Homeटॉप स्टोरीठाकरे सरकार कोसळल्याचा...

ठाकरे सरकार कोसळल्याचा सर्वाधिक आनंद काँग्रेस कार्यकर्त्यांना!

राज्यातील उद्धव ठाकरे सरकार पडल्याचा आमच्यासारख्या सर्वसामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांना सर्वाधिक आनंद झाला आहे, कारण आपले मंत्री गेली अडीच वर्षे फक्त पैसे खायचे काम करत होते, असा बॉम्ब नवी मुंबईचे माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे यांनी टाकला आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले राज्यातले सगळेच माजी मंत्री सुन्न झाले.

नवी मुंबईचे माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे यांनी राज्यातल्या सर्व काँग्रेस नेत्यांना घरचा अहेर दिला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये बुधवारी दुपारी झाली. या बैठकीमध्ये म्हात्रे यांनी आपल्याच पक्षाच्या मंत्र्यांवर आरोप केल्यानंतर उपस्थितांपैकी अनेकांनी बरोबर बोलतोय, बरोबर बोलतोय…, असे आवाज देत म्हात्रे यांचे समर्थनच केले.

या विस्तारित कार्यकारिणीसाठी अखिल भारतीय़ काँग्रेस समितीच्या वतीने केंद्रीय चिटणीस आशिष दुआ, सोनल पटेल यांच्यासह चार जण उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह माजी मंत्री अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड, विश्वजीत कदम यांसारखे नेतेही उपस्थित होते. आमदार, मंत्री यासह पदाधिकारी मिळून दीडशे जण या बैठकीला उपस्थित होते.

आपले सगळे मंत्री गेली अडीच वर्षे फक्त पैसे खायचे काम करत होते आणि त्यांच्याकडे भेटायला गेल्यावर दोन-दोन तास बाहेर बसवून ठेवायचे. कारण, त्यांच्या दालनांमधे दलालांची गर्दी असायची. त्यामुळे हे सरकार पडल्याचा सर्वाधिक आनंद आमच्यासारख्या सर्वसामान्य काँग्रेस कार्यकर्त्य़ांना झाला आहे, अशा आशयाचे विधान करून रमाकांत म्हात्रे यांनी दिलेला घरचा अहेर आणि त्याला बैठकीतल्या इतरांनी दिलेला पाठिंबा, यामुळे राज्यातील काँग्रेस श्रेष्ठींच्या डोळ्यासमोर भर दुपारी तारे चमकले होते.

Continue reading

औचित्त्याची ऐशीतैशी…

मराठी भाषेमध्ये एखाद्या गोष्टीचे औचित्त्य काय आहे, असे विचारताना औचित्त्य, या शब्दाचा अर्थ माहीत असणे अभिप्रेत असते. राज्याच्या विधानसभेत कामकाज केले जाताना औचित्त्याचे मुद्दे म्हणून काही बाबी आमदारांना उपस्थित करता येतात आणि सरकारने त्यावर उचित कार्यवाही करणेही अपेक्षित असते....

वाटाणा वाटाणा पे लिखा है `खाने’वाले का…

वाटाण्यावाटाण्यात काय फरक असणार, असे कोणी विचारले तर हा प्रश्न निरर्थक मानू नका. हिरव्या आणि पांढऱ्या वाटाण्यात फरक असतो आणि या फरकातून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही सरकारवर होऊ शकतो, हे मंगळवारी राज्याच्या विधानसभेत दिसून आले. आमदार कैलास घाडगे-पाटील...

मुनगंटीवार वन्स अगेन!

सरकारी काम म्हणजे सहा महिने थांब... असं कायम म्हटलं जातं आणि नेमका त्याचाच अनुभव राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना आल्याचे गुरुवारी राज्याच्या विधानसभेत स्पष्ट झाले. सरकारी कर्मचारी, अधिकाऱ्यांनी आपल्या वृद्ध पालकांची तसेच कुटुंबातील दिव्यांग व्यक्तींची जबाबदारी घ्यावी, याची...
Skip to content