Homeटॉप स्टोरीअनेक साखर कारखान्यांचे...

अनेक साखर कारखान्यांचे गाळप यंदा लवकरच ठप्प?

यंदा अनेक साखर कारखान्यांचा गाळप हंगाम लवकर बंद होण्याची चिन्हे आहेत. महाराष्ट्र, कर्नाटकातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम साधारणतः मार्चअखेरीस बंद व्हायला सुरुवात होते. काही कारखाने मात्र ऊसाच्या उपलब्धतेनुसार उशिरापर्यंत सुरू राहतात. यंदा मात्र फेब्रुवारी मध्यातच 20-25 कारखान्यांना गाळप हंगाम बंद करावा लागण्याची चिन्हे दिसत आहेत. यावर्षी ऊस लागवड उशिरा सुरू झाल्याने साखर उत्पादनावर परिणाम होण्याच्या शक्यतेला “श्री रेणुका शुगर्स”चे चेअरमन अतुल चतुर्वेदी यांनीही दुजोरा दिला आहे.

2023-2024 गाळप हंगामामध्ये 319 लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. 2024-2025 म्हणजे यंदाच्या हंगामात मात्र साखरेचे उत्पादन 270 ते 280 लाख टन राहण्याचा इस्मा

साखर

अन् नॅशनल शुगर फेडरेशनचा अंदाज आहे. दुसरीकडे, गेल्या काही काळात ऊसाच्या उपलब्धतेबरोबरच गुणवत्ताही खालावत चालली आहे. त्यामुळे सरासरी साखर उतारा 9.37%वरून 8.81%पर्यंत खालावला आहे.

यंदा गेल्या 8 वर्षांत प्रथमच देशांतर्गत मागणीपेक्षा साखर उत्पादन कमी राहण्याचा अंदाज आहे. त्यातच साखर कारखानदारांच्या दबावामुळे मोदी सरकारने दहा लाख टन साखरेच्या निर्यातीस परवानगी दिली आहे. त्यामुळे बफर स्टॉक गृहीत धरला तरीही दिवाळीनंतरच्या काही महिन्यांत खुल्या बाजारात साखरेचे दर वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. “श्री रेणुका”चे चतुर्वेदी यांनी मात्र साखरेची टंचाई तसेच दरवाढीची शक्यता फेटाळून लावली आहे. भारतात अगोदरच साखरेचे दर खालावलेले होते. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी साखर निर्यातीचा केंद्राने घेतलेला निर्णय योग्यच असल्याचेही चतुर्वेदी यांनी सांगितले.

Continue reading

जनतेला तुच्छ लेखणाऱ्या एका हुकूमशहाचा भयानक अंत!

इतिहासाच्या पानांवर २७ एप्रिल १९४५ हा दिवस एका मोठ्या युगाच्या अंताची नांदी देणारा ठरला. हा तो दिवस होता जेव्हा 'फॅसिझम'चा जनक आणि इटलीचा सर्वेसर्वा बेनिटो मुसोलिनी याला इटालियन क्रांतिकारकांनी (पार्टिझन्स) स्वित्झर्लंडला पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना अटक केली. हा प्रसंग...

मलेरियावर नवजात बालकांसाठी जगातले पहिले औषध दृष्टीक्षेपात

जागतिक आरोग्य संघटना (हू-डब्ल्यूएचओ) ने 'कोआर्टेम बेबी' या औषधाला 'प्री-क्वालिफिकेशन' बहाल केले आहे. २ ते ५ किलोग्रॅम वजनाच्या नवजात बालकांसाठी विकसित केलेले हे जगातील पहिले आणि एकमेव मलेरिया प्रतिबंधक औषध ठरले आहे. या निर्णयामुळे आता जगभरातील सरकारी यंत्रणांना या...

जागतिक गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजाराकडे फिरवणार पाठ?

जागतिक ब्रोकरेज फर्म एचएसबीसीने भारतीय इक्विटी मार्केटला 'न्यूट्रल'वरून 'अंडरवेट' श्रेणीत ढकलले आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, जागतिक गुंतवणूकदारांनी आता भारतीय शेअर बाजारात आपली गुंतवणूक कमी करावी, असा सल्ला या संस्थेने दिला आहे. कच्च्या तेलाच्या किमतीतील अनपेक्षित वाढ हे यामागचे...
Skip to content