Homeन्यूज ॲट अ ग्लांसउत्तर प्रदेशात एन्काऊंटरचे...

उत्तर प्रदेशात एन्काऊंटरचे सत्र सुरूच!

उत्तर प्रदेशमध्ये संशयित आरोपीचा एन्काऊंटर (पोलीस चकमक) करण्याचे सत्र अजूनही चालूच आहे. आज बेहराईचमधल्या रामगोपाल मिश्रा यांच्या हत्त्येतल्या दोघा संशयित आरोपींबरोबर पोलिसांची चकमक झाली. त्यात सर्फराज आणि तालीब, हे दोन आरोपी जखमी झाल्याचे समजते. गेल्या ७ वर्षांत उत्तर प्रदेशात १२ हजार ९६४ म्हणजेच जवळजवळ १३ हजार पोलीस चकमकी झाल्या आहेत. त्यात २०७ नामचीन गुंड मारले गेले तर १७ पोलिसांचा बळी गेला आहे.

13 ऑक्टोबरला दुर्गामातेच्या विसर्जनाच्या मिरवणुकीत झालेल्या हिंसाचारात रामगोपाल मिश्रा यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्त्या प्रकरणातील सर्वच्या सर्व पाच आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात आहेत. या प्रकरणातला एक आरोपी काल पोलिसांच्या ताब्यात आला. त्यानंतर आज पोलिसांनी उत्तर प्रदेशातून नेपाळला पळून जात असलेल्या चार आरोपींना पकडले.

या आरोपींना बसहरी नहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोठ्या कालव्याजवळ रोखण्यात आले. पोलिसांनी हटकताच आरोपींनी पोलिसांवर गोळ्या झाडल्या. त्यानंतर पोलिसांनी स्वरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात दोन आरोपी जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. एकाच्या डाव्या तर दुसऱ्याच्या उजव्या पायात गोळ्या घुसल्या आहेत. या दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे बहराईचच्या पोलीस अधीक्षक वृंदा शुक्ला यांनी माध्यमांना सांगितले.

दरम्यान, आरोपी सर्फराजची बहीण रूख्सार यांनी ही चकमक बनावट असल्याचा आरोप केला ाहे. पोलिसांनी कालच आपल्या भावाला घरातून पकडून नेले होते. त्यामुळे आज तो नेपाळला पळून जाण्याच्या प्रयत्नात कसा असू शकतो, असा सवाल माध्यमांकडे केला.

Continue reading

हक्कभंग समितीसमोर माफी मागण्यास कुणाल कामराचा ठाम नकार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या उपरोधिक विडंबनामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने गुरुवारी महाराष्ट्र विधान परिषद विशेषाधिकार (हक्कभंग) समितीसमोर हजर होऊन माफी मागण्यास पुन्हा एकदा स्पष्ट नकार दिला आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दाखल केलेल्या...

म. गांधीजींच्या गावातच गुजरात सरकारकडून मद्यविक्रीला परवानगी!

महात्मा गांधींचे जन्मस्थान असलेल्या पोरबंदरमध्ये इतिहासात पहिल्यांदाच गुजरात सरकारकडून, एका आलिशान हॉटेलला मद्यविक्रीचा परवाना मंजूर करण्यात आला आहे. गुजरात राज्य उत्पादन शुल्क आणि प्रतिबंध विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे शहरात वादाला तोंड फुटले असून, गांधीवादी संस्था आणि स्थानिक नागरिकांनी याविरोधात...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी पूर्णपणे डिजिटल, जुनी पद्धत बंद!

कल्पना करा, तुमच्या कुटुंबातील एखाद्या गरीब रुग्णाला महागड्या उपचाराची गरज आहे. पूर्वीच्या काळात नातेवाईकांना मंत्रालयापर्यंत धावपळ करावी लागायची, कागदपत्रांची रास भरावी लागायची, दलालांच्या जाळ्यात अडकावे लागायचे आणि उपचारात विलंब होऊन रुग्णाची स्थिती बिघडायची. पण आता ती सगळी कहाणी संपली!...
Skip to content