HomeArchiveस्वातंत्र्यवीरांच्या जयघोषात रंगले...

स्वातंत्र्यवीरांच्या जयघोषात रंगले राज्यस्तरीय कवीसंमेलन!

Details
स्वातंत्र्यवीरांच्या जयघोषात रंगले राज्यस्तरीय कवीसंमेलन!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या 136 व्या जयंतीच्या पूर्वसंध्येवर आयोजित करण्यात आलेले राज्यस्तरीय कवी संमेलन रंगले ते स्वातंत्र्यवीरांच्या जयघोषांनी. काव्यप्रेमी शिक्षक मंचाचा यासाठी विशेष सहभाग होता. स्वातंत्र्यवीरांचे शौर्य, पराक्रम, साहित्यसंपदा, समाजसुधारणा अशा वैविध्यपूर्ण व्यक्तिमत्वांना उपस्थितांनी कवितेच्या माध्यमातून अत्यंत प्रभावीपणे सादर केले आणि उपस्थितांना एक वेगळाच अनुभव मिळाला. कोल्हापूरचे नवनिर्वाचित खासदार संजय मंडलिक यांचीदेखील विशेष उपस्थिती होती.

 

स्मारकाच्या मादाम कामा सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, कार्यवाह राजेंद्र वराडकर, कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, या कार्यक्रमाचे संयोजक गुरूदत्त वाकदेकर, खुमासदार निवेदन करणारे सूत्रसंचालक पत्रकार पंकज दळवी, काव्यप्रेमी शिक्षक मंचाचे जया नेरे, प्रमोद बाविस्कर, राजेश साबळे, मुकेश विशे, मंजु सराटे, वंदना म्हात्रे, कल्पना देशमुख, कल्पना म्हापुसकर, किशोरी पाटील, शारदा कंधारे, विजय फडणीस, सचिन बागुल, धनाजी गुठे, आरोशी दाते यांची यावेळी उपस्थिती होती. स्वातंत्र्यवीरांची वेगवेगळी रूपं विविध माध्यमातून व्यक्त होणे आणि ती अनुभवणे हे विशेष आहे. त्याचबरोबर याठिकाणी आल्यानंतर एक वेगळीच राष्ट्रभक्तीची प्रेरणा मिळते, असे विचार खासदार संजय मंडलिक यांनी व्यक्त केले.

 

यावेळी झालेल्या काव्यस्पर्धेतील विजेत्यांची नावे अशी- प्रथम- सलोनी बोरकर, द्वितीय- इशांत संगमनेरकर, तृतीय- चिंतामणी पावसे, उत्तेजनार्थ- काशीनाथ महाजन व सरला साळुंखे. या कार्यक्रमाचा प्रतिसाद विचारात घेता यापुढे विविध राज्यांमध्ये तसेच बहुभाषिक स्वरूपाचे कवीसंमेलन घेण्याचा मनोदय स्मारकाच्या वतीने व्यक्त करण्यात आला.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या 136 व्या जयंतीच्या पूर्वसंध्येवर आयोजित करण्यात आलेले राज्यस्तरीय कवी संमेलन रंगले ते स्वातंत्र्यवीरांच्या जयघोषांनी. काव्यप्रेमी शिक्षक मंचाचा यासाठी विशेष सहभाग होता. स्वातंत्र्यवीरांचे शौर्य, पराक्रम, साहित्यसंपदा, समाजसुधारणा अशा वैविध्यपूर्ण व्यक्तिमत्वांना उपस्थितांनी कवितेच्या माध्यमातून अत्यंत प्रभावीपणे सादर केले आणि उपस्थितांना एक वेगळाच अनुभव मिळाला. कोल्हापूरचे नवनिर्वाचित खासदार संजय मंडलिक यांचीदेखील विशेष उपस्थिती होती.

 

स्मारकाच्या मादाम कामा सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, कार्यवाह राजेंद्र वराडकर, कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, या कार्यक्रमाचे संयोजक गुरूदत्त वाकदेकर, खुमासदार निवेदन करणारे सूत्रसंचालक पत्रकार पंकज दळवी, काव्यप्रेमी शिक्षक मंचाचे जया नेरे, प्रमोद बाविस्कर, राजेश साबळे, मुकेश विशे, मंजु सराटे, वंदना म्हात्रे, कल्पना देशमुख, कल्पना म्हापुसकर, किशोरी पाटील, शारदा कंधारे, विजय फडणीस, सचिन बागुल, धनाजी गुठे, आरोशी दाते यांची यावेळी उपस्थिती होती. स्वातंत्र्यवीरांची वेगवेगळी रूपं विविध माध्यमातून व्यक्त होणे आणि ती अनुभवणे हे विशेष आहे. त्याचबरोबर याठिकाणी आल्यानंतर एक वेगळीच राष्ट्रभक्तीची प्रेरणा मिळते, असे विचार खासदार संजय मंडलिक यांनी व्यक्त केले.

 

यावेळी झालेल्या काव्यस्पर्धेतील विजेत्यांची नावे अशी- प्रथम- सलोनी बोरकर, द्वितीय- इशांत संगमनेरकर, तृतीय- चिंतामणी पावसे, उत्तेजनार्थ- काशीनाथ महाजन व सरला साळुंखे. या कार्यक्रमाचा प्रतिसाद विचारात घेता यापुढे विविध राज्यांमध्ये तसेच बहुभाषिक स्वरूपाचे कवीसंमेलन घेण्याचा मनोदय स्मारकाच्या वतीने व्यक्त करण्यात आला.”
 
 

Continue reading

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...

केशव उपाध्ये भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तर डावखरे, राणे सरचिटणीस!

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून अतुल काळसेकर, भारती पवार, संजय कोडगे, संजय भेंडे, रामदास तडस, केशव उपाध्ये, प्रवीण पोटे, गोपीचंद पडळकर, चैतन्यबापू देशमुख, प्रिया शिंदे, सुजय विखे पाटील आणि अर्चना पाटील चाकुरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचवेळी प्रदेश सरचिटणीस म्हणून आमदार निरंजन डावखरे, योगेश सागर, संजय कुटे, माधवी नाईक, राजेश...
Skip to content