Homeटॉप स्टोरीअखेर संजय राठोड...

अखेर संजय राठोड यांचा राजीनामा मंजूर!

पूजा चव्हाण यांच्या मृत्यू प्रकरणात गाजत राहिलेले वनमंत्री यांचा मंत्रीपदाचा राजीनामा आज अखेर मंजूर झाला. रविवारपासून दाबून ठेवलेला राठोड यांचा राजीनामा भारतीय जनता पार्टीच्या दबावानंतर आज मुख्यमंत्र्यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवला. तेथे तो लागलीच मंजूर करण्यात आला.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा मंजूर केला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विनंतीनुसार राठोड यांच्या खात्याचा कार्यभार मुख्यमंत्र्यांकडे देण्यास मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्र्यांकडून आजच (दि. ४ मार्च) दुपारी संजय राठोड यांच्या राजीनाम्याचे पत्र राज्यपालांना प्राप्त झाले होते, असे राजभवनाकडून सांगण्यात आले.

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात संजय राठोड यांचा सहभाग असल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला होता. राठोड यांचा राजीनामा घ्यावा तसेच त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून चौकशी करावी, अशी मागणी केली जात होती. भाजपा नेत्यांनी या प्रकरणातील अनेक पुरावे

जनतेसमोर उघड केले होते. तरीही मुख्यमंत्री ठाकरे त्यांना पाठिशी घालत होते. या काळात वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्नही राठोड यांनी केला. अखेर तब्बल २० दिवसांनंतर रविवारी, विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राठोड यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपविला. या राजीनाम्याचे काय करणार, असा सवाल मुख्यमंत्र्यांना विचारला असता तो फ्रेम करण्यासाठी ठेवलेला नाही, असे ते म्हणाले होते. मात्र, प्रत्यक्षात त्यांनी राजीनामा आपल्याकडेच ठेवला होता.

राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडे पाठविलाच गेला नसल्याचे लक्षात येताच भाजपाच्या नेत्यांनी पुन्हा सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. त्यातच कर्नाटकचे मंत्री जारकीहोळी यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप झाला. तशी एक व्हिडिओ क्लिप समाजमाध्यमांत फिरू लागली. त्याबरोबर जारकीहोळी यांनी लगेचच आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे ठाकरे यांच्यांवरील दबाव वाढला आणि त्यांना राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडे मंजुरीसाठी पाठवावा लागला. आज दुपारी त्यांनी तो राजभवनाकडे पाठविला आणि राज्यपालांनी तो लगेचच मंजूर केला.

Continue reading

भायखळ्याच्या भोसले उद्यानात आजपासून ‘मुंबई पुष्पोत्सव’!

मुंबई महापालिका आणि वृक्ष प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने भायखळ्याच्या येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात आजपासून रविवार, ८ फेब्रुवारीपर्यंत उद्यानविद्या प्रदर्शन अर्थात ‘मुंबई पुष्पोत्सव’ आयोजित करण्यात येणार आहे. उद्घाटनानंतर आज रात्री ८ वाजेपर्यंत पुष्पोत्सव सर्वांसाठी खुला राहील....

संगीत-नाट्य क्षेत्रातल्या रसिकांनी अनुभवले भावूक क्षण!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात झालेल्या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्याने उत्साहाचे आणि कलेच्या गौरवाचे वातावरण निर्माण झाले. संगीत, नाटक, साहित्य आणि अभिनय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कलाकारांना यंदा मानांकित करण्यात आले, ज्यामुळे उपस्थित रसिकांनी दाद देत टाळ्यांचा कडकडाट...

सयाजी नगरी एक्सप्रेस ठरली मुंबईतली पहिली ‘कवच’धारी गाडी!

पश्चिम रेल्वेने विरार-बडोदा विभागात अपघातापासून बचाव करणारी ‘कवच 4.0’ प्रणाली कार्यान्वित केली आहे. गाडी क्रमांक 20907 दादर–भूज सयाजी नगरी एक्सप्रेस, ही मुंबईतून सुटणारी कवच प्रणालीने सुसज्ज असलेली पहिली गाडी ठरली आहे. या गाडीवर हे सुरक्षा कवच बसवण्यात आले आहे....
Skip to content