Tuesday, February 4, 2025
Homeकल्चर +आशियाई स्पर्धेत अमृता...

आशियाई स्पर्धेत अमृता भगत ठरली ‘बेस्ट लिफ्टर’!

दक्षिण आफ्रिकेत नुकत्याच झालेल्या आशिया पॅसिफिक आफ्रिकन क्लासिक आणि इक्विप पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत रायगडची पॉवरलिफ्टर अमृता भगत ठरली “बेस्ट लिफ्टर”. अमृता शेलू वांगणीची रहिवासी असून तिने 47 किलो वजनी गटात भारताचे प्रतिनिधित्व केले होते.

या स्पर्धेत अमृता भगत हिने जूनियर इक्विप गटातल्या स्कॉट प्रकारात 122.5 किलो वजन, बेंच प्रेस प्रकारात 67.5 किलो वजन, आणि डेडलिफ्ट प्रकारात 132.5 किलो वजन उचलले. तिने एकूण 322.5 किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले. त्याचबरोबर “एशियन बेस्ट लिफ्टर” हा किताबसुद्धा प्राप्त केला. अमृता भगतची ही दुसरी आंतरराष्ट्रीय स्पर्धा होती आणि तिने पदकांची परंपरा कायम राखली.

अमृता भगत हिला खोपोलीमधील विक्रांत गायकवाड यांचे मार्गदर्शन असून ती अतिशय खडतर मेहनत घेते. रायगडच्या महिला खेळाडूला पहिल्यांदाच आशियाई स्पर्धेत किताब मिळाला आहे. याबद्दल पॉवरलिफ्टिंग स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष आणि माजी राज्य खेळाडू गिरीश वेदक, माजी राष्ट्रीय खेळाडू माधव पंडित आणि सचिव अरुण पाटकर यांनी आनंद व्यक्त केला आहे. तिच्या या यशाबद्दल पॉवरलिफ्टिंग स्पोर्ट्स असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी तिचे खास अभिनंदन केले असून येणाऱ्या भावी काळासाठी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. लवकरच तिचा असोसिएशनतर्फे खास गौरव करण्यात येणार आहे.

Continue reading

श्री मावळी मंडळाच्या खो-खो स्पर्धेत ज्ञानविकास,विहंग विजयी

ठाण्यातील श्री मावळी मंडळ संस्थेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित प्रथम विभागीय खो-खो स्पर्धेच्या महिला गटात ज्ञानविकास फाउंडेशन संघ (ठाणे) व पुरुष गटात विहंग क्रीडा केंद्र (ठाणे) या संघांनी विजेतेपद पटकावले. महिला गटातील अंतिम सामन्यात ठाण्याच्या ज्ञानविकास फाउंडेशन संघाने ठाण्याच्या रा....

महाराष्ट्रात सुरू होणार देशातले पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स विद्यापीठ

महाराष्ट्रात देशातील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे नियोजन आणि अंमलबजावणीसाठी एक टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे, असे राज्याचे तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले. नवे विद्यापीठ AI आणि संबंधित क्षेत्रातील संशोधन आणि विकासाला...

शेअर बाजारात पहिल्या 5 मिनिटांत गुंतवणूकदारांचे 5 लाख कोटी पाण्यात!

बजेटनंतरच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराच्या व्यवहारात पहिल्या अवघ्या पाच मिनिटांत सेन्सेक्स 700 अंकांनी कोसळला. त्यामुळे या पहिल्या 5 मिनिटांत गुंतवणूकदारांचे तब्बल 5 लाख कोटींचे नुकसान झाले. कार्पोरेट क्षेत्राची बजेटने निराशा केल्याचे मानले जात आहे. इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात अपेक्षित गुंतवणूक न...
Skip to content