Homeकल्चर +आर्थिक साक्षरतेवरच्या प्रश्नमंजुषा...

आर्थिक साक्षरतेवरच्या प्रश्नमंजुषा स्पर्धेत मुंबईत अभिषेक व मोहित विजेते!

भारतीय रिझर्व्ह बँकेने (आयबीआय) मुंबईत 30 ऑगस्ट 2023 रोजी आर्थिक साक्षरतेवरील चौथी क्षेत्रीय पातळीवरची अखिल भारतीय प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित केली होती. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगड, गोवा ही राज्ये आणि दादरा नगर हवेली (डीएनएच) आणि दमण आणि दीव (डीडी) या केंद्रशासित प्रदेशांच्या राज्य पातळी वरील स्पर्धेचे विजेते यात सहभागी झाले होते. या राज्यांमधील सुमारे 9,000 शाळांचे सुमारे 18,000 विद्यार्थी आपल्या राज्यातील प्रभाग, जिल्हा आणि राज्य स्तरीय स्पर्धेत सहभागी झाले होते. शासकीय वरिष्ठ माध्यमिक विद्यालय शिक्षा नगर, मध्य प्रदेशचे अभिषेक पाठक आणि मोहित राठौर हे विभागीय फेरीचे विजेते ठरले, आणि ते आरबीआयद्वारे यापुढे आयोजित केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरच्या स्पर्धेत सहभागी होतील. विजेते आणि सहभागी विद्यार्थ्यांना आरबीआयच्या मुख्‍य महाप्रबंधक सोनाली सेनगुप्ता आणि इतर मान्यवरांनी सन्मानित केले.

विभाग पातळीवरील स्पर्धेत सहभागी झालेले सहा संघ पुढील प्रमाणे: (i) जिल्हा परिषद प्रशाला खोकरमोहा, महाराष्ट्र, (ii) सरकारी माध्यमिक विद्यालय, मिर्झापूर iii) सरकारी उच्च माध्यमिक शाळा टोकरखडा मराठी माध्यम, केंद्रशासित प्रदेश डीएनएच आणि डीडी (iv) सरकारी वरिष्ठ माध्यमिक शाळा शिक्षा नगर, मध्य प्रदेश (v) हुतात्मा बाळ गोपाळ देसाई मेमोरियल सरकारी हायस्कूल, गोवा आणि (vi) केंद्रीय विद्यालय, बैकुंठपूर, छत्तीसगड.

आर्थिक समावेशकता वाढवणे, हे देशाच्या विकास प्रक्रियेतील महत्त्वाच्या उद्दिष्टांपैकी एक आहे. आर्थिक साक्षरता ग्राहकांना माहितीपूर्ण निवड करण्यासाठी सक्षम बनवून आर्थिक समावेशाच्या उद्दिष्टाला पाठबळ देते, ज्याचे पर्यवसान ग्राहकांच्या आर्थिक कल्याणमध्ये होते.

त्या अनुषंगाने, राष्ट्रीय आर्थिक साक्षरता केंद्राने (NCFE) आर्थिक क्षेत्रातील नियामकांबरोबर सल्लामसलत करून, आर्थिक साक्षरता राष्ट्रीय धोरण (NSFE) 2020-25 तयार केले होते. भारत सरकार आणि वित्तीय क्षेत्र नियामकांच्या दृष्टीकोनाला समर्थन देणे हे त्याचे उद्दिष्ट असून, समाजाच्या विविध स्तरांमधील लोकांना आपल्या पैशाचे अधिक चांगले व्यवस्थापन करण्यासाठी आणि भविष्यासाठी योजना आखण्यासाठी आवश्यक असलेले आवश्यक ज्ञान, कौशल्ये, प्रवृत्ती आणि वर्तन विकसित करण्यासाठी सक्षम बनवते. 

या रणनीतीची विविध उद्दिष्टे आहेत, यामध्ये आर्थिक शिक्षणाद्वारे आर्थिक साक्षरतेच्या संकल्पना विकसित करून जीवन कौशल्य निर्माण करणे आणि बचतीच्या सक्रीय वर्तनाला प्रोत्साहन देणे, कर्ज घेण्याबाबतची शिस्त विकसित करणे, आणि आवश्यक असलेले कर्ज औपचारिक संस्थांकडून प्राप्त करणे, डिजिटल आर्थिक सेवांचा वापर सुधारणे, जोखीम व्यवस्थापन, ग्राहक हक्कांबाबत जागरुकता वाढवणे, ई. याचा समावेश आहे.

त्या अनुषंगाने, आरबीआय, लक्षित लोकसंख्येमध्ये आर्थिक साक्षरता निर्माण करण्यासाठी वेळोवेळी अनेक उपाययोजना करत आहे. या संदर्भात असाच एक प्रयत्न म्हणजे, 2023मध्ये सरकारी शाळांमधील आठवी, नववी आणि दहावीच्या मुलांवर लक्ष केंद्रित करून, आर्थिक साक्षरतेवर अखिल भारतीय प्रश्नमंजुषा आयोजित करणे. प्रभाग पातळीवर सुरू झालेल्या आणि जिल्हा आणि राज्य स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या या प्रश्नमंजुषा स्पर्धेचे उद्दिष्ट, नव्याने विकसित होत असलेल्या डिजिटल नवोन्मेषासह, झपाट्याने बदलणाऱ्या जटिल जगात विद्यार्थी समुदायामध्ये आर्थिक साक्षरतेबाबत आवड निर्माण करणे, हे आहे.

Continue reading

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...
Skip to content