Homeकल्चर +आशियाई स्पर्धेत अमृता...

आशियाई स्पर्धेत अमृता भगत ठरली ‘बेस्ट लिफ्टर’!

दक्षिण आफ्रिकेत नुकत्याच झालेल्या आशिया पॅसिफिक आफ्रिकन क्लासिक आणि इक्विप पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत रायगडची पॉवरलिफ्टर अमृता भगत ठरली “बेस्ट लिफ्टर”. अमृता शेलू वांगणीची रहिवासी असून तिने 47 किलो वजनी गटात भारताचे प्रतिनिधित्व केले होते.

या स्पर्धेत अमृता भगत हिने जूनियर इक्विप गटातल्या स्कॉट प्रकारात 122.5 किलो वजन, बेंच प्रेस प्रकारात 67.5 किलो वजन, आणि डेडलिफ्ट प्रकारात 132.5 किलो वजन उचलले. तिने एकूण 322.5 किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले. त्याचबरोबर “एशियन बेस्ट लिफ्टर” हा किताबसुद्धा प्राप्त केला. अमृता भगतची ही दुसरी आंतरराष्ट्रीय स्पर्धा होती आणि तिने पदकांची परंपरा कायम राखली.

अमृता भगत हिला खोपोलीमधील विक्रांत गायकवाड यांचे मार्गदर्शन असून ती अतिशय खडतर मेहनत घेते. रायगडच्या महिला खेळाडूला पहिल्यांदाच आशियाई स्पर्धेत किताब मिळाला आहे. याबद्दल पॉवरलिफ्टिंग स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष आणि माजी राज्य खेळाडू गिरीश वेदक, माजी राष्ट्रीय खेळाडू माधव पंडित आणि सचिव अरुण पाटकर यांनी आनंद व्यक्त केला आहे. तिच्या या यशाबद्दल पॉवरलिफ्टिंग स्पोर्ट्स असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी तिचे खास अभिनंदन केले असून येणाऱ्या भावी काळासाठी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. लवकरच तिचा असोसिएशनतर्फे खास गौरव करण्यात येणार आहे.

Continue reading

हरमित सिंग ठरला ‘खासदार श्री’चा किंग!

मुंबईच्या शरीरसौष्ठवाची अस्सल श्रीमंती दाखवणारी ३००पेक्षा अधिक शरीरसौष्ठवपटूंमध्ये रंगलेली जोरदार चुरस... मुंबईच्या फिटनेस संस्कृतीचा क्रीडासोहळा पाहण्यासाठी क्रीडाप्रेमींची अभूतपूर्व गर्दी आणि केंद्रिय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी केलेली लाख मोलाच्या बक्षिसांची उधळण, यामुळे ‘खासदार श्री शरीरसौष्ठव स्पर्धे’ने...

क्रिकेट विश्वचषक जिंकलाः प्रतिका, स्नेह, रेणुकाला रेल्वेकडून बढती!

महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघातील खेळाडू प्रतिका रावत, स्नेह राणा आणि रेणुका सिंह ठाकूर यांना भारतीय रेल्वेकडून विशेष कार्य अधिकारी (क्रीडा) या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. या नामवंत महिला क्रिकेटपटूंना, विशेष बाब म्हणून (Out-of-Turn Promotion) पदोन्नती देण्यात आली...

मुंबईत जल मेट्रो प्रकल्प राबवा!

मुंबई शहर, पूर्व-पश्चिम विभागातील झोपडपट्ट्यांचा झपाट्याने विकास होत असल्याने त्या-त्या भागातील लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामानाने येथील अंतर्गत रस्ते तसेच पायाभूत सुविधांमध्ये वाढ होत नसल्याने मुंबईकरांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. मुंबईच्या रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी...
Skip to content