Homeचिट चॅटदेशातला सर्वात मोठा...

देशातला सर्वात मोठा तरंगता सोलर पीव्ही प्रकल्प सुरू!

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन अर्थात राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ लिमिटेडने आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे त्याच्या सिंहाद्री औष्णिक विद्युत केंद्राच्या जलाशयावर 25 मेगावॅटचा देशातला सर्वात मोठा तरंगता सोलर पीव्ही प्रकल्प उभारला आहे.

2018मध्ये केंद्र सरकारने अधिसूचित केलेल्या फ्लेक्सिबिलायझेशन योजनेअंतर्गत उभारला जाणारा हा पहिला सौर प्रकल्प आहे. या सोलर पीव्ही प्रकल्पाचे उद्घाटन काल एनटीपीसीचे RED (WR2 & SR) संजय मदन यांनी केले.

या फ्लोटिंग सोलर इंस्टॉलेशनची विशिष्ट रचना असून ते RW जलाशयात 75 एकरवर पसरलेले आहे. या फ्लोटिंग सौर प्रकल्पात 1 लाखांहून अधिक सौर पीव्ही मॉड्यूलमधून वीजनिर्मिती करण्याची क्षमता आहे. यामुळे 7,000 कुटुंबांना वीज पुरवण्यात मदत होणार  आहे. त्याचबरोबर या प्रकल्पामुळे दरवर्षी किमान 46,000 टन इतके कार्बन डायॉक्साईडचे  (CO2e) उत्सर्जन टाळता येईल.

बंगालच्या उपसागरातून पाईपद्वारे पाणी घेऊन 2,000 मेगावॅट वीजनिर्मिती करणारा कोळसा आधारित सिंहाद्री स्टेशन, हा पहिला औष्णिक विद्युत वीज प्रकल्प आहे, जो 20 वर्षांहून अधिक काळ हा कार्यरत आहे. याशिवाय एनटीपीसी सिंहाद्री येथे प्रायोगिक तत्त्वावर हायड्रोजन-आधारित मायक्रो-ग्रिड यंत्रणा उभारण्याची योजना आखत आहे.

66,900 मेगावॅट क्षमतेच्या एकूण स्थापित वीजनिर्मिती क्षमतेसह, एनटीपीसीकडे 29 नवीकरणीय प्रकल्पांसह 71 वीज केंद्रे आहेत. एनटीपीसीने 2032पर्यंत 60 गीगावॅट (जीडब्ल्यू) नवीकरणीय ऊर्जाक्षमता स्थापित करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. 5 गीगावॅट नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांसह या महामंडळाची 17 गीगावॅटपेक्षा जास्त निर्माणाधीन क्षमता आहे.

Continue reading

इराणचे प्रमुख खामेनेई ठार, पुत्र मोजतबा उत्तराधिकारी!

गेल्या काही दिवसांपासून तोंडी असलेला अमेरिका-इराण संघर्ष आता प्रत्यक्षात उतरला. काल सकाळी अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्त कारवाई करत इराणच्या सर्व प्रमुख ठिकाणांवर बॉम्बहल्ले केले. इराणच्या सहा शहरांवर हल्ले करण्यात आले. यात इराणचे प्रमुख नेते तसेच परमाणू केंद्रांना लक्ष्य करण्यात...

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...
Skip to content