Homeन्यूज ॲट अ ग्लांसउत्तर प्रदेशात एन्काऊंटरचे...

उत्तर प्रदेशात एन्काऊंटरचे सत्र सुरूच!

उत्तर प्रदेशमध्ये संशयित आरोपीचा एन्काऊंटर (पोलीस चकमक) करण्याचे सत्र अजूनही चालूच आहे. आज बेहराईचमधल्या रामगोपाल मिश्रा यांच्या हत्त्येतल्या दोघा संशयित आरोपींबरोबर पोलिसांची चकमक झाली. त्यात सर्फराज आणि तालीब, हे दोन आरोपी जखमी झाल्याचे समजते. गेल्या ७ वर्षांत उत्तर प्रदेशात १२ हजार ९६४ म्हणजेच जवळजवळ १३ हजार पोलीस चकमकी झाल्या आहेत. त्यात २०७ नामचीन गुंड मारले गेले तर १७ पोलिसांचा बळी गेला आहे.

13 ऑक्टोबरला दुर्गामातेच्या विसर्जनाच्या मिरवणुकीत झालेल्या हिंसाचारात रामगोपाल मिश्रा यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्त्या प्रकरणातील सर्वच्या सर्व पाच आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात आहेत. या प्रकरणातला एक आरोपी काल पोलिसांच्या ताब्यात आला. त्यानंतर आज पोलिसांनी उत्तर प्रदेशातून नेपाळला पळून जात असलेल्या चार आरोपींना पकडले.

या आरोपींना बसहरी नहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोठ्या कालव्याजवळ रोखण्यात आले. पोलिसांनी हटकताच आरोपींनी पोलिसांवर गोळ्या झाडल्या. त्यानंतर पोलिसांनी स्वरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात दोन आरोपी जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. एकाच्या डाव्या तर दुसऱ्याच्या उजव्या पायात गोळ्या घुसल्या आहेत. या दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे बहराईचच्या पोलीस अधीक्षक वृंदा शुक्ला यांनी माध्यमांना सांगितले.

दरम्यान, आरोपी सर्फराजची बहीण रूख्सार यांनी ही चकमक बनावट असल्याचा आरोप केला ाहे. पोलिसांनी कालच आपल्या भावाला घरातून पकडून नेले होते. त्यामुळे आज तो नेपाळला पळून जाण्याच्या प्रयत्नात कसा असू शकतो, असा सवाल माध्यमांकडे केला.

Continue reading

प्री आणि पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी 31 जानेवारीपर्यंत करा अर्ज

मुंबई शहर जिल्ह्यातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी प्री-मॅट्रिक (इ. 9वी व 10वी) व पोस्ट-मॅट्रिक (इ. 11वी ते पदव्युत्तर / व्यावसायिक अभ्यासक्रम) शिष्यवृत्तीच्या लाभासाठी एनएसपी (नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर) येत्या 31 जानेवारीपर्यंत सादर करावेत, असे इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, मुंबई शहरचे सहाय्यक संचालक रविकिरण पाटील यांनी कळविले आहे. केंद्र...

मकर संक्रांत म्हणजे काय?

मकर संक्रात या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. भारतीय संस्कृतीत हा सण आपापसातील कलह विसरून प्रेमभाव वाढवण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक जीव ‘तीळगूळ घ्या, गोड बोला’ असे म्हणून जवळ येतो. हा सण तिथीवाचक नाही. मकर संक्रांतीचा...

कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना नवतंत्रज्ञानाची माहिती

देशातील अव्वल बायोडायव्हर्सिटी आणि विविध पिकांची उत्पादनक्षमता असलेल्या नंदुरबार जिल्हा व परिसरातील कष्टाळू व प्रयोगशील शेतकऱ्यांना शहादा येथे नुकत्याच झालेल्या ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनासारख्या आयोजनातून नवतंत्रज्ञानाचे उपयुक्त मार्गदर्शन मिळते. त्याचा उपयोग करून नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी तसेच शेतकरी उत्पादक गट क्रांती...
Skip to content