Homeमुंबई स्पेशलमुंबईत ईदची सुट्टी...

मुंबईत ईदची सुट्टी १८ तारखेला!

राज्य सरकारने ईद-ए-मिलादची सुट्टी मुंबई तसेच इतर काही जिल्ह्यांमध्ये येत्या सोमवार, १६ सप्टेंबरऐवजी बुधवार, १८ सप्टेंबर रोजी जाहीर केली आहे.

राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या २४ सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये ईद-ए-मिलादची सुट्टी सोमवार, १६ सप्टेंबर २०२४ रोजी दर्शविण्यात आलेली आहे. ईद-ए-मिलाद, हा मुस्लिमधर्मियांचा सण मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात साजरा करतात. यावेळी जुलूस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. मंगळवारी १७ सप्टेंबर २०२४ रोजी अनंत चतुर्दशी, हा हिंदूचा सण असल्याने दोन्ही समाजामध्ये शांतता व सामाजिक सलोखा कायम राहण्याच्या हेतूने यावर्षी मुंबई शहर, मुंबई उपनगर व इतर काही जिल्ह्यांमध्ये मुस्लिमधर्मियांनी बुधवार, १८ सप्टेंबर २०२४ रोजी जुलूस काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे १८ सप्टेंबरला ईदची शासकीय सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी मुस्लिमधर्मियांनी केली होती.

या मागणीचा विचार करून शासनाने मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यांत सोमवार, १६ सप्टेंबर २०२४ रोजी घोषित केलेली ईद-ए-मिलादची सार्वजनिक सुट्टी रद्द करून ती आता बुधवार, १८ सप्टेंबर २०२४ या दिवशी जाहीर केली आहे. तशी अधिसूचना सामान्य प्रशासन विभागाने निर्गमित केली आहे.

मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यांव्यतिरिक्त राज्यातील इतर संबंधित जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी मुस्लिमधर्मियांकडून काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीचा दिनांक विचारात घेऊन सोमवार, १६ सप्टेंबर २०२४ रोजी जाहीर केलेली सार्वजनिक सुट्टी कायम ठेवावी किंवा ती रद्द करून बुधवार, १८ सप्टेंबर २०२४ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी याबाबत निर्णय घ्यावा, असे सामान्य प्रशासन विभागाने कळविले आहे.

Continue reading

भायखळ्याच्या भोसले उद्यानात आजपासून ‘मुंबई पुष्पोत्सव’!

मुंबई महापालिका आणि वृक्ष प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने भायखळ्याच्या येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात आजपासून रविवार, ८ फेब्रुवारीपर्यंत उद्यानविद्या प्रदर्शन अर्थात ‘मुंबई पुष्पोत्सव’ आयोजित करण्यात येणार आहे. उद्घाटनानंतर आज रात्री ८ वाजेपर्यंत पुष्पोत्सव सर्वांसाठी खुला राहील....

संगीत-नाट्य क्षेत्रातल्या रसिकांनी अनुभवले भावूक क्षण!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात झालेल्या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्याने उत्साहाचे आणि कलेच्या गौरवाचे वातावरण निर्माण झाले. संगीत, नाटक, साहित्य आणि अभिनय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कलाकारांना यंदा मानांकित करण्यात आले, ज्यामुळे उपस्थित रसिकांनी दाद देत टाळ्यांचा कडकडाट...

सयाजी नगरी एक्सप्रेस ठरली मुंबईतली पहिली ‘कवच’धारी गाडी!

पश्चिम रेल्वेने विरार-बडोदा विभागात अपघातापासून बचाव करणारी ‘कवच 4.0’ प्रणाली कार्यान्वित केली आहे. गाडी क्रमांक 20907 दादर–भूज सयाजी नगरी एक्सप्रेस, ही मुंबईतून सुटणारी कवच प्रणालीने सुसज्ज असलेली पहिली गाडी ठरली आहे. या गाडीवर हे सुरक्षा कवच बसवण्यात आले आहे....
Skip to content