Homeचिट चॅटबार कौन्सिल ऑफ...

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र-गोव्याच्या अध्यक्षपदी अहमदखान पठाण

अॅड. अहमदखान पठाण यांची बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याच्या अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. बार कॉन्सिलच्या मुंबईत झालेल्या सर्वसाधारण सभेत सर्वानुमते अॅड. पठाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अॅड. पठाण हे बार कॉन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा, या वकिलाच्या शिखर परिषदेवर सलग तीन वेळा निवडून आले आहेत. यापूर्वी तीन वेळा त्यांनी बार कॉन्सिल ऑफ महाराष्ट्र-गोवाचे उपाध्यक्षपद भूषविलेले आहे. महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या सदस्यपदीही ते तीन वेळा निवडून आले आहेत. ते वक्फ मंडळाचे विद्यमान सदस्यही आहेत.

त्यांच्या अध्यक्षपदावरील निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. पदाला न्याय देऊन वकिलांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यास प्राधान्य दिले जाईल, अशी प्रतिक्रिया पठाण यांनी त्यांच्या निवडीनंतर व्यक्त केली आहे. विधि क्षेत्रातील एक नामवंत शिक्षक म्हणून त्यांचा विशेष लौकिक आहे. त्यांचे अनेक विद्यार्थी विधि क्षेत्रात वकील आणि न्यायाधीशपदावर कार्यरत आहेत. अॅड. पठाण पुणे जिल्हयातील जुन्नर तालुक्यातील बादशहा तलाव येथील आहेत. कुटुंबातील पहिले वकील असलेल्या पठाण यांनी स्वःकर्तृत्वाने हे यश संपादन करून नवीन पिढीसाठी आदर्श निर्माण केला आहे.

Continue reading

भायखळ्याच्या भोसले उद्यानात आजपासून ‘मुंबई पुष्पोत्सव’!

मुंबई महापालिका आणि वृक्ष प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने भायखळ्याच्या येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात आजपासून रविवार, ८ फेब्रुवारीपर्यंत उद्यानविद्या प्रदर्शन अर्थात ‘मुंबई पुष्पोत्सव’ आयोजित करण्यात येणार आहे. उद्घाटनानंतर आज रात्री ८ वाजेपर्यंत पुष्पोत्सव सर्वांसाठी खुला राहील....

संगीत-नाट्य क्षेत्रातल्या रसिकांनी अनुभवले भावूक क्षण!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात झालेल्या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्याने उत्साहाचे आणि कलेच्या गौरवाचे वातावरण निर्माण झाले. संगीत, नाटक, साहित्य आणि अभिनय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कलाकारांना यंदा मानांकित करण्यात आले, ज्यामुळे उपस्थित रसिकांनी दाद देत टाळ्यांचा कडकडाट...

सयाजी नगरी एक्सप्रेस ठरली मुंबईतली पहिली ‘कवच’धारी गाडी!

पश्चिम रेल्वेने विरार-बडोदा विभागात अपघातापासून बचाव करणारी ‘कवच 4.0’ प्रणाली कार्यान्वित केली आहे. गाडी क्रमांक 20907 दादर–भूज सयाजी नगरी एक्सप्रेस, ही मुंबईतून सुटणारी कवच प्रणालीने सुसज्ज असलेली पहिली गाडी ठरली आहे. या गाडीवर हे सुरक्षा कवच बसवण्यात आले आहे....
Skip to content