Friday, May 2, 2025
Homeहेल्थ इज वेल्थमुंबई महापालिका दवाखान्यांत...

मुंबई महापालिका दवाखान्यांत उद्यापासून डिजिटल आरोग्यसेवा

महाराष्ट्रदिनाचे औचित्‍य साधून मुंबईकरांना आधुनिक पद्धतीने आरोग्‍यसुविधा पुरविण्‍यासाठी बृहन्‍मुंबई महानगरपालिका उद्यापासून सर्व दवाखान्यांमध्ये हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम (एचएमआयएस – २) ही डिजिटल प्रणाली कार्यान्वित करणार आहे. सार्वजनिक आरोग्यसेवांमध्ये आधुनिकता, कार्यक्षमतेची वृद्धी आणि सेवा वितरणामध्ये गती साधण्यासाठी ही कार्यप्रणाली उपयुक्‍त ठरणार आहे.

एचएमआयएस – २ प्रणालीची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी सर्व दवाखान्यांना आवश्यक संगणक, इंटरनेट सुविधा व संबधित यंत्रासमुग्री देण्यात आली आहे तसेच सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले आहे. याअगोदर रुग्णांच्या नोंदी कागदावर (पेपर) केल्या जात होत्या. मागील सहा महिने एचएमआयएस – २ प्रणाली प्रायोगिक स्वरूपात राबविण्यात आली. उद्या, २ मेपासून ही प्रणाली १७७ दवाखान्यांत कार्यान्वित केली जात आहे. तसेच, २१७ हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यांमध्‍येदेखील ३० मेपर्यंत ही प्रणाली कार्यान्वित केली जाणार आहे.

एचएमआयएस – २ प्रणाली ही आयुष्मान भारत डिजीटल मिशनला अनुरूप आहे. यामध्ये रुग्णाला एक विशिष्‍ट ओळखपत्र क्रमांक (आयडी) दिला जाईल. या ओळखपत्राच्‍या आधारे रुग्णांना दवाखान्यातून रुग्णालयात तसेच रुग्णालयातून दवाखान्यात संदर्भित केले जाऊ शकते. त्यांच्या उपचारपद्धतीचा आढावा (ट्रॅक) घेतला जाऊ शकतो. यामुळे रुग्णांना त्यांच्या मोबाईलवर त्यांच्या उपचारांच्या सर्व नोंदी एकाच ठिकाणी मिळू शकतील. एचएमआयएस – २ प्रणालीच्या माध्यमातून रुग्णांची नोंदणी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी आणि औषधवितरण इत्यादी नोंदी डिजीटल स्वरूपात उपलब्ध होणार आहेत. तसेच औषधसाठा व्यवस्थापन, रुग्णसेवा अहवाल, सांख्यिकीय विश्लेषण आणि धोरणात्मक निर्णयप्रक्रियेसाठीही ही प्रणाली उपयुक्त ठरणार आहे. पुढील टप्प्यात एचएमआयएस – २ ही प्रणाली प्रसुतीगृहे, उपनगरीय रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये यांच्यातदेखील राबविण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

महाराष्ट्राच्या जिल्हा युवा पुरस्कारने सानिया खान सन्मानित

महाराष्ट्र शासन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नाशिक यांचा २०२३-२४चा जिल्हा युवा पुरस्कार (युवतीकरिता) सानिया मोहम्मद आरिफ खान हिला राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते काल महाराष्ट्रदिनी प्रदान करण्यात आला. सन्मान चिन्ह, गौरवपत्र व दहा हजार रुपये असे या...

आज भारतातले ठेवीदार आणि गुंतवणूकदार सुरक्षित नाहीत!

भारतातील १४२ कोटी नागरिकांपैकी सुमारे शंभर कोटी लोक दारिद्र्य रेषेखाली जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. देशावर दोनशे पस्तीस लाख कोटी रुपये कर्ज असून पाच ट्रिलियन डॉलरचे मृगजळ दाखविण्यात येत आहे. प्रत्यक्षात देशाची आर्थिक परिस्थिती अतीशय भयानक आहे. देशातील ठेवीदार...

यंदाच्या उन्हाळ्यात बेघर, कामगारांना उष्माघाताचा धोका!

यंदाच्या उन्हाळ्यात निवाऱ्याच्या आणि संसाधनांच्या कमतरतेमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना, उघड्या जागेत काम करणारे श्रमिक, वृद्ध, लहान मुले आणि विशेषत: बेघर लोकांना उष्णतेच्या लाटेचा धोका असून त्यांच्या जीविताच्या रक्षणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आवाहन मानवाधिकार आयोगाने महाराष्ट्रासह 11 राज्यांना केले आहे. उन्हाळ्यात,...
Skip to content