Homeचिट चॅटसिने स्थिर छायाचित्रकार...

सिने स्थिर छायाचित्रकार सुधाकर मुणगेकर यांचे निधन!

प्रख्यात सिने छायाचित्रकार सुधाकर मुणगेकर यांचे नुकतेच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मुंबईतल्या राहत्या घरी निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते. ते अविवाहित होते. अनेक वर्षे ते एकटेच राहत होते.

दामोदर कामत यांनी स्थापन केलेल्या ‘कामत फोटो फ्लॅश’ या कंपनीमध्ये १९६६ साली वयाच्या १८व्या वर्षी ते फोटोग्राफर म्हणून रुजू झाले. वयाच्या अखेरपर्यंत फोटोग्राफर म्हणून ते काम करीत होते. त्यांच्या अनेक चित्रपटांचे स्थिरचित्रण त्यांनी केले होते.

राज कपूर यांच्या आरके बॅनरनिर्मित ‘मेरा नाम जोकर’, ‘बॉबी’, ‘सत्यम शिवम सुंदरम’, ‘प्रेम रोग’, ‘धरम करम’, ‘हिना’ तसेच राजश्री प्रॉडक्शन्सच्या ‘अखियोंके झरोखे सें’, ‘नादिया के पार’, ‘सारांश’, ‘उपहार’, ‘गीत गाता चल’, ‘चितचोर’, ‘मैने प्यार किया’, एन. चंद्रा यांच्या ‘नरसिंहा’सह जवळपास दीडशेहून अधिक हिंदी चित्रपटांच्या स्टील फोटोग्राफीचे काम त्यांनी केले.

मराठीमध्ये दामू केंकरे दिग्दर्शित ‘सखी माझी’, कुमार सोहनी दिग्दर्शित ‘जोडीदार’, ‘तुझ्याचसाठी’ अशा अनेक मराठी चित्रपट, नाटक, दूरदर्शन मालिकांसाठी त्यांनी स्थिर चित्रण केले. राज कपूर, देव आनंद, राजश्री प्रॉडक्शन्सचे बडजात्या, अभिनेत्री नर्गिस, मधुबाला, दिग्दर्शिका सई परांजपे, दामू केंकरे, एन. चंद्रा, श्रीकांत ठाकरे, कुमार सोहनी, सुभाष फडके अशा अनेक दिग्गजांसोबत सुधाकर मुणगेकर यांनी काम केले होते. मितभाषी असलेल्या सुधाकर मुणगेकर यांचे मा. भगवान दादासह चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवरांशी स्नेहपूर्ण संबंध होते. कन्टीन्युटी फोटोग्राफीमध्ये त्यांचे विशेष प्राविण्य होते. 

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content