Homeचिट चॅटबाबासाहेब पुरंदरेंचे निकटवर्तीय...

बाबासाहेब पुरंदरेंचे निकटवर्तीय दादा हाडप गुरुजी यांचे निधन

शंभराव्या वर्षात पदार्पण केलेले शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे सहकारी आणि अंबरनाथ येथील ज्येष्ठ नागरिक दत्तात्रय चिंतामण उर्फ दादा हाडप गुरुजी यांचे काल (मंगलवारी) अल्पकालीन आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते ८८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे, पणतू असा परिवार आहे.

हाडप गुरुजी यांची प्रकृती काल दुपारनंतर खालावली. त्यांना प्रथम अंबरनाथ येथील डेंटल रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथेही प्रकृती आणखी खालवल्यावर तत्काळ ठाणे येथील विठ्ठल सायन्ना रुग्णालयात हलविण्यात आले. रात्री दीड वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

शिवकाळापासून प्रतापगडावरील आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील पूजेचा मान हाडप कुटुंबियांना आहे. हाडप गुरुजी अर्थात दादांनी ही सेवा अनेक वर्षे मनोभावे केली. हाडप गुरुजी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निकटवर्तीयांमधील एक होते. जाणता राजा, या महानाट्याचा प्रारंभ भवानी मातेच्या पूजनाने होत असे. ही पूजा हाडप गुरुजी यांच्या हस्ते करण्यात येत असे.

२९ जुलै रोजी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी वयाच्या शंभराव्या वर्षात पदार्पण केले. त्या निवडक मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या सोहळ्यात हाडप गुरुजी यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यासाठी आशीर्वादपर मंत्रपठण केले होते. त्या भेटीमध्ये हाडप गुरुजी आणि बाबासाहेब अतिशय भारावून गेल्याचे पाहावयास मिळाले होते.

गेली अनेक वर्षे हाडप गुरुजी अंबरनाथ शहरात वास्तव्यास होते. अभियंता जितेंद्र आणि अभिनेते, निवेदक जगदीश हे त्यांचे पुत्र होत. दादा हाडप यांच्या अचानक झालेल्या देहावसानामुळे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हितचिंतकांमध्ये शोककळा पसरली आहे.

Continue reading

इराणचे प्रमुख खामेनेई ठार, पुत्र मोजतबा उत्तराधिकारी!

गेल्या काही दिवसांपासून तोंडी असलेला अमेरिका-इराण संघर्ष आता प्रत्यक्षात उतरला. काल सकाळी अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्त कारवाई करत इराणच्या सर्व प्रमुख ठिकाणांवर बॉम्बहल्ले केले. इराणच्या सहा शहरांवर हल्ले करण्यात आले. यात इराणचे प्रमुख नेते तसेच परमाणू केंद्रांना लक्ष्य करण्यात...

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...
Skip to content