Homeकल्चर +आशियाई स्पर्धेत अमृता...

आशियाई स्पर्धेत अमृता भगत ठरली ‘बेस्ट लिफ्टर’!

दक्षिण आफ्रिकेत नुकत्याच झालेल्या आशिया पॅसिफिक आफ्रिकन क्लासिक आणि इक्विप पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत रायगडची पॉवरलिफ्टर अमृता भगत ठरली “बेस्ट लिफ्टर”. अमृता शेलू वांगणीची रहिवासी असून तिने 47 किलो वजनी गटात भारताचे प्रतिनिधित्व केले होते.

या स्पर्धेत अमृता भगत हिने जूनियर इक्विप गटातल्या स्कॉट प्रकारात 122.5 किलो वजन, बेंच प्रेस प्रकारात 67.5 किलो वजन, आणि डेडलिफ्ट प्रकारात 132.5 किलो वजन उचलले. तिने एकूण 322.5 किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले. त्याचबरोबर “एशियन बेस्ट लिफ्टर” हा किताबसुद्धा प्राप्त केला. अमृता भगतची ही दुसरी आंतरराष्ट्रीय स्पर्धा होती आणि तिने पदकांची परंपरा कायम राखली.

अमृता भगत हिला खोपोलीमधील विक्रांत गायकवाड यांचे मार्गदर्शन असून ती अतिशय खडतर मेहनत घेते. रायगडच्या महिला खेळाडूला पहिल्यांदाच आशियाई स्पर्धेत किताब मिळाला आहे. याबद्दल पॉवरलिफ्टिंग स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष आणि माजी राज्य खेळाडू गिरीश वेदक, माजी राष्ट्रीय खेळाडू माधव पंडित आणि सचिव अरुण पाटकर यांनी आनंद व्यक्त केला आहे. तिच्या या यशाबद्दल पॉवरलिफ्टिंग स्पोर्ट्स असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी तिचे खास अभिनंदन केले असून येणाऱ्या भावी काळासाठी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. लवकरच तिचा असोसिएशनतर्फे खास गौरव करण्यात येणार आहे.

Continue reading

हक्कभंग समितीसमोर माफी मागण्यास कुणाल कामराचा ठाम नकार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या उपरोधिक विडंबनामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने गुरुवारी महाराष्ट्र विधान परिषद विशेषाधिकार (हक्कभंग) समितीसमोर हजर होऊन माफी मागण्यास पुन्हा एकदा स्पष्ट नकार दिला आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दाखल केलेल्या...

म. गांधीजींच्या गावातच गुजरात सरकारकडून मद्यविक्रीला परवानगी!

महात्मा गांधींचे जन्मस्थान असलेल्या पोरबंदरमध्ये इतिहासात पहिल्यांदाच गुजरात सरकारकडून, एका आलिशान हॉटेलला मद्यविक्रीचा परवाना मंजूर करण्यात आला आहे. गुजरात राज्य उत्पादन शुल्क आणि प्रतिबंध विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे शहरात वादाला तोंड फुटले असून, गांधीवादी संस्था आणि स्थानिक नागरिकांनी याविरोधात...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी पूर्णपणे डिजिटल, जुनी पद्धत बंद!

कल्पना करा, तुमच्या कुटुंबातील एखाद्या गरीब रुग्णाला महागड्या उपचाराची गरज आहे. पूर्वीच्या काळात नातेवाईकांना मंत्रालयापर्यंत धावपळ करावी लागायची, कागदपत्रांची रास भरावी लागायची, दलालांच्या जाळ्यात अडकावे लागायचे आणि उपचारात विलंब होऊन रुग्णाची स्थिती बिघडायची. पण आता ती सगळी कहाणी संपली!...
Skip to content