Homeन्यूज अँड व्ह्यूजनिदान मातृदिनी तरी...

निदान मातृदिनी तरी ‘आई’ला सोडा!

कालच जागतिक मातृदिन साजरा झाला. त्यामुळे आईसबंधातील जाहिरातींना सर्वच वर्तमानपत्रांत व माध्यमांमध्येंउधाण येणार हे समजू शकते. परंतु सामाजिक जाण जपणाऱ्या वर्तमानपत्राच्या मथळ्यांचाच वापर करून जाहिरात वाचकांच्या माथी मारण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर त्याचा निषेधच झाला पाहिजे. सामाजिक जाणीवच नव्हे तर राजकीय व सामाजिक नेत्यांना आवाज चढवून ‘देशाला हे समजले पाहिजे’, ‘देशाचा हा हक्क आहे..’, असे उठताबसता विचारणाऱ्यांनी तर जास्त ‘सजग’ राहण्याची गरज आहे.

मुख्य म्हणजे ज्या गोडेतेलाची ही जाहिरात आहे ते अतिमहागडे तेल मोठी शहरे आणि आजूबाजूच्या छोट्या शहरातच घेतले जाते. देशातील 75 ते 80 टक्के जनता ग्रामीण भागात राहत असून त्यांना हे तेल

घेणे परवडतच नाही.  इंग्रजीतील एक नामवंत लेखक म्हणतो त्याप्रमाणे “advertisement is legalized lying” तर नसेल ना इतकी शंका येऊ लागली आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक युक्त्या कराव्या लागतात हे मान्य आहे. परंतु त्यालाही काही मर्यादा असाव्यात असे आता वाटू लागले आहे.

आणखी एक मोठा इंग्रजी लेखक म्हणतो की, “Good advertisement is one which sells the product without drawing attention to itself”. हे वाक्य मार्केटिंग व कॉपी लिहिणाऱ्यांना कुणी शिकवलेले नाही का? हल्ली अनेक जाहिराती पाहून असे विचारण्याची वेळ येते हे दुर्दैव आहे. आजच्या या विषयाच्याही दोन बाजू असतील. नाही असे नाही. परंतु वर्तमानपत्राचे नाव वापरून अशी जाहिरात करणे उचित नव्हे. निदान मातृदिनी तरी ‘आई’ला सोडा!

Continue reading

‘वसई विरार’ प्रकरणात इडीचा हलगर्जीपणा भोवला!

"Crime of violence strikes out the body but economic crime strikes at the soul of society" हे वचन आठवण्याचं कारण म्हणजे नुकताच वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल पवार यांना प्रथम मुंबई उच्च न्यायालय व नंतर सर्वोच्च न्यायालयाने मुक्त...

सरकारच्या राजकारणावर उच्च न्यायालयाने ओतले पाणी!

मुंबई, ठाण्याच्या जवळ असलेली वसई-विरार महापालिका नेहमीच चर्चेचा विषय राहिलेली आहे. अगदी राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेस व आता भाजपने विरारमधील ठाकूर बंधुच्या एकत्रित अंमलाला काबूत ठेवण्याचे वेळोवेळी प्रयत्न केलेले आहेत. परंतु या दोन्हीही पक्षांना म्हणावे तसे यश प्राप्त झालेले...

ठाणे परिसरात दिसतोय ‘उडता पंजाब’!

ठाणे पोलीस दल गेल्या काही दिवसांपासून अंमली पदार्थांविरुद्ध मोहिमा राबवून कित्येक कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करत असले तरी अंमली पदार्थांच्या व्यापाराचा 'आका' त्यांना अद्यापी मिळालेला नाही. ठाणे रेल्वेस्थानक परिसरात (पूर्व + पश्चिम) हे गर्दुल्ले ठाण मांडून बसलेले दिसत...
Skip to content