Homeचिट चॅटमुंबईत काल घडले...

मुंबईत काल घडले दहाव्या शतकातील आदि वराह मूर्तीचे दर्शन!

मुंबई, इजिप्त, अश्शूर, ग्रीस, रोम आणि भारत या प्राचीन शिल्पांचे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन काल, १ डिसेंबरला मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालयात (सीएसएमव्हीएस) आयोजित करण्यात आले होते, ज्यात जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रतिष्ठित पुरातत्त्वीय शिल्पांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. जिल्हा पुरातत्त्व संग्रहालय, विदिशा येथील आदि वराह मूर्ती हे प्रदर्शनात प्रदर्शित होणारे मध्य प्रदेशातील एकमेव शिल्प होते.

हे स्मारक लाल वालुकाश्मामध्ये असंख्य देवी-देवता आणि ऋषीमुनींच्या कोरीव कामांसह कोरलेले आहे.

भागवत-पुराण आणि महाभारत यांसारख्या प्राचीन पौराणिक कथांनुसार भगवान विष्णूने वराह म्हणून अवतार घेतला आणि बुडालेल्या पृथ्वी देवीची सुटका केली. मूर्तीशास्त्राच्या अभ्यासात या शिल्पाला खूप उच्च कलात्मक मूल्य आहे आणि ते आदि वराहचे एक उत्तम उदाहरण आहे.

मध्य प्रदेशच्या पर्यटन आणि संस्कृती विभागाचे प्रधान सचिव शिव शेखर शुक्ला म्हणाले की, मध्य प्रदेशात असंख्य पुरातत्त्वीय आश्चर्ये आहेत आणि येथे सांची, भीमबेटका आणि खजुराहो ग्रुप ऑफ   मॉन्युमेंट्स सारख्या युनेस्कोच्या तीन जागतिक वारसा स्थळांचे घर आहे. राज्यात शतकानुशतके    मोठ्या राजघराण्यांचे अवशेष सापडले आहेत आणि शिल्पकलेचे सर्वात प्राचीन प्रतिनिधित्व इ.स.पू. दुसऱ्या शतकातील आहे.

या प्रदर्शनाला मध्य प्रदेशच्या पुरातत्त्व, अभिलेखागार आणि संग्रहालय संचालनालयाच्या आयुक्त उर्मिला शुक्ला उपस्थित होत्या. या प्रदर्शनात मध्य प्रदेश आणि भारताचा खजिना ‘आदि वराह मूर्ती’ प्रदर्शित होत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.     

मध्य प्रदेशचे पुरातत्व संचालनालय पुरातत्व क्षेत्रात केलेल्या कौतुकास्पद कामामुळे नेहमीच चर्चेत   राहिले आहे. या संचालनालयाचे मुख्य कार्य गावोगावी सर्वेक्षण, उत्खनन, संकलन, प्रदर्शन, राज्यभर  पसरलेल्या सांस्कृतिक वारशाचे प्रतिबंध, संकलन, प्रकाशन आणि संरक्षण करणे हे आहे.

Continue reading

11वी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेच्या नियमित कॅप फेरी-1चे वेळापत्रक घोषित

महाराष्ट्रातल्या इयत्ता 11वीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेअंतर्गत शैक्षणिक वर्ष 2026-27साठी नियमित कॅप फेरी-1चे वेळापत्रक जाहीर झाले आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने हे जाहीर केले आहे. आज, 8 मे रोजी इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेशअर्जाचा भाग-1 आणि...

मतदारांना भुरळ घालण्यासाठी बाळगली 1,400 कोटींची अवैध सामग्री

भारतात 2024 साली लोकसभेसाठी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांपासून, नुकत्याच झालेल्या आसाम, केरळम्, पुदुच्चेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यांच्या विधानसभा निवडणुका तसेच 5 राज्यांमधल्या 7 विधानसभेच्या पोटनिवडणुकांदरम्यान मतदारांना भुरळ घालण्यासाठी तब्बल 1,400 कोटी रुपयांहून अधिक किमतीची बेकायदेशीर सामग्री बाळगली होती....

टिव्ही पत्रकारितेचा चेहरामोहरा बदलणारे दिग्गज टेड टर्नर यांचे निधन

जगातील पहिली २४ तास बातम्या देणारी वृत्तवाहिनी 'सीएनएन' सुरू करून टेलिव्हिजन (टिव्ही) पत्रकारितेचा चेहरामोहरा बदलणारे दिग्गज माध्यम सम्राट टेड टर्नर यांचे वयाच्या ८७व्या वर्षी नुकतेच निधन झाले. १९८०मध्ये त्यांनी 'केबल न्यूज नेटवर्क'ची स्थापना केली, ज्याने ठराविक वेळेत बातम्या देण्याच्या...
Skip to content