Homeहेल्थ इज वेल्थमुंबई महापालिका दवाखान्यांत...

मुंबई महापालिका दवाखान्यांत उद्यापासून डिजिटल आरोग्यसेवा

महाराष्ट्रदिनाचे औचित्‍य साधून मुंबईकरांना आधुनिक पद्धतीने आरोग्‍यसुविधा पुरविण्‍यासाठी बृहन्‍मुंबई महानगरपालिका उद्यापासून सर्व दवाखान्यांमध्ये हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम (एचएमआयएस – २) ही डिजिटल प्रणाली कार्यान्वित करणार आहे. सार्वजनिक आरोग्यसेवांमध्ये आधुनिकता, कार्यक्षमतेची वृद्धी आणि सेवा वितरणामध्ये गती साधण्यासाठी ही कार्यप्रणाली उपयुक्‍त ठरणार आहे.

एचएमआयएस – २ प्रणालीची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी सर्व दवाखान्यांना आवश्यक संगणक, इंटरनेट सुविधा व संबधित यंत्रासमुग्री देण्यात आली आहे तसेच सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले आहे. याअगोदर रुग्णांच्या नोंदी कागदावर (पेपर) केल्या जात होत्या. मागील सहा महिने एचएमआयएस – २ प्रणाली प्रायोगिक स्वरूपात राबविण्यात आली. उद्या, २ मेपासून ही प्रणाली १७७ दवाखान्यांत कार्यान्वित केली जात आहे. तसेच, २१७ हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यांमध्‍येदेखील ३० मेपर्यंत ही प्रणाली कार्यान्वित केली जाणार आहे.

एचएमआयएस – २ प्रणाली ही आयुष्मान भारत डिजीटल मिशनला अनुरूप आहे. यामध्ये रुग्णाला एक विशिष्‍ट ओळखपत्र क्रमांक (आयडी) दिला जाईल. या ओळखपत्राच्‍या आधारे रुग्णांना दवाखान्यातून रुग्णालयात तसेच रुग्णालयातून दवाखान्यात संदर्भित केले जाऊ शकते. त्यांच्या उपचारपद्धतीचा आढावा (ट्रॅक) घेतला जाऊ शकतो. यामुळे रुग्णांना त्यांच्या मोबाईलवर त्यांच्या उपचारांच्या सर्व नोंदी एकाच ठिकाणी मिळू शकतील. एचएमआयएस – २ प्रणालीच्या माध्यमातून रुग्णांची नोंदणी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी आणि औषधवितरण इत्यादी नोंदी डिजीटल स्वरूपात उपलब्ध होणार आहेत. तसेच औषधसाठा व्यवस्थापन, रुग्णसेवा अहवाल, सांख्यिकीय विश्लेषण आणि धोरणात्मक निर्णयप्रक्रियेसाठीही ही प्रणाली उपयुक्त ठरणार आहे. पुढील टप्प्यात एचएमआयएस – २ ही प्रणाली प्रसुतीगृहे, उपनगरीय रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये यांच्यातदेखील राबविण्यात येणार आहे.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content