Sunday, September 8, 2024
Homeएनसर्कलहरित तंत्रज्ञानावर आधारित...

हरित तंत्रज्ञानावर आधारित देशातले पहिले वातानुकूलन संयंत्र नौदलात कार्यान्वित!

नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल आर हरी कुमार यांनी आयएनएस शिवाजी येथे कार्बनडायऑक्साईड आधारित अनोख्या वातानुकूलन संयंत्राचे नुकतेच उद्‌घाटन केले. जहाजावरील एचएफसी (हायड्रो फ्लुरो कार्बन) आणि एचसीएफसी (हायड्रो क्लोरो फ्लुरो कार्बन) आधारित वातानुकूलन प्रणालीच्या जागी हे वातानुकूलन संयंत्र बसवण्यात येणार असून अशाप्रकारचे हे पहिलेच संयंत्र आहे.

हे पाऊल 2028पासून एचएफसी आणि एचसीएफसी आधारित कृत्रिम प्रशीतक कमी करण्याच्या 2016च्या किगाली कराराप्रती भारताच्या वचनबद्धतेच्या अनुषंगाने असून ट्रान्सक्रिटिकल CO2 आधारित वातानुकूलन संयंत्र हे त्या दिशेने पहिले पाऊल आहे. हे तंत्रज्ञान हवामान बदलाचा मुकाबला करण्याच्या जागतिक प्रयत्नांशी मिळतेजुळते असून शाश्वत हरित पर्यायांच्या दिशेने भारतीय नौदलाच्या पुढाकाराला समर्थन देते.

हे वातानुकूलन संयंत्र प्रगत डिजिटल नियमन प्रणाली आणि स्मार्ट तंत्रज्ञान संकलनाद्वारे किफायतशीर मनुष्यबळात संयंत्र चालवण्यासाठी सुसज्ज आहे. ही प्रणाली बंगलोरमधील आयआयएससीच्या सहकार्याने विकसित केली गेली आहे, जी सशस्त्र दलांमध्ये भविष्यकालीन तंत्रज्ञानाचा समावेश करण्याच्या दिशेने संरक्षण-प्रशिक्षण समन्वय सुरळीत करण्याचा पुरावा आहे. या तंत्रज्ञानाच्या यशामुळे नौदलाला केवळ अत्याधुनिक यंत्रसामग्रीच उपलब्ध होणार नाही तर व्यावसायिक वातानुकूलन आणि प्रशीतन बाजारात त्याचा व्यापक वापर करण्याची क्षमता आहे.

उद्‌घाटन समारंभाला आयएनएस शिवाजीचे प्रमुख कमोडोर मोहित गोयल, प्रा. बी गुरुमूर्ती, सीईओ, एफएसआयडी, आयआयएससी बंगलोर, टाटा कन्स्लटिंग इंजिनिअर्स लिमिटेडचे एमडी, सीईओ अमित शर्मा आणि बंगलोरच्या त्रिवेणी टर्बाइन्स लिमिटेडचे कार्यकारी संचालक अरुण मोटे हेदेखील उपस्थित होते.

Continue reading

परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्राची बाजी!

गेले दोन वर्षं सातत्याने परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात क्रमांक 1वर असलेल्या महाराष्ट्रात 2024-2025, या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतसुद्धा सर्वाधिक गुंतवणूक आली आहे. एप्रिल ते जून 2024 या पहिल्या तिमाहीत एकूण 70,795 कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. थोडक्यात सांगायचे...

उद्यापासून श्री गणेशोत्सव!

उद्यापासून गणेशोत्सव! गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या वातावरणामुळे भाविकांमध्ये आंनद आणि उत्साह संचारतो. श्री गणेशचतुर्थी हा हिंदूंचा मोठा सण आहे. श्री गणेश चतुर्थीला, तसेच श्री गणेशोत्सवाच्या दिवसांत गणेशतत्त्व नेहमीच्या...

अनुराधा पौडवाल यांची नवी भक्तीमय स्वरभेट अर्पण!

गणेशोत्सवाचे औचित्य साधून आदि शंकराचार्य रचित ‘गणेश पंचरत्न’ या गणपतीच्या श्लोककाव्याची स्वरभेट लोकप्रिय ज्येष्ठ पार्श्वगायिका पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांनी कोट्यवधी भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या मुंबईतील श्री सिध्दीविनायक मंदिरात मंगळवारी सकाळी श्रींच्या चरणी अर्पण केली. श्री सिध्दीविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर,...
error: Content is protected !!
Skip to content