Homeहेल्थ इज वेल्थमुख्यमंत्री फडणवीसांच्या विशेषाधिकारामुळे...

मुख्यमंत्री फडणवीसांच्या विशेषाधिकारामुळे चिमुकलीवर झाली सर्जरी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षामार्फत नाशिकमधल्या नऊ वर्षांच्या चिमुकलीवर कॉक्लियर इम्प्लांट सर्जरी नुकतीच यशस्वीरित्या पूर्ण झाली. यासाठी मुख्यमंत्री कक्षातून दीड लाखांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. कक्षामार्फत ९ महिने ते २ वर्षं वय असलेल्या बालकांनाच या उपचारासाठी निधी दिला जातो. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या माध्यमातून रुग्णावर यशस्वीरित्या उपचार झाले आहेत.

रुग्णाचे वडील कंत्राटी पद्धतीने एका खाजगी कंपनीत कामाला आहेत. आई गृहिणी असून मोठी बहीण पदवीधर आहे. घरची परिस्थिती अत्यंत बेताची असून उपचारासाठी लागणारी रक्कम रुग्णाच्या कुटुंबीयांसाठी फार मोठी होती. कक्षाने केलेल्या मदतीमुळे आज माझ्या मुलीवर उपचार होऊ शकले. उद्या ती ऐकू शकेल, बोलू शकेल ही बाब आमच्यासाठी फार मोठी आहे. मुलीच्या जन्मापासून तिनेही सर्वसामान्य मुलांप्रमाणे आयुष्य जगावे असे वाटायचे. परंतु तिची स्थिती पाहून मनाला हळहळ वाटायची. आज तिच्यावर उपचार झाले असताना ती लवकरच सर्वसामान्यांसारखे जीवन जगू शकेल असा विश्वास वाटतो. या सहकार्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच कक्षाचे मनस्वी आभार, अशा शब्दात रुग्णाच्या नातेवाईकांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. राज्यातील प्रत्येक आर्थिकदृष्ट्या गरजू रुग्णाला मदत देण्यासाठी, त्यांच्या कठीण काळात त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहण्यासाठी कक्ष प्रयत्नशील आहे. हे करत असताना काही तांत्रिक बाबी आल्यास त्या शिथिल केल्या जातील आणि रुग्णाच्या उपचारांना प्राधान्य देण्यात येईल असे कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले.

Continue reading

प्री आणि पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी 31 जानेवारीपर्यंत करा अर्ज

मुंबई शहर जिल्ह्यातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी प्री-मॅट्रिक (इ. 9वी व 10वी) व पोस्ट-मॅट्रिक (इ. 11वी ते पदव्युत्तर / व्यावसायिक अभ्यासक्रम) शिष्यवृत्तीच्या लाभासाठी एनएसपी (नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर) येत्या 31 जानेवारीपर्यंत सादर करावेत, असे इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, मुंबई शहरचे सहाय्यक संचालक रविकिरण पाटील यांनी कळविले आहे. केंद्र...

मकर संक्रांत म्हणजे काय?

मकर संक्रात या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. भारतीय संस्कृतीत हा सण आपापसातील कलह विसरून प्रेमभाव वाढवण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक जीव ‘तीळगूळ घ्या, गोड बोला’ असे म्हणून जवळ येतो. हा सण तिथीवाचक नाही. मकर संक्रांतीचा...

कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना नवतंत्रज्ञानाची माहिती

देशातील अव्वल बायोडायव्हर्सिटी आणि विविध पिकांची उत्पादनक्षमता असलेल्या नंदुरबार जिल्हा व परिसरातील कष्टाळू व प्रयोगशील शेतकऱ्यांना शहादा येथे नुकत्याच झालेल्या ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनासारख्या आयोजनातून नवतंत्रज्ञानाचे उपयुक्त मार्गदर्शन मिळते. त्याचा उपयोग करून नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी तसेच शेतकरी उत्पादक गट क्रांती...
Skip to content