Tuesday, March 11, 2025
Homeन्यूज ॲट अ ग्लांसदिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद...

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची कोलांटउडी! 

दारू घोटाळ्यात अडकलेल्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने घातलेल्या अटींवर कोणतेही भाष्य न करता जनतेचा कौल मागण्यासाठी आपण मुख्यमंत्रीपद सोडत असल्याचा आव आणत त्यांनी जनतेच्या भावनेला हात घालण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जाते.

नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काल जामीनावर सुटल्यानंतर घेतलेल्या जाहीर सभेत दोन दिवसात आपण मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. दिल्लीची जनता त्याचप्रमाणे भारताची जनता ठरवेल की मी दोशी आहे की नाही? आणि तोपर्यंत मी मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसणार नाही, अशी घोषणा करत त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांची वाहवा मिळवली. वस्तुस्थिती अशी आहे की, त्यांना जामीन याच मुद्द्यावर मिळाला आहे की, ते मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात जाणार नाहीत, मुख्यमंत्री म्हणून कोणत्याही फायलीवर सही करणार नाहीत, अत्यंत महत्त्वाची अशी जर फाईल असेल तरच त्यावर ते सही करतील. जर जामीन देतानाच न्यायालयाने अशा अटी घातल्या असतील तर ते मुख्यमंत्री म्हणून करणार तरी काय? त्यापेक्षा फेब्रुवारीत होणाऱ्या निवडणुकीला सामोरे जाताना जनतेकडून सहानुभूती मिळवावी असा प्रयत्न केजरीवाल यांनी केला असल्याचे कळते.

आपण मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दोन दिवसांत देत आहोत आणि आपली मागणी आहे की दिल्लीची विधानसभा बरखास्त करावी आणि फेब्रुवारीऐवजी महाराष्ट्राबरोबरच दिल्लीच्याही विधानसभा निवडणुका घ्याव्यात आणि जर आपली मागणी मान्य झाली नाही तर आपल्या जागी कोण असेल हे पक्षाचे विधिमंडळ सदस्य ठरवतील असे त्यांनी जाहीर केले. विधिमंडळ पक्षातले आमदार केजरीवाल यांच्या शब्दाबाहेर नाहीत. त्यामुळे केजरीवाल जो निर्णय घेतील तोच निर्णय सर्व आमदारांचा असेल. त्यामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री होण्यासाठी केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळातील सदस्य आतिशी सिंग आणि केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांच्यात रस्सीखेच सुरू झाली आहे.

अरविंद केजरीवाल यांच्याआधी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया तुरुंगात गेल्यानंतर त्यांच्या मंत्रीपदाचा कार्यभार तसेच आम आदमी पार्टीचे इतर मंत्री यांनी जेलवारी केल्यानंतर त्यांच्या मंत्रालयांचे कार्यभार आतिशी यांनीच सांभाळला. इतकेच नव्हे तर मुख्यमंत्री केजरीवाल तुरूंगात गेल्यानंतर पक्षाची आणि मंत्रिमंडळाची बाजू मांडण्यामध्ये अतिशी यांचा मोठा सहभाग होता. मात्र याच काळात अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता याही घराबाहेर पडल्या आणि त्यांनी जाहीर सभांमध्ये भाषणे देण्यास सुरुवात केली. अरविंद केजरीवाल यांचे वजन कसं कमी होत आहे, किती ग्रामने कमी होत आहे. त्यांना डायबिटीस असताना कसं गोड खायला दिलं जात आहे, अशा पद्धतीचे आरोप करण्यामध्ये सुनीता केजरीवाल यांचा मोठा सहभाग राहिला आहे.

त्यामुळेच जर मुलायमसिंग यादव, लालूप्रसाद यादव, हेमंत सोरेन अशा काही मुख्यमंत्र्यांच्या पावलावर पाऊल ठेवत पुढे जायचं असेल तर अरविंद केजरीवाल येत्या दोन दिवसांत सुनिता केजरीवाल यांना मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसवतील किंवा पुढच्या पाच वर्षांची बेगमी करण्यासाठी म्हणजे फेब्रुवारीच्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी ते सुनिता केजरीवालना टाळून पक्षातल्या इतर कोणत्यातरी नेत्याला मुख्यमंत्री बनवतील असे जाणकारांचे मत आहे.

Continue reading

कुर्ल्यातल्या कबड्डी स्पर्धेत अंबिका, पंढरीनाथ संघांची बाजी

शिवजयंती उत्सवाचे औचित्य साधून मुंबईतल्या कुर्ला (पश्चिम) येथील गांधी मैदानात जय शंकर चौक क्रीडा मंडळ आणि गौरीशंकर क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित पुरुष गटाच्या कबड्डी स्पर्धेत प्रथम श्रेणी गटात अंबिका सेवा मंडळ, कुर्ला...

‘स्वामी समर्थ श्री’साठी राज्यातील दिग्गज उद्या आमनेसामने

क्रीडा क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या "स्वामी समर्थ श्री" राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेच्या माध्यमातून मुंबईकर शरीरसौष्ठवप्रेमींना जानदार, शानदार आणि पीळदार शरीरसौष्ठवपटूंचे ग्लॅमर पाहायला मिळणार आहे. आमदार महेश सावंत यांच्या आयोजनाखाली मुंबईच्या प्रभादेवीत दै. सामना मार्गाशेजारील...

भारतात महिलांच्या आत्महत्त्यांपैकी ३६.६% तरुणींच्या!

पुरुषांपेक्षा महिलांमध्ये चिंता आणि नैराश्य अधिक प्रमाणात असून जागतिक स्तरावर ही समस्या अधिक व्यापक आहे, असा अहवाल नीरजा बिर्ला यांच्या नेतृत्त्वाखालील आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या एमपॉवर, या अभ्यास गटाने प्रसिद्ध केला आहे. भारतात पुरुषांपेक्षा हे प्रमाण दुप्पट असून यात...
Skip to content