Homeचिट चॅटतायक्वांदो राष्ट्रीय स्पर्धेत...

तायक्वांदो राष्ट्रीय स्पर्धेत आयुष आणि स्वराज सकपाळला सुवर्णपदके

हैद्राबाद येथे नुकत्याच झालेल्या ५व्या खुल्या तायक्वांदो राष्ट्रीय स्पर्धेत ‘खेलो तायक्वांदो’ अकॅडमीच्या आयुष सपकाळ आणि स्वराज सकपाळ या दोन खेळाडूंनी शानदार कामगिरी करत सुवर्णपदकांची कमाई केली. आयुष सपकाळने १७ वर्षांखालील ४८ किलो वजनी गटात, तर स्वराज सकपाळने १४ वर्षांखालील ६५ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले. आयुषने उपांत्य फेरीत दिल्लीच्या खेळाडूवर तर अंतिम सामन्यात बेंगळुरूच्या खेळाडूला आरामात पराभूत केले. स्वराजनेही गुजरातच्या खेळाडूला उपांत्य फेरीत आणि अंतिम सामन्यात बिहारच्या खेळाडूविरुद्ध थरारक विजय मिळवत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.

आयुष हा सध्या मुंबईतल्या गुरुनानक खालसा कॉलेजमध्ये बारावीत शिक्षण घेत आहे. तो गेली ८ वर्षे तायक्वांदोचे धडे गिरवत आहे. स्वराज हा आय.ई.एस. वि. एन. सुळे स्कूल, दहिसर येथील नववीचा विद्यार्थी असून तोही पाच वर्षांपासून तायक्वांदो खेळात चमक दाखवतोय. या दोघांनी राष्ट्रीय स्तरावर आपले कौशल्य दाखवून ‘खेलो तायक्वांदो’ अकॅडमीसह महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले आहे. या ‌दोघांना प्रशिक्षक राजेश मुराव, तुषार पाटील आणि कार्तिकेय नायडू यांचे मार्गदर्शन मिळत आहे.

Continue reading

हरमित सिंग ठरला ‘खासदार श्री’चा किंग!

मुंबईच्या शरीरसौष्ठवाची अस्सल श्रीमंती दाखवणारी ३००पेक्षा अधिक शरीरसौष्ठवपटूंमध्ये रंगलेली जोरदार चुरस... मुंबईच्या फिटनेस संस्कृतीचा क्रीडासोहळा पाहण्यासाठी क्रीडाप्रेमींची अभूतपूर्व गर्दी आणि केंद्रिय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी केलेली लाख मोलाच्या बक्षिसांची उधळण, यामुळे ‘खासदार श्री शरीरसौष्ठव स्पर्धे’ने...

क्रिकेट विश्वचषक जिंकलाः प्रतिका, स्नेह, रेणुकाला रेल्वेकडून बढती!

महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघातील खेळाडू प्रतिका रावत, स्नेह राणा आणि रेणुका सिंह ठाकूर यांना भारतीय रेल्वेकडून विशेष कार्य अधिकारी (क्रीडा) या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. या नामवंत महिला क्रिकेटपटूंना, विशेष बाब म्हणून (Out-of-Turn Promotion) पदोन्नती देण्यात आली...

मुंबईत जल मेट्रो प्रकल्प राबवा!

मुंबई शहर, पूर्व-पश्चिम विभागातील झोपडपट्ट्यांचा झपाट्याने विकास होत असल्याने त्या-त्या भागातील लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामानाने येथील अंतर्गत रस्ते तसेच पायाभूत सुविधांमध्ये वाढ होत नसल्याने मुंबईकरांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. मुंबईच्या रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी...
Skip to content