Tuesday, September 17, 2024
Homeबॅक पेजई. श्रीधरन जॉर्ज...

ई. श्रीधरन जॉर्ज फर्नांडिस पुरस्काराने सन्मानित

रेल्वे मंत्री असताना जॉर्ज फर्नांडिस यांनी कोकण रेल्वे प्रकल्प राबविण्याचे जाहीर केले आणि संरक्षण मंत्री झाल्यानंतरही त्यांनी हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी लक्ष दिले होते. अशा मंडळींच्या इच्छाशक्तीमुळेच हा प्रकल्प ७ वर्षांच्या आश्चर्यकारक कालावधीत पूर्ण झाला. जॉर्ज फर्नांडिस आक्रमक कामगार नेते होते, परंतु व्यक्तिगत आयुष्यात त्यांची साधी राहणी होती. त्यांना अनेक भाषा येत आणि नवनवीन संकल्पना ते राबवत. त्यामुळेच त्यांच्या नावे मिळणारा पुरस्कार हा खरोखरच आनंदाचा क्षण असल्याच्या भावना `मेट्रो मॅन ऑफ इंडिया’, पद्मविभूषण डॉ. ई. श्रीधरन यांनी व्यक्त केल्या.

भारताचे माजी रेल्वे आणि संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस स्मृती राष्ट्रीय पुरस्कार यंदा डॉ. श्रीधरन यांना बंटर भवन, कुर्ला येथे झालेल्या शानदार सोहळ्यात जयश्रीकृष्ण परिसर प्रेमी समितीच्या वतीने प्रदान करण्यात आला. संस्थेचे संस्थापक टी. जयाकृष्ण शेट्टी यांच्या पुढाकाराने आयोजित या सन्मान सोहळ्यात खासदार कॅप्टन ब्रिजेश चौटा, माजी खासदार गोपाळ शेट्टी तसेच देशभरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्रीधरन यांनी राबविलेले कोकण रेल्वे, दिल्ली, कोची, लखनौ, जयपूर, विजयवाडा, कोईमतूर आदी ठिकाणची मेट्रो निर्मिती ही आज काळाची गरज होती. त्यावेळी घेतलेले निर्णय धाडसी आणि अचूक असल्यामुळेच आज आपला देश गतिमान झाला आहे आणि अर्थव्यवस्था बळकट करत आहे. राष्ट्राच्या विकसनशील प्रक्रियेतील श्रीधरन यांचे योगदान सदैव प्रेरणादायी आहे, असे विचार टी. जयाकृष्ण शेट्टी यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच मंगळुरु आंतरराष्ट्रीय विमानतळाला जॉर्ज फर्नांडिस यांचे नाव देण्यासाठी सर्व पक्षीय नेत्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनदेखील त्यांनी केले.

श्रीधरन यांच्या काळात मुलभूत सोयीसुविधांच्या निर्मितीसाठी आव्हानात्मक कार्य होते, तरीही त्यांनी चिकाटीने अनेक प्रकल्प राबवले. कोकण रेल्वेच्या निर्मितीतील त्यांचे योगदान कायम राहणार आहे. भारतात खडतर अशा कोकण रेल्वे आणि विविध शहरांच्या मेट्रो रेल्वेच्या निर्मितीच्या योगदानाबद्दल त्यांना `भारतरत्न’ पुरस्कार मिळावा, अशी भावना गोपाळ शेट्टी यांनी व्यक्त केली. मेट्रो मॅन ऑफ इंडिया’ पद्मविभूषण डॉ. ई. श्रीधरन यांनी व्यक्त केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

आतिशी सिंग दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री!

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज आपल्या पदाचा राजीनामा देत असून दुपारी १२ वाजता दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. जेमतेम चार महिन्यांकरीता असणाऱ्या मुख्यमंत्रीपदी कैलाश गहलोत यांच्या नावाची जोरदार चर्चा झाली. त्यांची निवड झाल्यास हरयाणा विधानसभा निवडणुका...

पंतप्रधान नरेंद्र मोदी @ 74!

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आपला 74वा वाढदिवस साजरा करत असून आजच त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील सरकारला शंभर दिवस पूर्ण होत आहेl. यानिमित्त आज पंतप्रधान मोदी ओरिसामध्ये घरांच्या एका भव्य योजनेचे भूमिपूजन करणार आहेत. देशभरात भारतीय जनता पार्टीकडून आज पंतप्रधान मोदी यांचा...

उद्यापासून हिंदूंचा पितृपक्ष सुरू

हिंदु धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यापैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक असते. माता-पिता तसेच निकटवर्तीय यांचा मृत्यूनंतरचा प्रवास हा सुखमय आणि क्लेशरहित व्हावा, त्यांना सद्गती मिळावी, यासाठीचा संस्कार म्हणजेच ‘श्राद्ध.’ यावर्षी...
error: Content is protected !!
Skip to content