Homeचिट चॅटबार कौन्सिल ऑफ...

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र-गोव्याच्या अध्यक्षपदी अहमदखान पठाण

अॅड. अहमदखान पठाण यांची बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याच्या अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. बार कॉन्सिलच्या मुंबईत झालेल्या सर्वसाधारण सभेत सर्वानुमते अॅड. पठाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अॅड. पठाण हे बार कॉन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा, या वकिलाच्या शिखर परिषदेवर सलग तीन वेळा निवडून आले आहेत. यापूर्वी तीन वेळा त्यांनी बार कॉन्सिल ऑफ महाराष्ट्र-गोवाचे उपाध्यक्षपद भूषविलेले आहे. महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या सदस्यपदीही ते तीन वेळा निवडून आले आहेत. ते वक्फ मंडळाचे विद्यमान सदस्यही आहेत.

त्यांच्या अध्यक्षपदावरील निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. पदाला न्याय देऊन वकिलांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यास प्राधान्य दिले जाईल, अशी प्रतिक्रिया पठाण यांनी त्यांच्या निवडीनंतर व्यक्त केली आहे. विधि क्षेत्रातील एक नामवंत शिक्षक म्हणून त्यांचा विशेष लौकिक आहे. त्यांचे अनेक विद्यार्थी विधि क्षेत्रात वकील आणि न्यायाधीशपदावर कार्यरत आहेत. अॅड. पठाण पुणे जिल्हयातील जुन्नर तालुक्यातील बादशहा तलाव येथील आहेत. कुटुंबातील पहिले वकील असलेल्या पठाण यांनी स्वःकर्तृत्वाने हे यश संपादन करून नवीन पिढीसाठी आदर्श निर्माण केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

नंदुरबारमधल्या रानफुलांचा चहा प्या मुंबईत!

मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या महानगरांत रहाणाऱ्या नागरिकांना आदिवासी लोक, त्यांची संस्कृती, त्यांची खाद्यसंस्कृती यांविषयी कायमच एक कुतूहल असते. जेव्हा ही संस्कृती अनुभवायला मिळते, तेव्हा तो शहरी नागरिकांसाठी एक विलक्षण अनुभव असतो. हाच विलक्षण अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे उद्या, २२ आणि रविवारी, २३ नोव्हेंबरला!...

भारताच्या सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी व्हायचंय…

भारतीय सैन्यदल, नौदल आणि वायुदलामध्ये अधिकारीपदाकरीता होणाऱ्या सर्विस सिलेक्शन बोर्ड (एसएसबी) मुलाखतीची पूर्वतयारी करून घेण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे नाशिक रोड येथील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. १५ ते २४ डिसेंबर २०२५ या कालावधीत हे प्रशिक्षण होणार असून प्रशिक्षणार्थींना मोफत प्रशिक्षण, निवास...

‘हॅपी बर्थडे’, ‘कडाल कण्णी’ही ठरणार ‘इफ्फी’चे एक आकर्षण!

गोव्यात आजपासून सुरू होत असलेल्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील बाल्यावस्थेतील धैर्य, सर्जनशीलता आणि स्वप्नांचा शोध घेणाऱ्या पाच चित्रपटांचे सादरीकरण होणार आहे. यावेळी इफ्फी पुन्हा एकदा संयुक्त राष्ट्र बालक निधी (युनिसेफ)बरोबर भागीदारी करणार असून चालत्या-बोलत्या, आव्हान देणाऱ्या...
Skip to content