10 ते 14 फेब्रुवारीदरम्यान बेंगळूरुमध्ये ‘एअरो इंडिया’!

“द रनवे टू बिलियन ऑपॉर्च्युनिटीज”, या संकल्पनेवर आधारीत एअरो इंडिया 2025, या आशियातल्या सर्वात मोठ्या एअरो शोच्या 15व्या आवृत्तीचे आयोजन येत्या 10 ते 14 फेब्रुवारीदरम्यान कर्नाटकातल्या बेंगळुरूमधल्या येलहांका हवाईतळावर होणार आहे.

हा कार्यक्रम परदेशी आणि भारतीय कंपन्यांमधल्या भागीदारीला चालना देण्यासाठी आणि स्वदेशीकरणाच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी जागतिक मूल्यसाखळीतील नवीन दालने शोधण्याचा एक मंच उपलब्ध करेल. या कार्यक्रमातले पहिले तीन दिवस (10,11 आणि 12) व्यवसायसंबंधित असतील तर 13 आणि 14 तारखेला सर्वसामान्य जनतेला हा शो पाहण्याची संधी मिळेल. या कार्यक्रमात हवाई प्रात्यक्षिके आणि हवाई क्षेत्रातल्या व्यापक संरक्षण मंचाचे एका जागी मांडलेले प्रदर्शन यांचा समावेश असेल. या कार्यक्रमाचे पूर्वावलोकन, उद्घाटन समारंभ, संरक्षणमंत्र्यांचा परिसंवाद, सीईओंची गोलमेज चर्चा, मंथन स्टार्ट-अप कार्यक्रम, श्वास रोखून धरायला लावणारी हवाई प्रात्यक्षिके, इंडिया पॅव्हेलियनचा समावेश असलेले एक विशाल प्रदर्शन आणि एरोस्पेस कंपन्यांचा व्यापारमेळा असा भरगच्च उपक्रमांचा समावेश असलेला हा कार्यक्रम आहे.

मित्र देशांसोबत संरक्षणविषयक धोरणात्मक भागिदारीसंदर्भात संवाद निर्माण करण्यासाठी, ‘BRIDGE – बिल्डिंग रेझिलिअन्स थ्रू इंटरनॅशनल डिफेन्स अँड ग्लोबल एन्गेजमेंट’ या विषयावर एका परिसंवादाचे यजमानपददेखील भारत भूषविणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने संरक्षणमंत्री, संरक्षण राज्यमंत्री, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ स्तरावर विविध द्विपक्षीय बैठकांचेदेखील नियोजन करण्यात आले आहे. मित्र देशांसोबतची भागीदारी पुढील स्तरावर नेण्यासाठी नव्या दालनांचा शोध घेऊन त्यांच्यासोबतच्या संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रातल्या संबंधांना बळकटी देण्यावर यामध्ये भर देण्यात येईल.

Continue reading

भायखळ्याच्या भोसले उद्यानात आजपासून ‘मुंबई पुष्पोत्सव’!

मुंबई महापालिका आणि वृक्ष प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने भायखळ्याच्या येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात आजपासून रविवार, ८ फेब्रुवारीपर्यंत उद्यानविद्या प्रदर्शन अर्थात ‘मुंबई पुष्पोत्सव’ आयोजित करण्यात येणार आहे. उद्घाटनानंतर आज रात्री ८ वाजेपर्यंत पुष्पोत्सव सर्वांसाठी खुला राहील....

संगीत-नाट्य क्षेत्रातल्या रसिकांनी अनुभवले भावूक क्षण!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात झालेल्या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्याने उत्साहाचे आणि कलेच्या गौरवाचे वातावरण निर्माण झाले. संगीत, नाटक, साहित्य आणि अभिनय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कलाकारांना यंदा मानांकित करण्यात आले, ज्यामुळे उपस्थित रसिकांनी दाद देत टाळ्यांचा कडकडाट...

सयाजी नगरी एक्सप्रेस ठरली मुंबईतली पहिली ‘कवच’धारी गाडी!

पश्चिम रेल्वेने विरार-बडोदा विभागात अपघातापासून बचाव करणारी ‘कवच 4.0’ प्रणाली कार्यान्वित केली आहे. गाडी क्रमांक 20907 दादर–भूज सयाजी नगरी एक्सप्रेस, ही मुंबईतून सुटणारी कवच प्रणालीने सुसज्ज असलेली पहिली गाडी ठरली आहे. या गाडीवर हे सुरक्षा कवच बसवण्यात आले आहे....
Skip to content