Homeटॉप स्टोरीविनोद तावडे, पंकजा...

विनोद तावडे, पंकजा मुंडे महाराष्ट्र भाजपातून ‘आऊट’!

भारतीय जनता पार्टीचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री विनोद तावडे तसेच पंकजा मुंडे पक्षाच्या राज्यातल्या राजकारणातून जवळजवळ बाद झाले आहेत. पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांनी त्यांची वर्णी राष्ट्रीय कार्यकारिणीत लावतानाच त्यांच्यावर अनुक्रमे हरयाणा व मध्य प्रदेशचे प्रभारी म्हणून जबाबदारी दिली आहे. तावडे हरयाणाचे प्रभारी आहेत तर पंकजा मुंडे यांच्यावर मध्य प्रदेशची जबाबदारी टाकण्यात आली आहे.

भारतीय जनता पार्टीची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी आज नवी दिल्लीत जाहीर करण्यात आली असून त्यातल्या राष्ट्रीय कार्यकारी समितीत महाराष्ट्रातून नितीन गडकरींसह पाच जणांचा समावेश करण्यात आला आहे. भाजपाच्या आक्रमक नेत्या चित्रा वाघ यांना यामध्ये स्थान मिळाले आहे.

केंद्रीय मंत्री पियुष गोयल, माजी मंत्री प्रकाश जावडेकर आणि विनय सहस्त्रबुद्धे हे इतर तीन सदस्य आहेत. विनोद तावडे, सुनील देवधर आणि पंकजा मुंडे यांना राष्ट्रीय सचिव म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार आणि लड्डाराम नागवाणी यांना विशेष निमंत्रित म्हणून जागा देण्यात आली आहे. हिना गावित तसेच संजू वर्मा यांना राष्ट्रीय प्रवक्तेपद देण्यात आले आहे.

जमाल सिद्दीकी यांची अल्पसंख्याक मोर्चात वर्णी लागली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी सी. टी. रवी, सहप्रभारी ओमप्रकाश धुर्वे, जयभान सिंह पावैया यांचाही कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे.

Continue reading

अवकाळी, गारपिटीमुळे उत्तर महाराष्ट्र ते विदर्भापर्यंतचे शेतकरी हवालदिल

गेल्या आठवड्यात राज्यभरात झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीने तब्बल २४ जिल्ह्यांना जोरदार तडाखा दिला. राज्यभरात सुमारे ५१,४८८.५४ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याची नोंद आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि चक्रीवादळी प्रणालींच्या एकत्रित प्रभावामुळे हवामानात हा अचानक बदल झाला. गुढीपाडव्याच्या...

रणवीरने पहिल्याच दिवशी पछाडले शाहरुख खानला!

19 मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या 'धुरंदर 2 : द रिव्हेंज'ने बॉलीवूडच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नाव कोरले. पहिल्याच दिवशी तब्बल ₹ 102.55 कोटी नेट कलेक्शन आणि जागतिक पातळीवर ₹ 200 कोटींचा आकडा पार करत हा चित्रपट बॉलीवूडचा सर्वकालीन सर्वात मोठा ओपनर...

क्रिकेटच्या या हंगामात दोन-तीन हजार रन्स करायचेत!

१३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी सध्या क्रिकेटच्या दुनियेतील सर्वात चर्चेतील चेहरा आहे. आयपीएल २०२६च्या आधी एका पत्रकाराने त्याला विचारलं की, "या हंगामात किती धावा करायच्या आहेत?" यावर वैभवने अगदी शांतपणे, निरागस उत्तर दिलं, "दोन-तीन हजार!" संपूर्ण पत्रकार परिषदेत हास्यकल्लोळ झाला....
Skip to content