Tuesday, March 11, 2025
Homeबॅक पेजई. श्रीधरन जॉर्ज...

ई. श्रीधरन जॉर्ज फर्नांडिस पुरस्काराने सन्मानित

रेल्वे मंत्री असताना जॉर्ज फर्नांडिस यांनी कोकण रेल्वे प्रकल्प राबविण्याचे जाहीर केले आणि संरक्षण मंत्री झाल्यानंतरही त्यांनी हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी लक्ष दिले होते. अशा मंडळींच्या इच्छाशक्तीमुळेच हा प्रकल्प ७ वर्षांच्या आश्चर्यकारक कालावधीत पूर्ण झाला. जॉर्ज फर्नांडिस आक्रमक कामगार नेते होते, परंतु व्यक्तिगत आयुष्यात त्यांची साधी राहणी होती. त्यांना अनेक भाषा येत आणि नवनवीन संकल्पना ते राबवत. त्यामुळेच त्यांच्या नावे मिळणारा पुरस्कार हा खरोखरच आनंदाचा क्षण असल्याच्या भावना `मेट्रो मॅन ऑफ इंडिया’, पद्मविभूषण डॉ. ई. श्रीधरन यांनी व्यक्त केल्या.

भारताचे माजी रेल्वे आणि संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस स्मृती राष्ट्रीय पुरस्कार यंदा डॉ. श्रीधरन यांना बंटर भवन, कुर्ला येथे झालेल्या शानदार सोहळ्यात जयश्रीकृष्ण परिसर प्रेमी समितीच्या वतीने प्रदान करण्यात आला. संस्थेचे संस्थापक टी. जयाकृष्ण शेट्टी यांच्या पुढाकाराने आयोजित या सन्मान सोहळ्यात खासदार कॅप्टन ब्रिजेश चौटा, माजी खासदार गोपाळ शेट्टी तसेच देशभरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्रीधरन यांनी राबविलेले कोकण रेल्वे, दिल्ली, कोची, लखनौ, जयपूर, विजयवाडा, कोईमतूर आदी ठिकाणची मेट्रो निर्मिती ही आज काळाची गरज होती. त्यावेळी घेतलेले निर्णय धाडसी आणि अचूक असल्यामुळेच आज आपला देश गतिमान झाला आहे आणि अर्थव्यवस्था बळकट करत आहे. राष्ट्राच्या विकसनशील प्रक्रियेतील श्रीधरन यांचे योगदान सदैव प्रेरणादायी आहे, असे विचार टी. जयाकृष्ण शेट्टी यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच मंगळुरु आंतरराष्ट्रीय विमानतळाला जॉर्ज फर्नांडिस यांचे नाव देण्यासाठी सर्व पक्षीय नेत्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनदेखील त्यांनी केले.

श्रीधरन यांच्या काळात मुलभूत सोयीसुविधांच्या निर्मितीसाठी आव्हानात्मक कार्य होते, तरीही त्यांनी चिकाटीने अनेक प्रकल्प राबवले. कोकण रेल्वेच्या निर्मितीतील त्यांचे योगदान कायम राहणार आहे. भारतात खडतर अशा कोकण रेल्वे आणि विविध शहरांच्या मेट्रो रेल्वेच्या निर्मितीच्या योगदानाबद्दल त्यांना `भारतरत्न’ पुरस्कार मिळावा, अशी भावना गोपाळ शेट्टी यांनी व्यक्त केली. मेट्रो मॅन ऑफ इंडिया’ पद्मविभूषण डॉ. ई. श्रीधरन यांनी व्यक्त केल्या.

Continue reading

कुर्ल्यातल्या कबड्डी स्पर्धेत अंबिका, पंढरीनाथ संघांची बाजी

शिवजयंती उत्सवाचे औचित्य साधून मुंबईतल्या कुर्ला (पश्चिम) येथील गांधी मैदानात जय शंकर चौक क्रीडा मंडळ आणि गौरीशंकर क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित पुरुष गटाच्या कबड्डी स्पर्धेत प्रथम श्रेणी गटात अंबिका सेवा मंडळ, कुर्ला...

‘स्वामी समर्थ श्री’साठी राज्यातील दिग्गज उद्या आमनेसामने

क्रीडा क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या "स्वामी समर्थ श्री" राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेच्या माध्यमातून मुंबईकर शरीरसौष्ठवप्रेमींना जानदार, शानदार आणि पीळदार शरीरसौष्ठवपटूंचे ग्लॅमर पाहायला मिळणार आहे. आमदार महेश सावंत यांच्या आयोजनाखाली मुंबईच्या प्रभादेवीत दै. सामना मार्गाशेजारील...

भारतात महिलांच्या आत्महत्त्यांपैकी ३६.६% तरुणींच्या!

पुरुषांपेक्षा महिलांमध्ये चिंता आणि नैराश्य अधिक प्रमाणात असून जागतिक स्तरावर ही समस्या अधिक व्यापक आहे, असा अहवाल नीरजा बिर्ला यांच्या नेतृत्त्वाखालील आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या एमपॉवर, या अभ्यास गटाने प्रसिद्ध केला आहे. भारतात पुरुषांपेक्षा हे प्रमाण दुप्पट असून यात...
Skip to content