Homeटॉप स्टोरीविनोद तावडे, पंकजा...

विनोद तावडे, पंकजा मुंडे महाराष्ट्र भाजपातून ‘आऊट’!

भारतीय जनता पार्टीचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री विनोद तावडे तसेच पंकजा मुंडे पक्षाच्या राज्यातल्या राजकारणातून जवळजवळ बाद झाले आहेत. पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांनी त्यांची वर्णी राष्ट्रीय कार्यकारिणीत लावतानाच त्यांच्यावर अनुक्रमे हरयाणा व मध्य प्रदेशचे प्रभारी म्हणून जबाबदारी दिली आहे. तावडे हरयाणाचे प्रभारी आहेत तर पंकजा मुंडे यांच्यावर मध्य प्रदेशची जबाबदारी टाकण्यात आली आहे.

भारतीय जनता पार्टीची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी आज नवी दिल्लीत जाहीर करण्यात आली असून त्यातल्या राष्ट्रीय कार्यकारी समितीत महाराष्ट्रातून नितीन गडकरींसह पाच जणांचा समावेश करण्यात आला आहे. भाजपाच्या आक्रमक नेत्या चित्रा वाघ यांना यामध्ये स्थान मिळाले आहे.

केंद्रीय मंत्री पियुष गोयल, माजी मंत्री प्रकाश जावडेकर आणि विनय सहस्त्रबुद्धे हे इतर तीन सदस्य आहेत. विनोद तावडे, सुनील देवधर आणि पंकजा मुंडे यांना राष्ट्रीय सचिव म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार आणि लड्डाराम नागवाणी यांना विशेष निमंत्रित म्हणून जागा देण्यात आली आहे. हिना गावित तसेच संजू वर्मा यांना राष्ट्रीय प्रवक्तेपद देण्यात आले आहे.

जमाल सिद्दीकी यांची अल्पसंख्याक मोर्चात वर्णी लागली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी सी. टी. रवी, सहप्रभारी ओमप्रकाश धुर्वे, जयभान सिंह पावैया यांचाही कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे.

Continue reading

एलिमेंट्स आर्ट क्लासेसचे अप्रतिम प्रदर्शन

एलिमेंट्स आर्ट क्लासेस च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्याच्या कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण आर्ट गॅलरी येथे पंचतत्व या तीन दिवसांचे वार्षिक कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सहा ते १८ वर्षे वयोगटातल्या जवळजवळ ४५ विद्यार्थ्यांच्या सुमारे ९० कलाकृती या प्रदर्शनात...

अकरावी प्रवेशासाठी नंतर सादर करा गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला

राज्यातल्या इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेत सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या निर्देशानंतर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची अट शिथिल केली आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर...

सौरभ विजय यांनी दिला डिजिटल नवोपक्रमावर भर

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे (UIDAI) मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ विजय यांनी मुंबईतील युआयडीएआय प्रादेशिक कार्यालयाला नुकतीच भेट दिली. मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच प्रादेशिक दौरा आहे. युआयडीएआय प्रादेशिक कार्यालय,...
Skip to content