10 ते 14 फेब्रुवारीदरम्यान बेंगळूरुमध्ये ‘एअरो इंडिया’!

“द रनवे टू बिलियन ऑपॉर्च्युनिटीज”, या संकल्पनेवर आधारीत एअरो इंडिया 2025, या आशियातल्या सर्वात मोठ्या एअरो शोच्या 15व्या आवृत्तीचे आयोजन येत्या 10 ते 14 फेब्रुवारीदरम्यान कर्नाटकातल्या बेंगळुरूमधल्या येलहांका हवाईतळावर होणार आहे.

हा कार्यक्रम परदेशी आणि भारतीय कंपन्यांमधल्या भागीदारीला चालना देण्यासाठी आणि स्वदेशीकरणाच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी जागतिक मूल्यसाखळीतील नवीन दालने शोधण्याचा एक मंच उपलब्ध करेल. या कार्यक्रमातले पहिले तीन दिवस (10,11 आणि 12) व्यवसायसंबंधित असतील तर 13 आणि 14 तारखेला सर्वसामान्य जनतेला हा शो पाहण्याची संधी मिळेल. या कार्यक्रमात हवाई प्रात्यक्षिके आणि हवाई क्षेत्रातल्या व्यापक संरक्षण मंचाचे एका जागी मांडलेले प्रदर्शन यांचा समावेश असेल. या कार्यक्रमाचे पूर्वावलोकन, उद्घाटन समारंभ, संरक्षणमंत्र्यांचा परिसंवाद, सीईओंची गोलमेज चर्चा, मंथन स्टार्ट-अप कार्यक्रम, श्वास रोखून धरायला लावणारी हवाई प्रात्यक्षिके, इंडिया पॅव्हेलियनचा समावेश असलेले एक विशाल प्रदर्शन आणि एरोस्पेस कंपन्यांचा व्यापारमेळा असा भरगच्च उपक्रमांचा समावेश असलेला हा कार्यक्रम आहे.

मित्र देशांसोबत संरक्षणविषयक धोरणात्मक भागिदारीसंदर्भात संवाद निर्माण करण्यासाठी, ‘BRIDGE – बिल्डिंग रेझिलिअन्स थ्रू इंटरनॅशनल डिफेन्स अँड ग्लोबल एन्गेजमेंट’ या विषयावर एका परिसंवादाचे यजमानपददेखील भारत भूषविणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने संरक्षणमंत्री, संरक्षण राज्यमंत्री, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ स्तरावर विविध द्विपक्षीय बैठकांचेदेखील नियोजन करण्यात आले आहे. मित्र देशांसोबतची भागीदारी पुढील स्तरावर नेण्यासाठी नव्या दालनांचा शोध घेऊन त्यांच्यासोबतच्या संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रातल्या संबंधांना बळकटी देण्यावर यामध्ये भर देण्यात येईल.

Continue reading

मुंबई विमानतळावर 11 कोटींचा माल जप्त!

सीमा शुल्क विभागाच्या मुंबई शाखेने शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या वेगवेगळ्या कारवायांमध्ये 11 कोटींहून अधिक किंमतीचा गांजा (हायड्रोपोनिक वीड), परदेशी वन्यजीव आणि सोने जप्त केले. सीमा शुल्क विभागाच्या मुंबई शाखेतल्या झोन-3 च्या अधिकाऱ्यांनी विमानतळ आयुक्तालय इथे केलेल्या वेगवेगळ्या कारवायांमध्ये पहिल्या प्रकरणात 9.662 किलोग्रॅम...

‘अभिजात साहित्याचे अक्षरविश्व’ प्रकाशित

सुप्रसिद्ध साहित्यिक राजीव श्रीखंडे लिखित आणि ग्रंथालीच्या वतीने प्रकाशित 'अभिजात साहित्याचे अक्षरविश्व', या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, विजय कुवळेकर, संजीवनी खेर आणि दिनकर गांगल यांच्या हस्ते मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या सभागृहात नुकतेच झाले. या पुस्तकात १५३२ ते २००१ या कालावधील जगभरातील साहित्यकृतींचा...

मुंबईत पालिकांच्या शाळेत गणित, इंग्रजीसाठी स्मार्ट तंत्रज्ञान

मुंबई महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना गणित आणि इंग्रजी यासारख्या विषयाची गोडी लागावी तसेच विषयाच्या संकल्पना सोप्या पद्धतीने समजून घेणे शक्य व्हावे यासाठी पालिकेच्‍या शिक्षण विभाग आणि संपर्क फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने संपर्क स्मार्ट शाळा शिक्षक प्रशिक्षण आयोजित करण्यात...
Skip to content