Homeएनसर्कलपश्चिम घाट परिसरातल्या...

पश्चिम घाट परिसरातल्या बुरशीजन्य मातीत २ नव्या प्रजाती!

भारतीय शास्त्रज्ञांनी एस्परगिलस सेक्शन निग्रीमधील लपलेल्या विविधतेचा नुकताच उलगडा केला आहे. केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या पुण्यातल्या एमएसीएस-अघारकर, या स्वायत्त संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांनी  एस्परगिलस सेक्शन निग्री (सामान्यतः ब्लॅक एस्परगिलस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या) दोन नवीन प्रजातींविषयी संशोधन केले आहे. एस्परगिलस-ढाकेफलकरी आणि एस्परगिलस-पॅट्रिसियाविल्टशारीया म्हणून त्या ओळखल्या गेल्या आहेत. घनदाट वृक्षराजी असलेल्या पश्चिम घाट पट्ट्यातून गोळा करण्यात आलेल्या मातीच्या नमुन्यांमधून दोन काळ्या एस्परगिलिस ए. अ‍ॅक्युलेटीनस आणि ए. ब्रुनिओव्हायोलेसियसची पहिली भौगोलिक नोंद केली गेली आहे. या पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील जागेचा सतत शोध आणि संवर्धन करण्याची गंभीर गरज या निष्कर्षांवरून अधोरेखित झाली आहे.

पश्चिम घाटातील निग्री सेक्शनमधील एस्परगिलसमधील नवीन प्रजातींचे पूर्वीचे शोध परदेशातील संशोधकांनी लावले असले तरी, हा अभ्यास मूळतः डॉ. राजेश कुमार के. सी. यांनी राष्ट्रीय बुरशीजन्य संस्कृती संग्रह, पुणे येथील अघारकर संशोधन संस्‍थेत (एआरआय) केला. हे शोधकार्य येथे एएनआरएफ (पूर्वीचे एसईआरबी) प्रकल्पाचा भाग म्हणून सुरू केले होते आणि एमएसीएस-एआरआय मुख्य निधीच्या मदतीने पुढे चालू ठेवला होता. हे काम पश्चिम घाट भागात आढळणाऱ्या  मायक्रोलॉजिकल म्हणजेच बुरशीविषयीच्‍या अभ्‍यासामध्‍ये तसेच समजुतीमध्ये एक महत्त्वपूर्ण प्रगती दर्शवते. त्याचबरोबर बुरशीजन्य विविधतेचा मोठ्या प्रमाणात वापर न केलेला जलाशय म्हणून या प्रदेशाची स्थिती अद्वितीय आणि पर्यावरणीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण म्हणून अधोरेखित करते. भारतातील सर्वात प्रगत एकात्मिक किंवा ‘पॉलीफेसिक’  म्हणजेच बहुचरणीय वर्गीकरण पद्धतींचा वापर करून भारतीय पथकाने केलेला एस्परगिलसचा हा पहिलाच अभ्यास आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मिझोराम, मणिपूर आणि आसामच्या दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 13 सप्टेंबरपासून 15 सप्टेंबरदरम्यान मिझोराम, मणिपूर, आसाम, पश्चिम बंगाल आणि बिहारला भेट देणार आहेत. या भेटींदरम्यान पंतप्रधान 71,850 कोटींहून अधिक खर्चाच्या प्रकल्पांचे उद्घाटन किंवा पायाभरणी करणार आहेत. आज ते मिझोराम, मणिपूर तसेच आसामचा दौरा करणार...

दादर-माटुंगा केंद्रातर्फे ऑक्टोबरमध्ये तबलावादन स्पर्धा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने शनिवार, ११ ऑक्टोबर २०२५, यादिवशी सकाळी ९.३० वाजता तबलावादन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा अव्यावसायिक कलाकारांसाठी आहे. स्पर्धा १६ ते २५ वर्षे या मोठ्या वयोगटासाठी ९.३० वाजता तर १० ते १५ वर्षे,...

सी.पी. राधाकृष्णन भारताचे १५वे उपराष्ट्रपती!

महाराष्ट्राचे कालपर्यंतचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज दिल्लीत भारताचे १५वे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात झालेल्या शपथविधीच्या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना अधिकारपदाची तसेच गोपनीयतेची शपथ दिली. शपथविधीनंतर राधाकृष्णन यांनी महात्मा गांधींच्या समाधीला...
Skip to content