Homeपब्लिक फिगररणरणत्या उन्हात मुख्यमंत्री...

रणरणत्या उन्हात मुख्यमंत्री शिंदेंची बाईक रॅली!

रामटेकचे महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारानिमित्त आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाईक रॅलीमध्ये सहभाग घेतला. या प्रचारफेरीत मुख्यमंत्र्यांनी स्वत: मोटारसायकल चालवत राजू पारवेंच्या विजयासाठी मतदारांना साद घातली. या बाईक रॅलीमुळे उमरेडमध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले. याच मतदारसंघात मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी दोन प्रचार सभा घेतल्या होत्या.

विदर्भातील कडक उन्हाची पर्वा न करता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रामटेकचे उमेदवार राजू पारवेंसाठी आज रोड शो केला. या बाईक रॅलीत महायुतीच्या कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी दिसून आली. रामटेकला शिवसेनेचा उमेदवार निवडून येईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

शिंदे

देशाला विकासाकडे नेण्यासाठी तुमचे एक-एक मत महत्त्वाचे आहे. महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांना मत म्हणजे देशाच्या विकासाला मत आणि धनुष्यबाणाला मत म्हणजे नरेंद्र मोदी यांना मत, हे आपल्याला ठरवायचे आहे. येत्या १९ एप्रिलला धनुष्यबाणाचे बटन दाबून राजू पारवे यांना विजयी करा, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केले. रामटेक प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. जो रामाचा नाही, तो कामाचा नाही असे सांगत दिल्लीत नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी राजू पारवे यांना विजयी करायचे आहे, असे ते म्हणाले.

मोदींसाठी नेशन फर्स्ट हा अजेंडा आहे. विरोधकांकडे झेंडा आणि अजेंडा नाही तर ते कमिशन आणि करप्शन फर्स्टसाठी काम करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० वर्षांत केलेले काम आणि काँग्रेसने ५० ते ६० वर्षांत केलेले काम जनतेसमोर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म राजनितीसाठी नाही तर राष्ट्रनितीसाठी झालाय. त्यांनी संपूर्ण जीवन देशासाठी समर्पित केलंय. प्रभू रामाची निशाणी धनुष्यबाण आणि महायुतीची निशाणी धनुष्यबाण आहे. मतदानाच्या दिवशी धनुष्यबाणावर बटन दाबून राजू पारवेला संसदेत पाठवयाचे आहे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

Continue reading

सुटीच्या रविवारी दिवशी २०७ शासननिर्णयांची आतषबाजी!

काल रविवार, २९ मार्चचा सुटीचा दिवस असला तरी महाराष्ट्र सरकारच्या मंत्रालयातील संगणक टायपिंग मात्र थांबले नाही. आर्थिक वर्षाचा शेवट (३१ मार्च) जवळ येत असताना, महायुती सरकारने रविवारी (२९ मार्च २०२६) एकाच दिवसात तब्बल २०७ शासननिर्णय (जीआर) निर्गमित करून प्रशासकीय...

तृप्ती देसाईंच्या आरोपांवर नीलम गोऱ्हेंचा पलटवार!

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या महिला नेतृत्त्वावरून नवा संघर्ष पाहायला मिळत आहे. भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक तृप्ती देसाई यांनी केलेल्या खळबळजनक आरोपांनंतर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज मुंबईत तातडीची पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. या दोन्ही नेत्यांमधील...

युद्धाच्या वणव्यात गुंतवणूकदारांचे लाखो कोटी स्वाहा!

पश्चिम आशियातील युद्धाचा ३१वा दिवस जागतिक अर्थव्यवस्थेसाठी 'ब्लॅक मंडे' ठरला आहे. इस्रायल आणि इराणमधील संघर्ष शिगेला पोहोचल्याने जागतिक बाजारपेठेत भीतीचे वातावरण पसरले असून, त्याचे थेट पडसाद भारतीय शेअर बाजारात उमटले आहेत. सोमवारी बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी पडझड...
Skip to content