Homeटॉप स्टोरीपूरग्रस्त विद्यार्थांना जेईई...

पूरग्रस्त विद्यार्थांना जेईई मेन परीक्षेची पुन्हा संधी!

महाराष्ट्रातील अतिवृष्टीमुळे जे विद्यार्थी आज, 25 आणि 27 जुलै रोजी होणारी जेईई परीक्षा देऊ शकणार नाहीत, त्यांना ही परीक्षा देण्याची आणखी एक संधी दिली जाईल, अशी घोषणा राष्ट्रीय चाचणी यंत्रणा- एनटीए ने केली आहे. नव्या तारखा लवकरच घोषित केल्या जातील.

कोल्हापूर, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदूर्ग, सांगली आणि सातारा या सात शहरांमध्ये  ज्या उमेदवारांची परीक्षा केंद्रे आहेत, आणि जे विद्यार्थी तिसऱ्या टप्प्यातल्या परीक्षेसाठी 25 आणि 27 जुलै रोजी पावसामुळे केंद्रांवर जाऊ शकत नाहीत, अशा सर्व विद्यार्थ्यांना आणखी एकदा परीक्षा देण्याची संधी दिली जाईल.

महाराष्ट्रात झालेली अतिवृष्टी आणि दरडी कोसळण्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर, कोल्हापूर, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदूर्ग, सांगली आणि सातारा या सात शहरांमध्ये ज्या उमेदवारांची परीक्षा केंद्रे आहेत आणि जे  विद्यार्थी तिसऱ्या टप्प्यातल्या परीक्षेसाठी या केंद्रांवर जाऊ शकत नाहीत, अशा सर्व विद्यार्थ्यांना आणखी एक संधी देण्याची सूचना एनटीए- म्हणजेच राष्ट्रीय चाचणी यंत्रणेला दिली आहे, अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल ट्विटरवरुन दिली.

या शहरांमध्ये ज्यांची परीक्षा केंद्रे आहेत, असे विद्यार्थी सद्य परिस्थितीत कदाचित उद्या म्हणजेच 25 आणि 27 जुलैला होणाऱ्या परीक्षांसाठी जाऊ शकणार नाहीत, मात्र म्हणून त्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. त्यांना परीक्षेसाठी पुन्हा एक संधी दिली जाईल आणि या पर्यायी तारखा एनटीए लवकरच जाहीर करेल, असे प्रधान यांनी म्हटले आहे.

जेईई मेन परीक्षेच्या तिसऱ्या सत्रातील परीक्षा  देशभरात, 20, 22, 25 आणि 27 जुलै रोजी नियोजित केल्या आहेत.  देशातल्या आणि परदेशातील 334 शहरांमध्ये या परीक्षा होत आहेत. एनटीए ने याआधी 20 आणि 22 जुलै रोजी दोन परीक्षा घेतल्या आहेत. या सर्व परीक्षार्थींना एनटीएच्या (www.nta.ac.in) संकेतस्थळाकडे (jeemain.nta.nic.in) लक्ष देत राहावे, त्यावर त्यांना परीक्षेविषयीची ताजी माहिती मिळू शकेल, असा सल्लाही त्यांना देण्यात आला आहे.

सविस्तर माहिती आणि स्पष्टीकरणासाठी JEE (Main) – 2021चे परीक्षार्थी 011-40759000 या क्रमांकावर अथवा jeemain@nta.ac.in या ईमेलवर संपर्क साधू शकतात.

Continue reading

प्री आणि पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी 31 जानेवारीपर्यंत करा अर्ज

मुंबई शहर जिल्ह्यातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी प्री-मॅट्रिक (इ. 9वी व 10वी) व पोस्ट-मॅट्रिक (इ. 11वी ते पदव्युत्तर / व्यावसायिक अभ्यासक्रम) शिष्यवृत्तीच्या लाभासाठी एनएसपी (नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर) येत्या 31 जानेवारीपर्यंत सादर करावेत, असे इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, मुंबई शहरचे सहाय्यक संचालक रविकिरण पाटील यांनी कळविले आहे. केंद्र...

मकर संक्रांत म्हणजे काय?

मकर संक्रात या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. भारतीय संस्कृतीत हा सण आपापसातील कलह विसरून प्रेमभाव वाढवण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक जीव ‘तीळगूळ घ्या, गोड बोला’ असे म्हणून जवळ येतो. हा सण तिथीवाचक नाही. मकर संक्रांतीचा...

कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना नवतंत्रज्ञानाची माहिती

देशातील अव्वल बायोडायव्हर्सिटी आणि विविध पिकांची उत्पादनक्षमता असलेल्या नंदुरबार जिल्हा व परिसरातील कष्टाळू व प्रयोगशील शेतकऱ्यांना शहादा येथे नुकत्याच झालेल्या ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनासारख्या आयोजनातून नवतंत्रज्ञानाचे उपयुक्त मार्गदर्शन मिळते. त्याचा उपयोग करून नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी तसेच शेतकरी उत्पादक गट क्रांती...
Skip to content