर्वक अनुदानित शाळा बंद पाडण्याचे कारस्थान, हा या व्यापक योजनेचाच भाग आहे. याबद्दल शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली पाहिजे. राजकीय...

पुणेकरांची करोडोंची होणारी ‘दिवाळी लूटमार’ यंदा बंद!

पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिकांची होणारी करोडो रुपयांची "दिवाळी लूटमार" यंदा बंद होणार! दरवर्षी दिवाळीत, पुण्यातील सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांची पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून काही भामटे आर्थिक फसवणूक करत होते. व्यावसायिक...

अकोला, अहिल्यानगर, अलिबागेतून मान्सून परतला! आज राज्यातून एक्झिट!!

राज्यातील मान्सूनच्या माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अकोला, अहिल्यानगर, अलिबाग या रेषेच्या वरील भागातून मान्सूनने माघार घेतली आहे. आता येत्या 24 तासात मान्सूनची महाराष्ट्रातून पूर्ण एक्झिट होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तविला आहे. रिटर्न मान्सूनसाठी उर्वरित राज्यात वातावरण...
Skip to content