HomeArchiveविश्वचषक मिळवण्यासाठी भारतीय...

विश्वचषक मिळवण्यासाठी भारतीय दिव्यांग क्रिकेट संघ रवाना

Details
विश्वचषक मिळवण्यासाठी भारतीय दिव्यांग क्रिकेट संघ रवाना

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
क्रिकेट विश्वचषक स्पर्धेनंतर 3 ऑगस्टपासून इंग्लंडमध्येच आंतरराष्ट्रीय दिव्यांग क्रिकेट संघाचे टी – 20 चे सामने होत असून भारताचा संघ यासाठी जोरदार तयारी करत आहे. ही विश्वचषक स्पर्धा सहा देशांमध्ये होत असून 14 ऑगस्टला अंतिम सामना होईल. यासाठी भारतीय संघ 26 जुलैला इंग्लंडकडे रवाना झाला आहे. भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भारतीय संघाला वाडेकर वॉरियर्स असे नाव देण्यात आले आहे. ऑल इंडिया क्रिकेट असोसिएशन फॉर फिजिकली चैलेंज्ड (AICAPC) संस्थेने यासाठी 16 खेळाडूंची संघात निवड केली आहे.

संघाचा कर्णधार विक्रांत केणी यांनी सांगितले की, आमचा संघ निश्चितपणे हा वर्ल्डकप मिळवून आपला लौकिक संपूर्ण जगभर करेल. आमची त्यानुसारच संपूर्ण तयारी झालेली आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी असून ते प्रत्येकाचा कसून सराव करून घेत आहेत. सुलक्षण मुंबई क्रिकेट टीमचे विकेटकिपरदेखील होते.

असोसिएशनचे उपाध्यक्ष विनोद देशपांडे हे संघाचे संचालक असतील. त्याचबरोबर वैद्यकीय मदतीसाठी निरंजन पंडित संघाच्या खेळाडूंची काळजी घेतील. यापूर्वी त्यांनी आईपीएल सीरीजमध्ये राजस्थान रॉयल्ससाठी काम पाहिले होते. या संघातील खेळाडूंनी आतापर्यंत उत्तम कामगिरी केली असल्यामुळे त्यांच्याकडे समस्त भारतीयांचे लक्ष लागले आहे. मीनल पोतनीस मनाच्या एकाग्रतेसाठी फेस योगा, डॉ. फाटक आणि डॉ. सूरज हे ऑस्टिओपथीसाठी आणि अँटीडोपिंग सूचना या पातळ्यांवरदेखील खेळाडूंना प्रशिक्षण दिले जात आहे.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
क्रिकेट विश्वचषक स्पर्धेनंतर 3 ऑगस्टपासून इंग्लंडमध्येच आंतरराष्ट्रीय दिव्यांग क्रिकेट संघाचे टी – 20 चे सामने होत असून भारताचा संघ यासाठी जोरदार तयारी करत आहे. ही विश्वचषक स्पर्धा सहा देशांमध्ये होत असून 14 ऑगस्टला अंतिम सामना होईल. यासाठी भारतीय संघ 26 जुलैला इंग्लंडकडे रवाना झाला आहे. भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भारतीय संघाला वाडेकर वॉरियर्स असे नाव देण्यात आले आहे. ऑल इंडिया क्रिकेट असोसिएशन फॉर फिजिकली चैलेंज्ड (AICAPC) संस्थेने यासाठी 16 खेळाडूंची संघात निवड केली आहे.

संघाचा कर्णधार विक्रांत केणी यांनी सांगितले की, आमचा संघ निश्चितपणे हा वर्ल्डकप मिळवून आपला लौकिक संपूर्ण जगभर करेल. आमची त्यानुसारच संपूर्ण तयारी झालेली आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी असून ते प्रत्येकाचा कसून सराव करून घेत आहेत. सुलक्षण मुंबई क्रिकेट टीमचे विकेटकिपरदेखील होते.

असोसिएशनचे उपाध्यक्ष विनोद देशपांडे हे संघाचे संचालक असतील. त्याचबरोबर वैद्यकीय मदतीसाठी निरंजन पंडित संघाच्या खेळाडूंची काळजी घेतील. यापूर्वी त्यांनी आईपीएल सीरीजमध्ये राजस्थान रॉयल्ससाठी काम पाहिले होते. या संघातील खेळाडूंनी आतापर्यंत उत्तम कामगिरी केली असल्यामुळे त्यांच्याकडे समस्त भारतीयांचे लक्ष लागले आहे. मीनल पोतनीस मनाच्या एकाग्रतेसाठी फेस योगा, डॉ. फाटक आणि डॉ. सूरज हे ऑस्टिओपथीसाठी आणि अँटीडोपिंग सूचना या पातळ्यांवरदेखील खेळाडूंना प्रशिक्षण दिले जात आहे.”

Continue reading

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...
Skip to content