Homeन्यूज ॲट अ ग्लांसअणुऊर्जा नियामक परिषदेच्या...

अणुऊर्जा नियामक परिषदेच्या अध्यक्षपदी ए. के. बालासुब्रमणयन कार्यरत

प्रसिद्ध शास्त्रज्ञ ए. के. बालासुब्रमणयन यांनी नववर्षाच्या दिवशी म्हणजेच 1 जानेवारीला मुंबईतील अणुऊर्जा नियामक परिषद (एईआरबी) अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. त्यांनी डॉ. डी. के. शुक्ला यांच्याकडून पदभार स्वीकारला. एईआरबीमध्ये दाखल होण्यापूर्वी बालासुब्रमणयन यांनी प्रकल्प डिझाईन सुरक्षा समितीचे अध्यक्षपद भूषवले आहे. ही समिती प्रेशराईज्ड हेवी वॉटर रिअॅक्टर – पीएचडब्ल्यूआर आधारित अणुऊर्जा प्रकल्पांसाठी कार्यरत आहे.

ए. के. बालासुब्रमण्यन एक प्रतिष्ठित शास्त्रज्ञ असून, ते अणु अभियांत्रिकीचे प्रशिक्षण घेतलेले यांत्रिकी शाखेचे अभियंता आहेत. इंडियन नॅशनल अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगचे ते फेलो आहेत. अणुऊर्जा प्रकल्पांची रचना, विकास, सुरक्षा मूल्यांकन, बांधकाम व कार्यान्वयन या सर्व क्षेत्रांत त्यांना जवळपास 40 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी पीएचडब्ल्यूआर अणुभट्ट्यासांठी

व्यवस्थापन धोरण तयार केले आहे. त्यातली उपकरणे जसजशी जुनी होतात, त्यांची सुरक्षितता आणि कार्यक्षमता टिकवण्यासाठी आखलेली तपासणी, देखभाल आणि सुधारणा यांच्या व्यवस्थापनात, योजना विकासात त्यांना व्यापक अनुभव आहे.

पहिल्यांदाच तयार केलेल्या प्रणालींच्या नवोन्मेषी रचनांमध्ये, सुरक्षा वैशिष्ट्यांमध्ये आणि स्वदेशीकरणाच्या प्रयत्नांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. अणुभट्टी तंत्रज्ञानातले ते तज्ज्ञ मानले जातात. पीएचडब्ल्यूआरव्यतिरिक्त इतर अणुभट्ट्यांच्या (रिअॅक्टर) तंत्रज्ञानातलेही त्यांना चांगले ज्ञान आहे. पूर्वी ते न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (एनपीसीआयएल-भारतीय अणुऊर्जा महामंडळ)च्या संचालक (तांत्रिक) पदावर कार्यरत होते. अणुभट्टी तंत्रज्ञान व सुरक्षा यावर अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी भाग घेतला आहे.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content