Homeब्लॅक अँड व्हाईटजोधपूर विद्यापीठात सतीश...

जोधपूर विद्यापीठात सतीश लळीत यांचा कातळशिल्पांवर शोधनिबंध

राजस्थानमधील जोधपूर येथे दि. ७ व ८ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या राष्ट्रीय पुरातत्व परिषदेत ‘कोकणातील कातळशिल्पे’ या विषयावर शोधनिबंध सादर करण्यासाठी महाराष्ट्राचे निवृत्त माहिती उपसंचालक व कातळशिल्प अभ्यासक सतीश लळीत यांना निमंत्रित करण्यात आले आहे. जोधपूर येथील जय नारायण व्यास विद्यापीठात ही पाचवी ‘आर्किऑलॉजी अँड एपिग्राफी परिषद’ होणार आहे.

जय नारायण व्यास विद्यापीठाचा इतिहास विभाग आणि राजस्थानमधील ‘आर्किऑलॉजी अँड एपिग्राफी काँग्रेस’ यांनी संयुक्तपणे या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे. ‘आर्किऑलॉजी अँड एपिग्राफी काँग्रेस’चे अध्यक्ष प्रा. बी. एल. भादोनी आणि विद्यापीठाचे इतिहास विभागप्रमुख प्रा. डॉ. भगवान सिंह शेखावत यांनी एका पत्राद्वारे लळीत यांना या परिषदेचे निमंत्रण पाठवले आहे. या परिषदेत देशाच्या विविध भागातील पुरातत्वशास्त्रज्ञ, संशोधक, अभ्यासक आपले संशोधन शोधनिबंधाद्वारे सादर करणार आहेत. जोधपूर येथील जय नारायण व्यास विद्यापीठाची स्थापना १९६२ साली झाली. तत्कालिन राष्ट्रपती डॉ. एस. राधाकृष्णन् यांच्या हस्ते उद्घाटन झालेले हे विद्यापीठ राजस्थानमधील एक अग्रगण्य विद्यापीठ आहे.

लळीत गेली २३ वर्षे कातळशिल्प या विषयाचा अभ्यास करीत असून त्यांनी सिंधुदूर्ग  जिल्ह्यात अनेक कातळशिल्पस्थाने प्रकाशात आणली आहेत. ‘सिंधुदुर्गातील कातळशिल्पे’ हा त्यांचा संशोधनपर ग्रंथ प्रसिद्ध झाला असून त्यांनी याआधीही अनेक राष्ट्रीय परिषदांमध्ये या विषयावर शोधप्रबंध सादर केले आहेत. मार्च २०२२मध्ये ‘युनेस्को’च्या सांस्कृतिक समितीने सिंधुदूर्ग जिल्ह्यातील कुडोपीसह गोव्यातील उसगाळीमळ आणि रत्नागिरी जिल्ह्यातील सात कातळशिल्प स्थानांचा समावेश ‘जागतिक वारसास्थळां’च्या प्राथमिक यादीत केला आहे. यामुळे देशातील पुरातत्वक्षेत्रात कोकणातील कातळशिल्पांबाबत कुतूहल वाढले आहे.

जोधपूर येथील या राष्ट्रीय परिषदेत लळीत ‘पेट्रोग्लिफ्स ऑफ कोकण’ म्हणजे ‘कोकणातील कातळशिल्पे’ हा शोधनिबंध आणि रत्नागिरी, सिंधुदूर्ग, गोव्यातील कातळशिल्पांचे सादरीकरण करतील. कर्नाटक आणि केरळमधील कातळशिल्पांचा धावता आढावाही त्यांनी आपल्या शोधनिबंधात घेतला आहे.

Continue reading

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...
Skip to content