Details
सागर सरहदी यांचा `बाजार’ २४ सप्टेंबरला!
20-Sep-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
प्रसिद्ध दिग्दर्शक सागर सरहदी यांच्या गाजलेल्या `बाजार’ या चित्रपटाचे सादरीकरण मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा रंगस्वर विभाग आणि प्रभात चित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने होणार आहे. हा कार्यक्रम मंगळवार दिनांक २४ सप्टेंबर २०१९ रोजी सायंकाळी साडेसहा वाजता रंगस्वर सभागृह, चौथा मजला, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नरीमन पॉईंट येथे होईल. रंगस्वर आणि प्रभात चित्र मंडळ यांच्या सदस्यांना यावेळी प्राधान्याने प्रवेश दिला जाईल.
एक अबोल, घुसमटलेली व्यथा. एका घराची, एका कुटुंबाची नव्हे, तर एका समाजाची, एका शहराचीच! ‘बाजार’ या व्यथेला वाचा देण्याचा प्रयत्न करतो. हैदराबाद संस्थान भारतीय प्रजासत्ताकात विलीन झालं. निजामी गेली, नवाबी गेली. निजामाने कुचकामी करून अजगरासारखं सुस्त बनवून ठेवलेल्या कामचुकार लोकांनी आपल्याकडे असलेली संपत्ती आळसात राहून, ऐशारामात बेजबाबदार खर्च करून संपवली आणि मग उरलेल्या पुंजीत दोन वेळच्या खाण्याचीही भ्रांत यांना पडली. हातापायाला अन् स्वभावाला कामाची सवय नाही आणि त्याचवेळी पोटालाही भुकेची सवय नाही, अशी कधी विचार न केलेली समस्या या लोकांसमोर ‘आ’ वासून उभी राहिली.
या दुर्दशेच्या गाड्याखाली भरडली गेली ती ‘स्त्री’. हे कोणे एकेकाळचे सुखवस्तू लोक नोकरी वगैरेची लाचारी करण्यापेक्षा घरच्या स्त्रीची विक्री करणे, योग्य समजू लागले. काहीवेळी तर स्वत: स्त्रियासुद्धा ‘हाच एक तरणोपाय आहे’, असं समजू लागल्या आणि स्त्री-शरीराचा एक मोठा बाजार ‘निकाह, शादी’ या प्रतिष्ठित, गोंडस नावांच्या आड सुरू झाला. कथानकाच्या केंद्रस्थानी स्मिता पाटीलची ‘नजमा’ आहे. नसीरूद्दीन शाह, सुलभा देशपांडे, सुप्रिया पाठक, फारूख शेख आदींचा अभिनय यातून पाहयला मिळतो. ‘बाजार’ची सगळ्यात मोठी ताकद आहे खय्याम यांचं संगीत.”
केएचएल न्यूज ब्युरो
“प्रसिद्ध दिग्दर्शक सागर सरहदी यांच्या गाजलेल्या `बाजार’ या चित्रपटाचे सादरीकरण मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा रंगस्वर विभाग आणि प्रभात चित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने होणार आहे. हा कार्यक्रम मंगळवार दिनांक २४ सप्टेंबर २०१९ रोजी सायंकाळी साडेसहा वाजता रंगस्वर सभागृह, चौथा मजला, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नरीमन पॉईंट येथे होईल. रंगस्वर आणि प्रभात चित्र मंडळ यांच्या सदस्यांना यावेळी प्राधान्याने प्रवेश दिला जाईल.”
“एक अबोल, घुसमटलेली व्यथा. एका घराची, एका कुटुंबाची नव्हे, तर एका समाजाची, एका शहराचीच! ‘बाजार’ या व्यथेला वाचा देण्याचा प्रयत्न करतो. हैदराबाद संस्थान भारतीय प्रजासत्ताकात विलीन झालं. निजामी गेली, नवाबी गेली. निजामाने कुचकामी करून अजगरासारखं सुस्त बनवून ठेवलेल्या कामचुकार लोकांनी आपल्याकडे असलेली संपत्ती आळसात राहून, ऐशारामात बेजबाबदार खर्च करून संपवली आणि मग उरलेल्या पुंजीत दोन वेळच्या खाण्याचीही भ्रांत यांना पडली. हातापायाला अन् स्वभावाला कामाची सवय नाही आणि त्याचवेळी पोटालाही भुकेची सवय नाही, अशी कधी विचार न केलेली समस्या या लोकांसमोर ‘आ’ वासून उभी राहिली.”
“या दुर्दशेच्या गाड्याखाली भरडली गेली ती ‘स्त्री’. हे कोणे एकेकाळचे सुखवस्तू लोक नोकरी वगैरेची लाचारी करण्यापेक्षा घरच्या स्त्रीची विक्री करणे, योग्य समजू लागले. काहीवेळी तर स्वत: स्त्रियासुद्धा ‘हाच एक तरणोपाय आहे’, असं समजू लागल्या आणि स्त्री-शरीराचा एक मोठा बाजार ‘निकाह, शादी’ या प्रतिष्ठित, गोंडस नावांच्या आड सुरू झाला. कथानकाच्या केंद्रस्थानी स्मिता पाटीलची ‘नजमा’ आहे. नसीरूद्दीन शाह, सुलभा देशपांडे, सुप्रिया पाठक, फारूख शेख आदींचा अभिनय यातून पाहयला मिळतो. ‘बाजार’ची सगळ्यात मोठी ताकद आहे खय्याम यांचं संगीत.”

