Homeटॉप स्टोरीविधानभवनात तरी मूळ...

विधानभवनात तरी मूळ शिवसेना ठाकरेंचीच…

शिवसेनेच्या एकनाथ शिन्दे गटासाठी स्वतंत्र कार्यालय देण्यात आल्यामुळे मूळ शिवसेना कोणाची, हा प्रश्न किमान विधानभवनापुरता तरी निकाली निघाला आहे. शिवसेनेत उभी फूट पाडून ५५ पैकी ४० आमदार फोडून एकनाथ शिन्दे यांनी राज्यात सत्ताबदल घडवून आणला. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रीपदही मिळवले. पण त्यांच्या सरकारच्या विश्वासदर्शक ठरावाच्या विशेष अधिवेशनाच्या वेळी शिन्दे गटाला मूळ शिवसेनेच्या कार्यालयावर कब्जा करण्यात अपयश आले होते. त्यामुळे विश्वासदर्शक ठरावाच्या अधिवेशनाच्या काळात शिवसेनेच्या विधानभवनातील चौथ्या मजल्यावरील कार्यालयाला कुलूप लावण्यात आले.

एकनाथ शिन्दे यांचे सरकार महिन्याभरापेक्षा जास्त काळ मंत्र्यांच्या प्रतीक्षेत होते. मंत्रिमंडळ विस्तारामुळे बुधवारपासून सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिन्दे गटाला सातव्या मजल्यावर स्वतंत्र कार्यालय देण्यात आले आहे. त्यामुळे मूळ शिवसेनेचे चौथ्या मजल्यावरील कार्यालय कायम राहिल्यामुळे चौथ्या मजल्यावर शिवसेनेचे तर सातव्या मजल्यावर शिन्दे गटाचे म्हणजेच स्वयंघोषित शिवसेनेचे कार्यालय राहणार आहे.

मूळ शिवसेना कोणाची हा प्रश्न गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चिला जात आहे. शिन्दे गटाने म्हणजे एकनाथ शिन्दे यांच्यापासून ते सर्वच चाळीस आमदारांनी आम्ही शिवसेना सोडलेली नाही, अशी भूमिका घेतलेली आहे. सर्वोच्च न्यायालयातही ज्येष्ठ वकील हरीष साळवे यांनीही तीच भूमिका शिन्दे गटाच्या वतीने मांडलेली आहे. पण, विधानसभेत शिन्दे गट मूळ शिवसेनेपासून वेगळा झालेला असून त्यांनी स्वंतत्र प्रतोदही नेमलाय आणि आपलीच खरी शिवसेना असल्याचा दावाही केलेला आहे.

असे असूनही मूळ शिवसेनेचे विधान भवनातील कार्यालय कायम ठेवून शिन्दे गटासाठी सातव्या मजल्यावर स्वतंत्र कार्यालय देण्यात आले आहे. त्यामुळे किमान विधानभवनात तरी मूळ शिवसेना म्हटले की चौथ्या मजल्यावरचे कार्यालय आणि शिन्दे गट म्हटले की सातव्या मजल्यावरचे कार्यालय यावर आज शिक्कामोर्तब झाले आहे.

Continue reading

औचित्त्याची ऐशीतैशी…

मराठी भाषेमध्ये एखाद्या गोष्टीचे औचित्त्य काय आहे, असे विचारताना औचित्त्य, या शब्दाचा अर्थ माहीत असणे अभिप्रेत असते. राज्याच्या विधानसभेत कामकाज केले जाताना औचित्त्याचे मुद्दे म्हणून काही बाबी आमदारांना उपस्थित करता येतात आणि सरकारने त्यावर उचित कार्यवाही करणेही अपेक्षित असते....

वाटाणा वाटाणा पे लिखा है `खाने’वाले का…

वाटाण्यावाटाण्यात काय फरक असणार, असे कोणी विचारले तर हा प्रश्न निरर्थक मानू नका. हिरव्या आणि पांढऱ्या वाटाण्यात फरक असतो आणि या फरकातून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही सरकारवर होऊ शकतो, हे मंगळवारी राज्याच्या विधानसभेत दिसून आले. आमदार कैलास घाडगे-पाटील...

मुनगंटीवार वन्स अगेन!

सरकारी काम म्हणजे सहा महिने थांब... असं कायम म्हटलं जातं आणि नेमका त्याचाच अनुभव राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना आल्याचे गुरुवारी राज्याच्या विधानसभेत स्पष्ट झाले. सरकारी कर्मचारी, अधिकाऱ्यांनी आपल्या वृद्ध पालकांची तसेच कुटुंबातील दिव्यांग व्यक्तींची जबाबदारी घ्यावी, याची...
Skip to content