HomeArchiveप्रा. प्रल्हाद अनंत...

प्रा. प्रल्हाद अनंत धोंड यांच्या चित्र प्रदर्शनाची शानदार सांगता

Details
प्रा. प्रल्हाद अनंत धोंड यांच्या चित्र प्रदर्शनाची शानदार सांगता

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
भारतीय ज्येष्ठ निसर्ग चित्रकार प्रा. प्रल्हाद अनंत धोंड यांच्या १११ व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या त्यांच्या १११ जलरंग चित्रांचे प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी, मुंबई येथे मोठ्या दिमाखात ११ जून २०१९ ते 17 जूनपर्यन्त आयोजित करण्यात आले होते. या सात दिवसीय चित्र प्रदर्शनास लोकांचा खूप चांगला प्रतिसाद लाभला. या प्रदर्शनास अंदाजे वीस हजारांपेक्षा जास्त जलरंग चित्रप्रेमींनी भेट दिली. या प्रदर्शनात धोंड यांनी १९३१ मध्ये काढलेले पहिले चित्र व २००० मध्ये काढलेले शेवटचे चित्रही मांडण्यात आले होते. यामध्ये मुंबईतील फोर्ट, चर्चगेट आदी दृश्ये, मावळता सूर्य, समुद्रकिनारी मार्ग शोधत चालणारा अवलिया, कोकणाचा नयनरम्य निसर्ग, फेसाळणाऱ्या लाटा, मासेमारी करणारे कोळी, आदी चित्रांचा समावेश होता.

 

या जलरंग चित्र प्रदर्शनास प्रख्यात व्यंग-चित्रकार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, मुंबई भाजपा अध्यक्ष आ. अॅणड. आशिष शेलार, नाटक-चित्रपट-मालिका कलाकार अरूण नलावडे आदी मान्यवरांनी हजेरी लावली होती तसेच जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे माजी अधिष्ठाता, जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे विद्यार्थी, इतर आर्ट्स कॉलेजेसचे विद्यार्थ्यांनी भेट दिली. मुंबईच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील कलाप्रेमींनी या प्रदर्शनाला भेट दिली. त्यात मालवण, कोकण, पुणे, नाशिक, कोल्हापूर, नागपूर इत्यादी ठिकाणाहूनही दाखल झालेल्या प्रेमींचा समावेश होता.

 

हया प्रदर्शनातील जलरंग चित्रे पाहावयास आलेल्या लोकांनी आपल्या प्रतिक्रियेत असे म्हटले की, धोंड सरांनी निसर्गाच्या सानिध्यात राहून समुद्राच्या वेगवेगळ्या छटा, रंग, रूप प्रत्यक्षात सर्वच चित्रांतून प्रदर्शित केल्या आहेत. प्रा. प्रल्हाद अनंत धोंड यांनी वयाच्या नव्वदव्या वर्षीही आपल्या प्रकृतीवर मात करत आपली कला जोपासली हे आजच्या पिढीला प्रेरणा देणारे ठरते. प्रत्येक चित्र हे जीवनातील वास्तव सांगून जाते आणि प्रत्येक परिस्थितीत आपण आपल्या जीवनात कसा मार्ग काढायचा हे शिकवून जाते. कला ही चर्चा करण्याचा विषय नसून जाणिवेचा व भावनात्मक अनुभवाचा विषय आहे. प्रा. प्रल्हाद अनंत धोंड यांच्या १११ व्या जयंतीनिमित्त, त्यांच्या जलरंग चित्रांच्या प्रदर्शनाचे आयोजन करून आजच्या पिढीला त्यांच्या चित्रांचा अनुभव घेण्याची जी संधी देण्यात आली त्यासाठी लोकांनी धोंड सरांचे नातू केदार कामत यांचे मनःपूर्वक आभार मानले.

 

११ नोव्हेंबर १९०८ रोजी प्रा. प्रल्हाद अनंत धोंड यांचा जन्म रत्नागिरी येथे झाला. त्यांनी १९३४ साली कला पदविका प्राप्त केली व १९३७ साली झालेल्या आर्ट मास्टर परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर त्यांनी मुंबईतील सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टसचे डीन व महाराष्ट्र राज्य सरकारचे कला संचालक म्हणून काम पाहिले. १९५८ ते १९६८ या काळात सर जे. जे. कला महाविद्यालयाचे अधिष्ठाता आणि १९६८ ते १९६९ या काळात महाराष्ट्र राज्याच्या कला संचालनालयाचे कला संचालक ही दोन प्रमुख पदे त्यांनी भूषविली. त्यांच्या ”रापण” या आत्मचरित्रात्मक पुस्तकाला राज्य पुरस्कार तर मिळालाच शिवाय वृत्तपत्रे आणि रसिक वाचकांनी स्तुतीदेखील केली. जलरंग लेपनाच्या ठसठशीत शैलीमुळे आणि निसर्ग चित्रणांच्या वैशिष्ट्यपूर्ण हाताळणीमुळे त्यांचे नाव अग्रगण्य चित्रकारांत घेतले जाते. त्यांच्या या अनोख्या शैलीतील चित्रे भारतातील अनेक कला दालनांतून, संग्रहालयांतून, विद्यापीठांतून संग्रहीत करण्यात आलेली आहेत. पश्चिम जर्मनी, अमेरिका, दक्षिण आफ्रिका, पूर्व आफ्रिका, रशिया आदि देशांतील नामवंत संस्था, विविध क्षेत्रांतील मान्यवर उच्चपदस्थ आणि कलारसिकांच्या संग्रहांत त्यांची चित्रे आहेत. युब्यूबवरही रसिक या चित्रांचा आनंद घेतला. https://www.youtube.com/watch?v=i-2aOKfMuwI&feature=youtu.be”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
भारतीय ज्येष्ठ निसर्ग चित्रकार प्रा. प्रल्हाद अनंत धोंड यांच्या १११ व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या त्यांच्या १११ जलरंग चित्रांचे प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी, मुंबई येथे मोठ्या दिमाखात ११ जून २०१९ ते 17 जूनपर्यन्त आयोजित करण्यात आले होते. या सात दिवसीय चित्र प्रदर्शनास लोकांचा खूप चांगला प्रतिसाद लाभला. या प्रदर्शनास अंदाजे वीस हजारांपेक्षा जास्त जलरंग चित्रप्रेमींनी भेट दिली. या प्रदर्शनात धोंड यांनी १९३१ मध्ये काढलेले पहिले चित्र व २००० मध्ये काढलेले शेवटचे चित्रही मांडण्यात आले होते. यामध्ये मुंबईतील फोर्ट, चर्चगेट आदी दृश्ये, मावळता सूर्य, समुद्रकिनारी मार्ग शोधत चालणारा अवलिया, कोकणाचा नयनरम्य निसर्ग, फेसाळणाऱ्या लाटा, मासेमारी करणारे कोळी, आदी चित्रांचा समावेश होता.

 

या जलरंग चित्र प्रदर्शनास प्रख्यात व्यंग-चित्रकार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, मुंबई भाजपा अध्यक्ष आ. अॅणड. आशिष शेलार, नाटक-चित्रपट-मालिका कलाकार अरूण नलावडे आदी मान्यवरांनी हजेरी लावली होती तसेच जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे माजी अधिष्ठाता, जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे विद्यार्थी, इतर आर्ट्स कॉलेजेसचे विद्यार्थ्यांनी भेट दिली. मुंबईच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील कलाप्रेमींनी या प्रदर्शनाला भेट दिली. त्यात मालवण, कोकण, पुणे, नाशिक, कोल्हापूर, नागपूर इत्यादी ठिकाणाहूनही दाखल झालेल्या प्रेमींचा समावेश होता.

 

हया प्रदर्शनातील जलरंग चित्रे पाहावयास आलेल्या लोकांनी आपल्या प्रतिक्रियेत असे म्हटले की, धोंड सरांनी निसर्गाच्या सानिध्यात राहून समुद्राच्या वेगवेगळ्या छटा, रंग, रूप प्रत्यक्षात सर्वच चित्रांतून प्रदर्शित केल्या आहेत. प्रा. प्रल्हाद अनंत धोंड यांनी वयाच्या नव्वदव्या वर्षीही आपल्या प्रकृतीवर मात करत आपली कला जोपासली हे आजच्या पिढीला प्रेरणा देणारे ठरते. प्रत्येक चित्र हे जीवनातील वास्तव सांगून जाते आणि प्रत्येक परिस्थितीत आपण आपल्या जीवनात कसा मार्ग काढायचा हे शिकवून जाते. कला ही चर्चा करण्याचा विषय नसून जाणिवेचा व भावनात्मक अनुभवाचा विषय आहे. प्रा. प्रल्हाद अनंत धोंड यांच्या १११ व्या जयंतीनिमित्त, त्यांच्या जलरंग चित्रांच्या प्रदर्शनाचे आयोजन करून आजच्या पिढीला त्यांच्या चित्रांचा अनुभव घेण्याची जी संधी देण्यात आली त्यासाठी लोकांनी धोंड सरांचे नातू केदार कामत यांचे मनःपूर्वक आभार मानले.

 

११ नोव्हेंबर १९०८ रोजी प्रा. प्रल्हाद अनंत धोंड यांचा जन्म रत्नागिरी येथे झाला. त्यांनी १९३४ साली कला पदविका प्राप्त केली व १९३७ साली झालेल्या आर्ट मास्टर परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर त्यांनी मुंबईतील सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टसचे डीन व महाराष्ट्र राज्य सरकारचे कला संचालक म्हणून काम पाहिले. १९५८ ते १९६८ या काळात सर जे. जे. कला महाविद्यालयाचे अधिष्ठाता आणि १९६८ ते १९६९ या काळात महाराष्ट्र राज्याच्या कला संचालनालयाचे कला संचालक ही दोन प्रमुख पदे त्यांनी भूषविली. त्यांच्या ”रापण” या आत्मचरित्रात्मक पुस्तकाला राज्य पुरस्कार तर मिळालाच शिवाय वृत्तपत्रे आणि रसिक वाचकांनी स्तुतीदेखील केली. जलरंग लेपनाच्या ठसठशीत शैलीमुळे आणि निसर्ग चित्रणांच्या वैशिष्ट्यपूर्ण हाताळणीमुळे त्यांचे नाव अग्रगण्य चित्रकारांत घेतले जाते. त्यांच्या या अनोख्या शैलीतील चित्रे भारतातील अनेक कला दालनांतून, संग्रहालयांतून, विद्यापीठांतून संग्रहीत करण्यात आलेली आहेत. पश्चिम जर्मनी, अमेरिका, दक्षिण आफ्रिका, पूर्व आफ्रिका, रशिया आदि देशांतील नामवंत संस्था, विविध क्षेत्रांतील मान्यवर उच्चपदस्थ आणि कलारसिकांच्या संग्रहांत त्यांची चित्रे आहेत. युब्यूबवरही रसिक या चित्रांचा आनंद घेतला. https://www.youtube.com/watch?v=i-2aOKfMuwI&feature=youtu.be”
 
 
 

Continue reading

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...
Skip to content