Homeमुंबई स्पेशलमुंबई महापालिकेकडून दहावीतल्या...

मुंबई महापालिकेकडून दहावीतल्या २५ विद्यार्थ्यांना २५ हजार!

दहावीच्या परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे महानगरपालिका शाळेतील पहिल्या २५ विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील पाच वर्षांच्या शिक्षणासाठी प्रत्येकी किमान रुपये २५ हजार आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. गेल्या वर्षी शैक्षणिक वर्षात पालिकेच्या शिक्षण विभागाने नवीन प्रवेशाकरिता ‘मिशन ॲडमिशन, एकच लक्ष्य – एक लक्ष’ ही मोहीम राबविल्यामुळे १ लाखापेक्षा जास्त प्रवेश निश्चित झाले होते. त्याच धर्तीवर विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्याकरीता पालिकेने २०२३-२४साठी ‘मिशन मेरीट’ हा उपक्रम हाती घेतला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने मार्च २०२३मध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला. यात मुंबई महापालिकेच्या एकूण ४३ शाळांचा निकाल १०० टक्के लागला. तर पालिकेच्या सर्व शाळांचा सरासरी निकाल ८४.७७ एवढा लागला. पालिकेच्या शाळांमधून गुंदवली एमपीएस शाळेचा विद्यार्थी शुभम अवधेश सिंग ९५.२० टक्के गुणांसह अव्वल आला.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने मार्च २०२३मध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेला पालिकेच्या २४५ माध्यमिक शाळांमधून १७ हजार १४० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १४ हजार ५२९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ५० विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले. पालिकेच्या शिक्षण विभागाने दहावीच्या निकालवाढीसाठी विद्यार्थ्‍यांची तयारी करुन घेताना अत्‍यंत सोप्‍या व मोजक्‍या आशयाच्या ‘मिशन-३५’ पुस्तिका विद्यार्थ्‍यांकडून सोडवून घेतल्‍या होत्या.

विद्यार्थ्‍यांचा अधिकाअधिक सराव होण्‍याकरिता डिसेंबर २०२२पासून बोर्डाच्‍या धर्तीवर शालेय स्‍तरावर सराव प्रश्‍नपत्रिका सोडवून घेण्‍यात आल्‍या होत्या. याशिवाय अधिकाऱ्यांना शाळा दत्‍तक देऊन मार्गदर्शन करण्‍यात आले होते. तसेच शिक्षक आणि विद्यार्थांसाठी व्‍याख्‍यानमालांचे आयोजन करण्‍यात आले होते. विद्यार्थी, शिक्षक, पालक, मुख्‍याध्‍यापक, पर्यवेक्षणीय यंत्रणा यांच्‍यामध्‍ये समन्‍वय साधून वेळोवेळी सहविचार सभाही घेण्‍यात आल्‍या. शिवाय, र्व्‍हच्‍युअल क्‍लास रुममार्फत (व्हिटीसी) तज्ज्ञांची व्‍याख्‍याने आयोजित करण्‍यात आली होती.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content