Homeचिट चॅटतायक्वांदो राष्ट्रीय स्पर्धेत...

तायक्वांदो राष्ट्रीय स्पर्धेत आयुष आणि स्वराज सकपाळला सुवर्णपदके

हैद्राबाद येथे नुकत्याच झालेल्या ५व्या खुल्या तायक्वांदो राष्ट्रीय स्पर्धेत ‘खेलो तायक्वांदो’ अकॅडमीच्या आयुष सपकाळ आणि स्वराज सकपाळ या दोन खेळाडूंनी शानदार कामगिरी करत सुवर्णपदकांची कमाई केली. आयुष सपकाळने १७ वर्षांखालील ४८ किलो वजनी गटात, तर स्वराज सकपाळने १४ वर्षांखालील ६५ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले. आयुषने उपांत्य फेरीत दिल्लीच्या खेळाडूवर तर अंतिम सामन्यात बेंगळुरूच्या खेळाडूला आरामात पराभूत केले. स्वराजनेही गुजरातच्या खेळाडूला उपांत्य फेरीत आणि अंतिम सामन्यात बिहारच्या खेळाडूविरुद्ध थरारक विजय मिळवत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.

आयुष हा सध्या मुंबईतल्या गुरुनानक खालसा कॉलेजमध्ये बारावीत शिक्षण घेत आहे. तो गेली ८ वर्षे तायक्वांदोचे धडे गिरवत आहे. स्वराज हा आय.ई.एस. वि. एन. सुळे स्कूल, दहिसर येथील नववीचा विद्यार्थी असून तोही पाच वर्षांपासून तायक्वांदो खेळात चमक दाखवतोय. या दोघांनी राष्ट्रीय स्तरावर आपले कौशल्य दाखवून ‘खेलो तायक्वांदो’ अकॅडमीसह महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले आहे. या ‌दोघांना प्रशिक्षक राजेश मुराव, तुषार पाटील आणि कार्तिकेय नायडू यांचे मार्गदर्शन मिळत आहे.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content