Homeकल्चर +आवडेल, भावेल असा...

आवडेल, भावेल असा साहित्यिक कार्यक्रम १३ डिसेंबरला मुंबईत

साहित्याची आवड असणाऱ्या सर्व लेखक, वाचक यांना आवडेल, भावेल असा साहित्यिक कार्यक्रम, येत्या १३ डिसेंबरला कोकण मराठी साहित्य परिषद, दादर शाखा आणि कोमसाप, मुंबई जिल्हा, कोमसाप युवा शक्ती यांनी रोटरी क्लब ऑफ मुंबई शिवाजी पार्क, दादर यांच्या सहकार्याने आयोजित केला आहे. हा कार्यक्रम सानेगुरुजी विद्यालय, भिकोबा वामन पाठारे मार्ग, दादर येथे सायंकाळी ४.३० वाजता होईल, अशी माहिती कोमसाप दादर शाखेच्या अध्यक्षा अंजना कर्णिक यांनी दिली आहे.

‘शून्य बघितलेला माणूस’चे लेखक आणि सुप्रसिद्ध सेलिब्रिटी शेफ डॉ. तुषार प्रीति देशमुख यांचे मनोगत, लेखन आणि जीवन प्रवास, हे या कार्यक्रमाचे मोठे आकर्षण आहे. यंदा पद्मश्री कविवर्य नारायण सुर्वे जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या काव्याचे सादरीकरण, रसग्रहण आणि शंकर पाटील भाऊ पाध्ये यांच्या कथांचं सादरीकरण युवा शक्तीची तरुण मुले प्रा. दीपा ठाणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करतील. कार्यक्रमाचे अध्यक्ष, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय अध्यक्ष नमिता कीर भूषवतील. केंद्रीय कार्याध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ, केंद्रीय कार्यवाह दीपा ठाणेकर, युवाशक्ती प्रमुख स्नेहा वाघ, मुंबई जिल्हाध्यक्ष विद्या प्रभू, शिवाजी पार्क रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. रमेश शेटे आणि इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित असतील, असे कर्णिक यांनी सांगितले.

Continue reading

भायखळ्याच्या भोसले उद्यानात आजपासून ‘मुंबई पुष्पोत्सव’!

मुंबई महापालिका आणि वृक्ष प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने भायखळ्याच्या येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात आजपासून रविवार, ८ फेब्रुवारीपर्यंत उद्यानविद्या प्रदर्शन अर्थात ‘मुंबई पुष्पोत्सव’ आयोजित करण्यात येणार आहे. उद्घाटनानंतर आज रात्री ८ वाजेपर्यंत पुष्पोत्सव सर्वांसाठी खुला राहील....

संगीत-नाट्य क्षेत्रातल्या रसिकांनी अनुभवले भावूक क्षण!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात झालेल्या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्याने उत्साहाचे आणि कलेच्या गौरवाचे वातावरण निर्माण झाले. संगीत, नाटक, साहित्य आणि अभिनय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कलाकारांना यंदा मानांकित करण्यात आले, ज्यामुळे उपस्थित रसिकांनी दाद देत टाळ्यांचा कडकडाट...

सयाजी नगरी एक्सप्रेस ठरली मुंबईतली पहिली ‘कवच’धारी गाडी!

पश्चिम रेल्वेने विरार-बडोदा विभागात अपघातापासून बचाव करणारी ‘कवच 4.0’ प्रणाली कार्यान्वित केली आहे. गाडी क्रमांक 20907 दादर–भूज सयाजी नगरी एक्सप्रेस, ही मुंबईतून सुटणारी कवच प्रणालीने सुसज्ज असलेली पहिली गाडी ठरली आहे. या गाडीवर हे सुरक्षा कवच बसवण्यात आले आहे....
Skip to content