Homeकल्चर +आकाशवाणी संगीत संमेलनाला...

आकाशवाणी संगीत संमेलनाला पं. भीमसेन जोशींचे नाव!

आकाशवाणी आणि दूरदर्शन यांनी पंडित भीमसेन जोशी यांच्या संगीताचा खजिना या अगोदरच जनतेसाठी खुला केला असून लवकरच तो लोकांपर्यंत सहजपणे पोहोचावा यासाठी त्याची फेररचना करण्यात येईल तसेच आकाशवाणीचे संगीत संमेलन यापुढे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी आकाशवाणी संगीत संमेलन या नावाने ओळखले जाईल, असे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.

भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पुण्यात आयोजित ‘अभिवादन’ कार्यक्रमात ते बोलत होते.  ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार विनय सहस्रबुद्धे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

संगीतातील अखेरचा शब्द असलेल्या पंडित भीमसेन जोशींनी अनेक तानसेन बनवलेच, परंतु त्याचबरोबर सर्वसामान्यांना कानसेनदेखील बनवले. संगीतामध्ये जीवनाला प्रेरणा देण्याची ताकद आहे. मोठमोठ्या मैफिली गाजवणारे पंडित भीमसेन जोशी मनाने अत्यंत कोमल होते आणि गरिबातल्या गरिबांसाठीदेखील त्यांनी आपल्या संगीताचा खजिना उपलब्ध करून दिला. परदेशातील मैफिलीमध्ये गाणारे पंडितजी पुण्यातील गणेशोत्सवात छोट्या छोट्या मैफिलींमध्येदेखील अत्यंत उत्कटतेने आणि आत्मीयतेने गायचे अशी आठवण प्रकाश जावडेकर यांनी यावेळी सांगितली.

अटलजींच्या काळात पंडित भीमसेन जोशी यांना भारतरत्न दिल्याच्या आठवणींनादेखील जावडेकर यांनी यावेळी उजाळा दिला. हा संगीताचा सर्वोच्च सन्मान असून अशा कलाकारांच्या सन्मानामुळे देशाची मान उंचावते असे ते यावेळी म्हणाले. शरद पवार यांनी यावेळी बोलताना आकाशवाणीने संगीताला घरोघरी नेल्याची आठवण करून दिली आणि दूरदर्शन नसतानादेखील संगीत प्रसारणाची धुरा आकाशवाणीने समर्थपणे सांभाळली असे ते म्हणाले.

यावेळी बोलताना विनय सहस्त्रबुद्धे यांनी संगीताच्या सेवेसाठी आयुष्य वेचलेल्या पंडित भीमसेन जोशी यांनी संगीताचे व्याकरण शुद्ध ठेवूनदेखील ते लोकप्रिय करण्याचे महत्त्वाचे काम केले असे प्रतिपादन केले. जन्मशताब्दी वर्षानिमित्त तयार करण्यात आलेल्या ‘मोनोग्राम’चे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

भीमसेनजींचे शिष्य उपेंद्र भट, आनंद भाटे यांच्या गायनाने समारंभाची शान वाढवली. प्रसिद्ध सतारवादक उस्ताद शाहीद परवेझ यांच्या वादनाने या सत्राचा समारोप झाला. उद्या या कार्यक्रमाचा समारोप होईल.

Continue reading

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...

१ ऑगस्टपासून मंत्रालयाचा प्रवेश होणार पूर्णपणे डिजिटल!

येत्या १ ऑगस्टपासून मुंबईतल्या मंत्रालयातला अभ्यागतांचा प्रवेश पूर्णपणे डिजिटल होणार आहे. महाराष्ट्राचे मंत्रालय अभ्यागतांच्या प्रवेशासाठी पूर्णपणे डिजिटल होईल. १ ऑगस्टपासून, कागदावर आधारित सर्व प्रकारचे पास टप्प्याटप्प्याने बंद केले जातील आणि डिजिटली ओळख पटवून अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेश दिला जाईल. राज्याच्या डिजिटल...

हॉलिवूड नगरीत मराठी तारे-तारकांचे जल्लोषात स्वागत!

'नॉर्थ अमेरिकन मराठी फिल्म असोसिएशन' (नाफा)च्या मराठी चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनासाठी अवघे काही तास उरले असून, महाराष्ट्रातून हॉलिवूड नगरीत दाखल झालेल्या निमंत्रित कलाकारांचे सॅन होजे येथे जल्लोषात स्वागत झाले. २४ जुलैच्या रात्री 'नाफा'चे संस्थापक-अध्यक्ष अभिजीत घोलप यांच्या सिलिकॉन व्हॅली येथील...
Skip to content