Homeचिट चॅटसिने स्थिर छायाचित्रकार...

सिने स्थिर छायाचित्रकार सुधाकर मुणगेकर यांचे निधन!

प्रख्यात सिने छायाचित्रकार सुधाकर मुणगेकर यांचे नुकतेच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मुंबईतल्या राहत्या घरी निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते. ते अविवाहित होते. अनेक वर्षे ते एकटेच राहत होते.

दामोदर कामत यांनी स्थापन केलेल्या ‘कामत फोटो फ्लॅश’ या कंपनीमध्ये १९६६ साली वयाच्या १८व्या वर्षी ते फोटोग्राफर म्हणून रुजू झाले. वयाच्या अखेरपर्यंत फोटोग्राफर म्हणून ते काम करीत होते. त्यांच्या अनेक चित्रपटांचे स्थिरचित्रण त्यांनी केले होते.

राज कपूर यांच्या आरके बॅनरनिर्मित ‘मेरा नाम जोकर’, ‘बॉबी’, ‘सत्यम शिवम सुंदरम’, ‘प्रेम रोग’, ‘धरम करम’, ‘हिना’ तसेच राजश्री प्रॉडक्शन्सच्या ‘अखियोंके झरोखे सें’, ‘नादिया के पार’, ‘सारांश’, ‘उपहार’, ‘गीत गाता चल’, ‘चितचोर’, ‘मैने प्यार किया’, एन. चंद्रा यांच्या ‘नरसिंहा’सह जवळपास दीडशेहून अधिक हिंदी चित्रपटांच्या स्टील फोटोग्राफीचे काम त्यांनी केले.

मराठीमध्ये दामू केंकरे दिग्दर्शित ‘सखी माझी’, कुमार सोहनी दिग्दर्शित ‘जोडीदार’, ‘तुझ्याचसाठी’ अशा अनेक मराठी चित्रपट, नाटक, दूरदर्शन मालिकांसाठी त्यांनी स्थिर चित्रण केले. राज कपूर, देव आनंद, राजश्री प्रॉडक्शन्सचे बडजात्या, अभिनेत्री नर्गिस, मधुबाला, दिग्दर्शिका सई परांजपे, दामू केंकरे, एन. चंद्रा, श्रीकांत ठाकरे, कुमार सोहनी, सुभाष फडके अशा अनेक दिग्गजांसोबत सुधाकर मुणगेकर यांनी काम केले होते. मितभाषी असलेल्या सुधाकर मुणगेकर यांचे मा. भगवान दादासह चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवरांशी स्नेहपूर्ण संबंध होते. कन्टीन्युटी फोटोग्राफीमध्ये त्यांचे विशेष प्राविण्य होते. 

Continue reading

धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी, १० ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी महेश कानोले तबला तर श्रीनिवास आचार्य संवादिनीवर...

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...

१ ऑगस्टपासून मंत्रालयाचा प्रवेश होणार पूर्णपणे डिजिटल!

येत्या १ ऑगस्टपासून मुंबईतल्या मंत्रालयातला अभ्यागतांचा प्रवेश पूर्णपणे डिजिटल होणार आहे. महाराष्ट्राचे मंत्रालय अभ्यागतांच्या प्रवेशासाठी पूर्णपणे डिजिटल होईल. १ ऑगस्टपासून, कागदावर आधारित सर्व प्रकारचे पास टप्प्याटप्प्याने बंद केले जातील आणि डिजिटली ओळख पटवून अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेश दिला जाईल. राज्याच्या डिजिटल...
Skip to content