Tuesday, February 4, 2025
Homeचिट चॅटअसि. पोस्टमास्तर वंदना...

असि. पोस्टमास्तर वंदना पै निवृत्त

असिस्टंट पोस्टमास्तर वंदना पै या उत्तम लेखिका, कवयित्री आहेत. त्यांनी आपल्या ३८ वर्षांच्या सेवेनंतर स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. आता त्यांनी आपल्या कुटुंबाला योग्य तो वेळ द्यावाच, त्याचबरोबर वंदनाताईंनी आपल्यामधील कवी, लेखक जागृत ठेवताठेवता नवसाहित्याची निर्मिती करावी आणि पोस्ट कर्मचारी/ अधिकारी यांच्याबरोबरच समाजाचेही प्रबोधन करावे, असे प्रतिपादन शब्दांत ज्येष्ठ पत्रकार योगेश त्रिवेदी यांनी केला.

वंदना पै यांनी केंद्र सरकारच्या पोस्ट खात्यातून नुकतीच स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. याबद्दल त्यांचा बोरीवली पूर्व पोस्ट कार्यालयात गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्रिवेदी बोलत होते.

वंदना पै यांनी त्यांच्या कारकिर्दीत बोरिवली पूर्व विभागात अनेक शिबिरांचे आयोजन करून जनतेसाठी उपयोगी असणाऱ्या अनेक बचत योजना सर्वसाधारण जनतेच्या दारापर्यंत पोहोचविल्या. यात खास मुलींसाठी असणारी सुकन्या योजना, सगळ्यात जास्त व्याजदर असणारी पीपीएफ योजना, पंतप्रधान जीवनसुरक्षा योजना तसेच अनेक आधार कॅम्प यांचा समावेश होता. गेल्या वर्षी लॉकडाऊनच्या काळात त्यांनी पेन्शनधारकांना घरपोच पेन्शन नेऊन देण्याची व्यवस्था केली. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी या ऑफिसला अनेकदा उत्कृष्ट कार्याबद्दल पारितोषिके मिळवून दिली, असा माहितीपूर्ण गौरवही त्यांनी केला.

त्यांच्या गौरव समारंभास टपाल कामगार युनियनचे या विभागाचे माजी सेक्रेटरी सी. ए. राजपूत, युनियनचे राष्ट्रीय स्तरावरील नेते विजय आयरे, कामगार नेते दिलीप कुडतरकर आणि आसपासच्या अनेक टपाल कार्यालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान या ऑफिसमधील असिस्टंट पोस्टमास्तर प्रिया कारकल यांनी भूषविले. वंदना पै यांनी धाडसी, साहसी महिला अधिकारी म्हणून आपला दबदबा निर्माण करतानाच अखिल भारतीय पातळीवर संघटनेतही मोठमोठाली पदे भूषविली. विजय वैद्य यांनी त्यांच्या कार्याचा गौरव करताना अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असल्याची आठवण करुन दिली.

या गौरव समारंभात मीनल मोरे, संगीता रावराणे, धूपकर, रामदास चोडणकर, सखाराम तळेकर, प्रभाकर घोरपडे, सुनील पांगे, दिलीप चिंदरकर, बी. जी. चव्हाण, महेंद्र गणाचार्य, कुंडलिक काकडे, सूर्यकांत कदम, सुखदेव लोखंडे, वसंत घडशी आदींनी वंदना पै यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांचे परिवारजनसुद्धा यावेळी आवर्जून उपस्थित होते.

Continue reading

श्री मावळी मंडळाच्या खो-खो स्पर्धेत ज्ञानविकास,विहंग विजयी

ठाण्यातील श्री मावळी मंडळ संस्थेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित प्रथम विभागीय खो-खो स्पर्धेच्या महिला गटात ज्ञानविकास फाउंडेशन संघ (ठाणे) व पुरुष गटात विहंग क्रीडा केंद्र (ठाणे) या संघांनी विजेतेपद पटकावले. महिला गटातील अंतिम सामन्यात ठाण्याच्या ज्ञानविकास फाउंडेशन संघाने ठाण्याच्या रा....

महाराष्ट्रात सुरू होणार देशातले पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स विद्यापीठ

महाराष्ट्रात देशातील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे नियोजन आणि अंमलबजावणीसाठी एक टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे, असे राज्याचे तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले. नवे विद्यापीठ AI आणि संबंधित क्षेत्रातील संशोधन आणि विकासाला...

शेअर बाजारात पहिल्या 5 मिनिटांत गुंतवणूकदारांचे 5 लाख कोटी पाण्यात!

बजेटनंतरच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराच्या व्यवहारात पहिल्या अवघ्या पाच मिनिटांत सेन्सेक्स 700 अंकांनी कोसळला. त्यामुळे या पहिल्या 5 मिनिटांत गुंतवणूकदारांचे तब्बल 5 लाख कोटींचे नुकसान झाले. कार्पोरेट क्षेत्राची बजेटने निराशा केल्याचे मानले जात आहे. इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात अपेक्षित गुंतवणूक न...
Skip to content