Homeबॅक पेजधनत्रयोदशीच्या दिवशी 'अशुभ'...

धनत्रयोदशीच्या दिवशी ‘अशुभ’ दक्षिणेलाच का लावतात दिवा?

आपल्या भारतीय संस्कृतीत दिवाळीची सुरुवात दिवे प्रज्वलित करूनच केली जाते. फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर देश-परदेशात जिथे-जिथे दिवाळीचा उत्सव साजरा केला जातो, तिथे-तिथे दीप पेटवूनच त्याची सुरुवात केली जाते. एरव्ही दक्षिण दिशेला दिवा पेटवणे अशुभ मानले जाते, परंतु धनत्रयोदशीला तो मुद्दामच दक्षिणेला पेटवतात. यामागे काय कारण आहे, ते आपण जाणून घेऊ.

पारंपरिकपणे दिवाळीला मातीच्या आणि कणकेच्या पणत्या घरा-दारांत पेटवल्या जातात. अलीकडच्या बदलत्या काळात घराच्या दारात किंवा घरासमोर उंच जागी, एखाद्या झाडावर किंवा घराच्या छप्परावर आकाशकंदील लावला जातो. हा आकाशकंदील म्हणजेच आधुनिक युगातील आकर्षक दिवाच! धनत्रयोदशीच्या दिवशी लावलेला हा दिवा कार्तिक पौर्णिमेपर्यंत तेवत ठेवण्याची प्रथा आहे.

यमदेवाच्या आदरार्थ पेटवला जातो दिवा

धनत्रयोदशीच्या दिवशी पेटवलेला हा आकाशकंदील दक्षिण दिशेला लावण्याची प्रथा आहे. एरव्ही दक्षिण दिशेला दिवा पेटवणे अशुभ मानले जाते, परंतु धनत्रयोदशीला तो मुद्दामच दक्षिणेला पेटवतात. यमदेवाच्या आदरार्थ तो पेटवला जातो, असे मानले जाते. यासंबंधाने एक पुराणकथा सापडते.

“हे” कराल तर कधीही अकाली मृत्यू येणार नाही!

पुराणकाळी हैम नावाचा एक राजा होता. त्याच्या मुलाचा लग्नानंतर चौथ्याच दिवशी सर्पदंशाने मृत्यू झाला. स्वतः यमाच्या दूतालाही या मुलाचे प्राण घेऊन जाताना खूपच दुःख झाले. त्याने आपल्या मनातील सल यमराजासमोर बोलून दाखवली. तेव्हा यमाने सांगितले की, जो कोणी धनत्रयोदशीपासून पाच दिवसापर्यंत आपल्या घराच्या दारात दिवे पेटवेल, त्याला कधीच अकाली मृत्यू येणार नाही. तेव्हापासून लोकं धनत्रयोदशीला आपल्या दारात दिवा पेटवायला लागले.

स्वर्गवासी पूर्वज अदृश्यरूपाने येतात घरात वास्तव्याला

या पुराणकथेत तथ्य असो वा नसो, परंतु ती पिढ्या दर पिढ्या मुलांना ऐकवली जाते. दिवाळीला दारात आकाशकंदील लावला, तर त्या उजेडात आपले स्वर्गवासी पूर्वज अदृश्यरूपाने उत्सव काळात वास्तव्याला येतात, अशीसुद्धा कथा काही भागात मुलांना ऐकविली जाते.

धनत्रयोदशीला नवीन वस्तू घरात आणण्याची प्रथा

धनत्रयोदशीच्या दिवशी काहीतरी नवीन वस्तू खरेदी करून घरात आणण्याची प्रथा आहे. असे केल्याने धनलक्ष्मी प्रसन्न होते, अशी समजूत आहे. आदिमकाळी या दिवशी शेतीप्रधान संस्कृतीत हंगामातील कापणीचे नवे धान्य घरी आणले जायचे. त्या पुरातन परंपरेतून पुढे धनत्रयोदशीला नवी वस्तू घरात आणण्याच्या प्रथेचा उगम झाला असावा, असे मानले जाते.

Continue reading

सयाजी नगरी एक्सप्रेस ठरली मुंबईतली पहिली ‘कवच’धारी गाडी!

पश्चिम रेल्वेने विरार-बडोदा विभागात अपघातापासून बचाव करणारी ‘कवच 4.0’ प्रणाली कार्यान्वित केली आहे. गाडी क्रमांक 20907 दादर–भूज सयाजी नगरी एक्सप्रेस, ही मुंबईतून सुटणारी कवच प्रणालीने सुसज्ज असलेली पहिली गाडी ठरली आहे. या गाडीवर हे सुरक्षा कवच बसवण्यात आले आहे....

17 मार्चला मुंबईत टपाल पेन्शन अदालत

मुंबईच्या मुख्य पोस्टमास्टर जनरल, महाराष्ट्र परिमंडळ यांनी टपाल विभागातल्या निवृत्तीवेतनधारक आणि कुटूंब वेतनधारकांसाठी येत्या 17 मार्चला सकाळी साडेअकरा वाजता टपाल पेन्शन अदालतीचे आयोजन केले आहे. मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र परिमंडळ यांच्या कार्यालयात ही पेन्शन अदालत घेतली जाईल. महाराष्ट्र आणि...

तत्काळ पासपोर्टसाठी पुण्यात 7 तारखेला विशेष मोहीम

पुण्यातल्या प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाने तत्काळ श्रेणीतल्या अर्जदारांसाठी पुण्याच्या पासपोर्ट सेवा केंद्रात येत्या शनिवारी, 7 फेब्रुवारीला विशेष पासपोर्ट मोहिमेचे आयोजन केले आहे. पासपोर्टसाठी अपॉइंटमेंट लवकर मिळवून देण्यासाठी आणि तातडीच्या प्रवासाची गरज असलेल्या नागरिकांना पासपोर्ट सेवा पुरवण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाच्या पुढाकाराने हा...
Skip to content