Homeचिट चॅटअसि. पोस्टमास्तर वंदना...

असि. पोस्टमास्तर वंदना पै निवृत्त

असिस्टंट पोस्टमास्तर वंदना पै या उत्तम लेखिका, कवयित्री आहेत. त्यांनी आपल्या ३८ वर्षांच्या सेवेनंतर स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. आता त्यांनी आपल्या कुटुंबाला योग्य तो वेळ द्यावाच, त्याचबरोबर वंदनाताईंनी आपल्यामधील कवी, लेखक जागृत ठेवताठेवता नवसाहित्याची निर्मिती करावी आणि पोस्ट कर्मचारी/ अधिकारी यांच्याबरोबरच समाजाचेही प्रबोधन करावे, असे प्रतिपादन शब्दांत ज्येष्ठ पत्रकार योगेश त्रिवेदी यांनी केला.

वंदना पै यांनी केंद्र सरकारच्या पोस्ट खात्यातून नुकतीच स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. याबद्दल त्यांचा बोरीवली पूर्व पोस्ट कार्यालयात गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्रिवेदी बोलत होते.

वंदना पै यांनी त्यांच्या कारकिर्दीत बोरिवली पूर्व विभागात अनेक शिबिरांचे आयोजन करून जनतेसाठी उपयोगी असणाऱ्या अनेक बचत योजना सर्वसाधारण जनतेच्या दारापर्यंत पोहोचविल्या. यात खास मुलींसाठी असणारी सुकन्या योजना, सगळ्यात जास्त व्याजदर असणारी पीपीएफ योजना, पंतप्रधान जीवनसुरक्षा योजना तसेच अनेक आधार कॅम्प यांचा समावेश होता. गेल्या वर्षी लॉकडाऊनच्या काळात त्यांनी पेन्शनधारकांना घरपोच पेन्शन नेऊन देण्याची व्यवस्था केली. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी या ऑफिसला अनेकदा उत्कृष्ट कार्याबद्दल पारितोषिके मिळवून दिली, असा माहितीपूर्ण गौरवही त्यांनी केला.

त्यांच्या गौरव समारंभास टपाल कामगार युनियनचे या विभागाचे माजी सेक्रेटरी सी. ए. राजपूत, युनियनचे राष्ट्रीय स्तरावरील नेते विजय आयरे, कामगार नेते दिलीप कुडतरकर आणि आसपासच्या अनेक टपाल कार्यालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान या ऑफिसमधील असिस्टंट पोस्टमास्तर प्रिया कारकल यांनी भूषविले. वंदना पै यांनी धाडसी, साहसी महिला अधिकारी म्हणून आपला दबदबा निर्माण करतानाच अखिल भारतीय पातळीवर संघटनेतही मोठमोठाली पदे भूषविली. विजय वैद्य यांनी त्यांच्या कार्याचा गौरव करताना अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असल्याची आठवण करुन दिली.

या गौरव समारंभात मीनल मोरे, संगीता रावराणे, धूपकर, रामदास चोडणकर, सखाराम तळेकर, प्रभाकर घोरपडे, सुनील पांगे, दिलीप चिंदरकर, बी. जी. चव्हाण, महेंद्र गणाचार्य, कुंडलिक काकडे, सूर्यकांत कदम, सुखदेव लोखंडे, वसंत घडशी आदींनी वंदना पै यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांचे परिवारजनसुद्धा यावेळी आवर्जून उपस्थित होते.

Continue reading

भायखळ्याच्या भोसले उद्यानात आजपासून ‘मुंबई पुष्पोत्सव’!

मुंबई महापालिका आणि वृक्ष प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने भायखळ्याच्या येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात आजपासून रविवार, ८ फेब्रुवारीपर्यंत उद्यानविद्या प्रदर्शन अर्थात ‘मुंबई पुष्पोत्सव’ आयोजित करण्यात येणार आहे. उद्घाटनानंतर आज रात्री ८ वाजेपर्यंत पुष्पोत्सव सर्वांसाठी खुला राहील....

संगीत-नाट्य क्षेत्रातल्या रसिकांनी अनुभवले भावूक क्षण!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात झालेल्या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्याने उत्साहाचे आणि कलेच्या गौरवाचे वातावरण निर्माण झाले. संगीत, नाटक, साहित्य आणि अभिनय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कलाकारांना यंदा मानांकित करण्यात आले, ज्यामुळे उपस्थित रसिकांनी दाद देत टाळ्यांचा कडकडाट...

सयाजी नगरी एक्सप्रेस ठरली मुंबईतली पहिली ‘कवच’धारी गाडी!

पश्चिम रेल्वेने विरार-बडोदा विभागात अपघातापासून बचाव करणारी ‘कवच 4.0’ प्रणाली कार्यान्वित केली आहे. गाडी क्रमांक 20907 दादर–भूज सयाजी नगरी एक्सप्रेस, ही मुंबईतून सुटणारी कवच प्रणालीने सुसज्ज असलेली पहिली गाडी ठरली आहे. या गाडीवर हे सुरक्षा कवच बसवण्यात आले आहे....
Skip to content