Homeचिट चॅटअसि. पोस्टमास्तर वंदना...

असि. पोस्टमास्तर वंदना पै निवृत्त

असिस्टंट पोस्टमास्तर वंदना पै या उत्तम लेखिका, कवयित्री आहेत. त्यांनी आपल्या ३८ वर्षांच्या सेवेनंतर स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. आता त्यांनी आपल्या कुटुंबाला योग्य तो वेळ द्यावाच, त्याचबरोबर वंदनाताईंनी आपल्यामधील कवी, लेखक जागृत ठेवताठेवता नवसाहित्याची निर्मिती करावी आणि पोस्ट कर्मचारी/ अधिकारी यांच्याबरोबरच समाजाचेही प्रबोधन करावे, असे प्रतिपादन शब्दांत ज्येष्ठ पत्रकार योगेश त्रिवेदी यांनी केला.

वंदना पै यांनी केंद्र सरकारच्या पोस्ट खात्यातून नुकतीच स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. याबद्दल त्यांचा बोरीवली पूर्व पोस्ट कार्यालयात गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्रिवेदी बोलत होते.

वंदना पै यांनी त्यांच्या कारकिर्दीत बोरिवली पूर्व विभागात अनेक शिबिरांचे आयोजन करून जनतेसाठी उपयोगी असणाऱ्या अनेक बचत योजना सर्वसाधारण जनतेच्या दारापर्यंत पोहोचविल्या. यात खास मुलींसाठी असणारी सुकन्या योजना, सगळ्यात जास्त व्याजदर असणारी पीपीएफ योजना, पंतप्रधान जीवनसुरक्षा योजना तसेच अनेक आधार कॅम्प यांचा समावेश होता. गेल्या वर्षी लॉकडाऊनच्या काळात त्यांनी पेन्शनधारकांना घरपोच पेन्शन नेऊन देण्याची व्यवस्था केली. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी या ऑफिसला अनेकदा उत्कृष्ट कार्याबद्दल पारितोषिके मिळवून दिली, असा माहितीपूर्ण गौरवही त्यांनी केला.

त्यांच्या गौरव समारंभास टपाल कामगार युनियनचे या विभागाचे माजी सेक्रेटरी सी. ए. राजपूत, युनियनचे राष्ट्रीय स्तरावरील नेते विजय आयरे, कामगार नेते दिलीप कुडतरकर आणि आसपासच्या अनेक टपाल कार्यालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान या ऑफिसमधील असिस्टंट पोस्टमास्तर प्रिया कारकल यांनी भूषविले. वंदना पै यांनी धाडसी, साहसी महिला अधिकारी म्हणून आपला दबदबा निर्माण करतानाच अखिल भारतीय पातळीवर संघटनेतही मोठमोठाली पदे भूषविली. विजय वैद्य यांनी त्यांच्या कार्याचा गौरव करताना अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असल्याची आठवण करुन दिली.

या गौरव समारंभात मीनल मोरे, संगीता रावराणे, धूपकर, रामदास चोडणकर, सखाराम तळेकर, प्रभाकर घोरपडे, सुनील पांगे, दिलीप चिंदरकर, बी. जी. चव्हाण, महेंद्र गणाचार्य, कुंडलिक काकडे, सूर्यकांत कदम, सुखदेव लोखंडे, वसंत घडशी आदींनी वंदना पै यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांचे परिवारजनसुद्धा यावेळी आवर्जून उपस्थित होते.

Continue reading

मराठी शाळांकडील शासकीय दुर्लक्ष अत्यंत घातकी!

महाराष्ट्र शसनाने मराठी शाळांकडे केलेले दुर्लक्ष अत्यंत घातक टप्प्यावर पोहोचले आहे. नरेंद्र जाधव समितीचा फार्स आणि मुंबई महानगरपालिकेसारख्या यंत्रणेकडून जाणीवपूर्वक अनुदानित शाळा बंद पाडण्याचे कारस्थान, हा या व्यापक योजनेचाच भाग आहे. याबद्दल शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली पाहिजे. राजकीय...

पुणेकरांची करोडोंची होणारी ‘दिवाळी लूटमार’ यंदा बंद!

पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिकांची होणारी करोडो रुपयांची "दिवाळी लूटमार" यंदा बंद होणार! दरवर्षी दिवाळीत, पुण्यातील सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांची पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून काही भामटे आर्थिक फसवणूक करत होते. व्यावसायिक...

अकोला, अहिल्यानगर, अलिबागेतून मान्सून परतला! आज राज्यातून एक्झिट!!

राज्यातील मान्सूनच्या माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अकोला, अहिल्यानगर, अलिबाग या रेषेच्या वरील भागातून मान्सूनने माघार घेतली आहे. आता येत्या 24 तासात मान्सूनची महाराष्ट्रातून पूर्ण एक्झिट होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तविला आहे. रिटर्न मान्सूनसाठी उर्वरित राज्यात वातावरण...
Skip to content